<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383</id><updated>2012-02-12T11:21:13.339+05:30</updated><category term='गणपती'/><category term='रणबीर-Ranbir'/><category term='बालगंधर्व'/><category term='संगीत'/><category term='रॉकस्टार-Rockstar'/><category term='तडजोड'/><category term='जाहिरातबाजी'/><category term='सानिया'/><category term='लवलेटर'/><category term='राष्ट्रप्रेम'/><category term='स्वातंत्र्य दिन'/><category term='फाल्तूगिरी'/><category term='आनंदी-आनंद'/><category term='अनुवाद'/><category term='नववर्ष'/><category term='फेसबुक'/><category term='समीक्षा'/><category term='अस्वस्थ'/><category term='कविता'/><category term='जोशी'/><category term='आठवणी'/><category term='बाप्पा'/><category term='प्रश्न'/><category term='मोरया'/><category term='मराठी'/><category term='भारत'/><category term='अवधूत गुप्ते'/><category term='फटाके'/><category term='विनोदी'/><category term='सामाजिक'/><category term='शाळा'/><category term='कला'/><category term='तरुणाई'/><category term='कार्टून्स'/><category term='गाणी'/><category term='पाऊस'/><category term='वेग'/><category term='ग्लॅमर'/><category term='खेळ'/><category term='गप्पा-टप्पा'/><category term='सचिन'/><category term='वाढदिवस'/><category term='पुल'/><category term='निरर्थक'/><category term='प्रेम कविता'/><category term='निषेध'/><category term='मनोरंजन'/><category term='दिवाळी'/><category term='ईडियट बॉक्स'/><category term='हॅपी वॅलेन्टाईन डे'/><category term='बालपण'/><category term='शिरोडकर'/><category term='सिरीयल'/><category term='संकल्प'/><category term='सण'/><category term='प्रदूषण'/><category term='वर्ल्ड कप'/><category term='फराळ'/><category term='प्रेम'/><category term='काल्पनिक'/><category term='चित्रपट'/><category term='अपघात'/><category term='मिलिंद बोकील'/><category term='पोस्ट'/><category term='सुट्टी'/><category term='रहमान-Rahman'/><category term='रिऍलिटी शो'/><category term='सहज'/><category term='२०११'/><category term='पत्र'/><category term='मनातले'/><category term='क्रिकेट'/><category term='मालिका'/><category term='स्वच्छंद'/><category term='पुस्तक'/><category term='ब्लॉग'/><category term='टी.व्ही.'/><title type='text'>माझ्या मनातले काही</title><subtitle type='html'>शब्द असू दे हातांमध्ये, काठी म्हणूनी.... वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही...</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>37</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-5080914052568447106</id><published>2012-01-23T21:45:00.000+05:30</published><updated>2012-01-23T22:54:33.712+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शाळा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपट'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बालपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='जोशी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रेम'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मिलिंद बोकील'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पुस्तक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='समीक्षा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शिरोडकर'/><title type='text'>शाळा- पुस्तक, चित्रपट आणि बरेच काही</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;शाळेत गेलेल्या सर्वांसाठी...असे वाचूनच पुस्तकाची सुरूवात होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डोंबिवलीच्या सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल या छोट्याश्या मराठमोळ्या शाळेत शिकणारा मुकुंद जोशी आणि त्याचे मित्र चित्रे, सुऱ्या आणि फावड्या ही कथानकातील प्रमुख पात्रे. आजची डोंबिवली ही शहर म्हणून विकसित झाली असली तरी ७०च्या दशकात तिचे स्वरूप खेडे म्हणूनच होते. शेतजमीन, डोंगर आणि बराचसा ग्रामीण मातीचा गंध सांगणारे वर्णन यात आपण सहज मागे खेचले जातो. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण ठिकाणी शिक्षण झालेल्यांनाच नव्हे तर शहरी भागात ही पूर्वीच्या मराठमोळ्या शाळांमधून शिकलेले विद्यार्थ्यांना देखील ती आपलीच शाळा वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-PbJMzZtVrwk/Txwyi1V2yUI/AAAAAAAABGw/-Xv1xZdEIYM/s1600/shala1.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="179" src="http://2.bp.blogspot.com/-PbJMzZtVrwk/Txwyi1V2yUI/AAAAAAAABGw/-Xv1xZdEIYM/s320/shala1.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;शाळा ही म्हटली तर एक प्रेमकथा आहे म्हटली तर नाहीही. मुकुंदा जोशी हा या कथेचा नायक आहे आणि संपूर्ण पुस्तकात तो आपल्या अवतीभवतीचे शाळेचे व शाळेबाहेरचे विश्व आपल्यासमोर मांडतो.&amp;nbsp;शिरोडकर ही या कथेची नायिका आहे पण ती ही केवळ मुकुंदाला आवडत असते म्हणून.&amp;nbsp;प्रेमकथा यासाठी कारण मुकुंदा सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठेही, कधीही शिरोडकरच्याच विचारात बुडालेला. आपले प्रेम तिच्यापर्यंत कसे पोचवणार या चिंतेने कायम त्याच्या पोटात खड्डा पडलेला. पण या कथेलाच समांतर असे अनेक प्रवाह सुरु राहतात आणि ते कधीच या प्रेमकथेचा रसभंग करत नाहीत उलट सहजपणे त्याशी एकरूप होऊन जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मिलिंद बोकील यांनी पुस्तकात कुठेही बोजड, काव्यमय किंवा लेखन शैलीचा छाप पाडणारे लेखन केले नाहीये. बोलीभाषेचा वास्तवाइतकाच स्पष्ट वापर तोही अगदी आपल्या मनातले काहीतरी बोलल्यासारखा. ते एक नववीतल्या मुलाचे विचार वाटावे इतके सहज, सुंदर लिहिले आहे. मुकुंद जोशी जो नववीतला विद्यार्थी आहे त्याला आजूबाजूला दिसणाऱ्या, नव्याने कळणाऱ्या आणि काहीवेळा न कळणाऱ्या गोष्टी त्यांनी या कथेत गुंफल्या आहेत. मुकुंदाचे विचार हे निरागस वाटत नाहीत, ते स्पष्ट वाटतात. काही खास शब्द आणि वाक्प्रचार पुन्हा पुन्हा वापरण्यात आले आहेत ते फारच गोड वाटतात. जसे सुममध्ये राहणे, इमानदारीत असणे, आडीबाजी करणे, डाउट खाणे वगैरे. त्या वयात आपल्याला आता सगळे काही कळते अशी जी आपली भावना असते आणि तसे असूनही ज्या काही चुका होत राहतात त्यातून हळूहळू शिकत जाण्याची वृती हे नेमके टिपले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कथानकात मुळातच एक हवाहवासा वाटणारा निवांतपणा आहे. कथानक बऱ्याच संथपणे जाते पण कुठेही कंटाळवाणे होत नाही. ते जितक्या निवांतपणे वाचू लागतो तसे हळूहळू ग्रामीण मातीचा गंध, पक्ष्यांचा किलकिलाट, कोवळ्या उन्हाचा स्पर्श जाणवतोय असे वाटू लागते. मुकुंदाला शिरोडकरच्या प्रेमात पडल्यापासून बाकी जगापासून दूर गेल्यासारखे वाटते आणि त्याचे केवळ तिच्यातच त्याचे हरवून जाणे जसे आहे तसे पुस्तक वाचताना आपल्याला होते. वाचकास आपल्या शाळेची आठवण होणार नाही असे शक्य होणार नाही कारण कुठे ना कुठे शाळेत गेलेल्या त्या प्रत्येकास ते कथानक जवळचे वाटते. तीन दशकांपूर्वीची गोष्ट असूनही ती आजच्या पिढीलाही तितकीच जवळची वाटते यातच लेखकाचे आणि पुस्तकाचे यश आहे.&lt;/div&gt;&lt;br /&gt;पुस्तकाच्या बाबत लिहायला गेलो तर काय काय आणि किती लिहू असे आहे. उल्लेखनीय म्हणावे असे अनेक प्रसंग आहेत. कुमारवयात मुलांना वाटणारे लैंगिक आकर्षण, त्याचे चावट संवाद आणि या साऱ्या बाबत त्यांचा विचार करण्याचा दृष्टीकोन हा म्हटले तर सगळ्यांनीच आपापल्या बालपणी अनुभवला असेल पण तो नेमका उतरलाय पुस्तकात. बाटली फुटण्याची भीती, नायकिणीच्या गोष्टी, गंगू कुठं गेलीचे गाणे हे सारे वाचताना सगळे जुनेच संदर्भ वेगळ्या रूपात जाणवतात. त्याच वेळेस आणीबाणी म्हणजे काय, त्यांच्याच चाळीत केला जाणारा जातीभेद, तत्कालीन समाज आणि समज हे सगळे वेगवेगळे विषय ही गुंता न करता गुंफले गेले आहेत. 'लाईन देणे' याबाबत तर काळानुरूप त्याचे नामकरण झाले फक्त पण मुलं-मुली शाळेतच लाईन द्यायला-घ्यायला, किमान हा प्रकार काय ते तरी शिकतात, त्यासाठी कॉलेजची पायरी चढावी लागत नाही. शाळेतल्या शिक्षकांच्या जोड्या लावणे, त्यातील काही आवडते असणे, काही नावडते असणे. त्यांच्या लकबी, स्वभाव अगदी हुबेहूब. मुख्याध्यापक आणि त्यांची खोली तंतोतंत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;object width="320" height="266" class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://2.gvt0.com/vi/AZ4BumsB9vY/0.jpg"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/AZ4BumsB9vY&amp;fs=1&amp;source=uds" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266"  src="http://www.youtube.com/v/AZ4BumsB9vY&amp;fs=1&amp;source=uds" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटाबाबत बोलायचे तर पुस्तकामुळे अपेक्षा फार वाढलेल्या. त्यात पुन्हा वेळेची मर्यादा त्यामुळे सगळेच काही २ तासात मांडता येणे शक्य होत नाही. पण दिग्दर्शक सुजय डहाके यांनी ते शक्य तितक्या चांगल्या परीने मांडले आहे. चित्रपट पाहताना असेही वाटते की हा पुस्तकावर बेतलेला नसता तर कदाचित दिग्दर्शकास अधिक स्वातंत्र्य मिळाले असते. नावाजलेल्या पुस्तकावर चित्रपट निर्माण करण्यात मोठी अडचण म्हणजे वाचकांना पानोपानीचे संवाद आणि संदर्भ सगळे पाठ असतात. त्यात कुठेही बदल घडला तरी तो रुचत नाही आणि मग या सगळ्या प्रक्रियेत अनेक बंधने आपसूकच येतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पात्र निवडीत जोशी, शिरोडकर, सुऱ्या, फावड्या, चित्रे, आंबेकर, सुकडी, बिबीकर, बेंद्रे बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, आप्पा, अंबाबाई, नरूमामा सगळे अचूक. काही पात्र दाखवली गेली नाहीत ते अपेक्षित होतेच. काही प्रसंग गाळले तेही अपेक्षित होतेच. रांगोळीच्या डब्यात सर्व रंग असावेत पण स्पर्धेत मोजकेच रंग दिले जातील असा नियम असल्याची जाणीव ठेवून रांगोळी काढली आहे, ती विलक्षण सुंदर झाली आहे पण अपेक्षा इतक्या आहेत की चित्रपट याहून सुंदर झाला असता तरी समाधान झाले नसतेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जोशी आणि शिरोडकर कायम लाईमलाईट मध्ये राहतात कारण जोशी चित्रपटाचा नायक आहे आणि जिथे जोशी आहे तिथे कायम त्याची मनी-ध्यानी शिरोडकरही आहेच. अंशुमन जोशीने मुकुंद जोशी उत्तम साकारलाय. त्याचे संवाद आणि देहबोली अगदी खरीखुरी वाटते. केतकी माटेगावकर शिरोडकर म्हणून प्रचंड गोड दिसते. तिचे बोलके आणि सुंदर डोळे तिच्या संवादांची जागा भरून काढतात. फावड्या आणि चित्र्या पण मस्त. चित्र्याला वाव कमी मिळालाय. पुस्तकात बिबीकर जरी भाव मारू असला तरी चित्रपटात मात्र भाव खाल्लाय तो सुऱ्याने ! तो अगदी अस्सल वाटतो. जोशी म्हणतो त्याप्रमाणे मुलांचे जसे वेगवेगळे संच असतात त्या संचात हा मस्तीखोर मुलांच्या संचात पहिला येणारा. सगळ्या शाळांत असले अवली विद्यार्थी असतातच त्यामुळे प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या रूपात तो आठवतोच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटात काही खटकलेल्या गोष्टीही आहेत. सहलीच्या वेळेस जेव्हा सगळे विद्यार्थी शेकोटी भोवती बसलेले असतात आणि शिरोडकर सगळ्यांच्या नजरा चुकवून जोशीच्या दिशेने एक चॉक्लेट टाकते. पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे की ती 'रावळगाव'चे चॉक्लेट त्याच्या दिशेने टाकते पण इथे मात्र 'पारले'चे वापरण्यात आले आहे. असा बदल जाणीवपूर्वक आहे की नाही ते दिग्दर्शकास ठावूक पण ते पाहता क्षणी लगेच लक्षात आले. शिवाय केटी, अशोक आणि विजयच्या खोलीत 'चे गव्हेरा'चे चित्र असलेला कॉफी मग आहे. त्या काळी तसे प्रिंटेड मग उपलब्ध होते की नाही याबद्दल शंका आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटात शेवट बऱ्याच घाईघाईत आटोपता घेतला आहे. पुस्तकाच्या शेवटी वाचताना जी पायाखालची जमीन सरकते आणि जोश्याबरोबरच आपलेही मन गलबलते ते तसे चित्रपटात होत नाही. तो अधिक परिणामकारक करता आला असता. पुस्तकाचा शेवट मात्र अगदी काळजाला हात घालणारा आहे. सगळे काही इतके सुरळीतपणे चाललेले असताना असे काही होईल असे अपेक्षितच नसते. शेवटचे पान बंद केले आणि त्या बाहेर पडून जरा विचार केले तर वाटते की जोशीच्या बाबत जे झाले ते इतकेही काही भयानक नाही आहे. कदाचित आणखी काही वर्षांनी तो इंजिनियर झाला असेल. त्याच्या आयुष्यात शिरोडकरच्या जागी दुसरी कोणी आली असेल. नवीन मित्रही भेटले असतील. पण त्या वयातील आपले दु:खाचे प्रसंग आठवले तर वाटते की त्याहून अधिक वाईट काही होऊ नाही शकत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वारंवार टाळायचे ठरवूनही तुलना होत राहते. दोघांची तुलना करायची म्हटली तर असे म्हणता येईल की शाळा पुस्तक म्हणजे सचिन तेंडूलकरची एखादी उत्कृष्ट जमलेली खेळी आहे आणि चित्रपट त्याच्या काही निवडक क्षणांची हायलाईट्स. त्यातील महत्वाच्या घटना आणि प्रसंग हे चौकार, षटकार असतील पण सचिनने काढलेल्या एकेरी आणि दुहेरी धावा ही तितक्याच आकर्षक आणि नजाकतभऱ्या आहेत. त्या अनुभवायच्या असतील तर पुस्तकच उघडायला हवे. जे चित्रपटात मांडले आहे ते सुंदर आहे पण ज्यांनी पुस्तक वाचले आहे त्यांचे यावर समाधान होणार नाही हे तितकेच खरे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विशेष कौतुक म्हणजे चित्रपटाने पुस्तकाच्या प्रसिद्धीचा आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचा उत्तम वापर केलाय. मराठी चित्रपटाच्या भवितव्याच्या दृष्टीने ही फार चांगली गोष्ट आहे कारण मार्केटिंगच्या बाबत मराठी सिनेमा मागेच पडायचा कायम. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने बरेच पुरस्कार मिळवले आहेत. 'माउथ पब्लिसिटी' ही प्रचंड जोरात चालली आहे. पण याबाबत माझी अशी इच्छा आहे की या पुस्तकावर एखादी मालिका बनवता आली तर त्या कथानकाला योग्य न्याय देता येईल. चित्रपट केल्याने मराठी चित्रपट सृष्टीला दर्जेदार चित्रपट मिळाला खरे पण टी.व्ही. मालिकांना ही या निमित्ताने एक चांगली मालिका मिळाली तर सुजाण प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच ठरेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जाता जाता, नुकतीच पाहण्यात आलेली शाळा सिनेमाची शीर्षकांची पाटी वर शेअर केली आहे. काळा फळा आणि पांढरा खडू एवढेच साहित्य वापरून बनवलेले हलते चित्र जणू आणि चित्रपट पाहताना खास लक्षात राहिलेली मधली सुट्टीची पाटी. आता तुम्हीही लवकरात लवकर शाळेत दाखल व्हा आणि जुन्या स्मृतींना उजाळा द्या. आम्ही तर पुन्हा पुन्हा जाणार आहोत. शक्य असल्यास शाळेच्या मित्रांसोबतच पाहा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;embed flashvars="host=picasaweb.google.com&amp;amp;hl=en_US&amp;amp;feat=flashalbum&amp;amp;RGB=0x000000&amp;amp;feed=https%3A%2F%2Fpicasaweb.google.com%2Fdata%2Ffeed%2Fapi%2Fuser%2F101626089407812002998%2Falbumid%2F5700484352868094369%3Falt%3Drss%26kind%3Dphoto%26hl%3Den_US" height="267" pluginspage="http://www.macromedia.com/go/getflashplayer" src="https://picasaweb.google.com/s/c/bin/slideshow.swf" type="application/x-shockwave-flash" width="400"&gt;&lt;/embed&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-5080914052568447106?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/5080914052568447106/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2012/01/blog-post_23.html#comment-form' title='14 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/5080914052568447106'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/5080914052568447106'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2012/01/blog-post_23.html' title='शाळा- पुस्तक, चित्रपट आणि बरेच काही'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-PbJMzZtVrwk/Txwyi1V2yUI/AAAAAAAABGw/-Xv1xZdEIYM/s72-c/shala1.jpg' height='72' width='72'/><thr:total>14</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-8480750941327834910</id><published>2012-01-14T21:20:00.000+05:30</published><updated>2012-01-14T21:51:34.119+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भारत'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रश्न'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रदूषण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सामाजिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निषेध'/><title type='text'>अस्वच्छ भारत</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;समस्या तर तशा खूप आहेत जगात. सगळ्याच काही माणसाला वैयक्तिक पातळीवर सोडवता येणे शक्य नसते. पण माणूस प्रयत्न करू शकतो आणि खासकरून तेव्हा, जेव्हा या समस्या त्याच्याच चुकांमुळे उद्भवल्या असतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईसारख्या शहरात कधी घराबाहेर पडलो आणि डोक्यातील इतर सर्व विचारचक्रे थांबवून कधी आपल्या शहराचे निरीक्षण केले तर लक्षात येईल कि जिथे-तिथे कचराच कचरा आहे. कचरा जो लक्ष नसेल तर दिसत नाही पण पाहिले तर सगळीकडेच आहे. वैचारिक कचऱ्याच्या गोष्टी नाही करत मी, भौतिक कचराच आहे आणि तो टाकणारेही आपणच. रस्ते पहा, इमारती पहा, भिंती पहा आणि जिथे कचरा टाकू नये असे लिहिले आहे तिथेही माणूस जिवंत असल्याच्या खुणा तो उमटवत जातोच आहे. पान थुंकू नये लिहिले असेल तर तिथेच पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगकाम आढळते. पोस्टर लावू नये लिहिले तर ते जुने पोस्टर काढले तर त्याखाली लिहिलेले सापडते. तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही निर्लज्ज आहोत!&lt;br /&gt;&lt;br /&gt;बसचे वा ट्रेनचे तिकीट, चॉक्लेटचे कागद, सिगारेटचे पाकीट, वेफर्सचे रॅपर्स, रिकाम्या बाटल्या ( दारुच्याही), प्लास्टिक पिशव्या....सगळ्या चीजवस्तू काम झाले की निसर्ग नावाच्या कचरापेटीत ! इतका बेजबाबदारपणा ? इतकी बेफिकिरी ? इतके असंस्कृत का आपण ? आपलेच शहर, आपलाच देश आपणच खराब करतो आणि वर अपेक्षा करतो की सरकारने आपले शहर स्वच्छ राखावे. सरकारही जबाबदार आहेच म्हणा याला. स्वच्छता या अति महत्त्वाच्या बाबीकडे कुणाचे लक्ष नाही. जनतेच्या मूलभूत गरजांमध्ये स्वच्छ सुंदर परिसर केवळ पुस्तकात शोभण्यासारखा आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वच्छता मोहीमपण एखाद्या अपवादात्मक गावामध्ये घडते तेही कुण्या समाजसेवकाच्या पुढाकाराने. नगरसेवक निवडून येतात, आश्वासने देतात पण आपला विभाग स्वच्छ ठेवण्याचेही आश्वासन देतात का ते? देत असतील तर त्याची अंमल बजावणी करणे विसरत असतील मग आपल्या कामाच्या व्यापात ! मध्यंतरी वाचण्यात आले की गेल्या वर्षाप्रमाणे येत्या महिन्याभरात वार्षिक नालेसफाई सुरु करण्यात येईल. अर्थात नाले ही काही स्वच्छ राखण्याची आवश्यकता वर्षातून एकदाच कशी वाटते. जे कायम डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरण्यात येते, रोगराई आणि दुषित पर्यावरणाचे कारण बनते ते कायम स्वच्छ नाही का ठेवता येत ? प्लास्टिक पिशव्यांमुळे नाले तुंबतात आणि पावसाळ्यात पंचाईत होते पण चालेल आम्हाला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेल्वेने प्रवास करत असाल तर नुसतीच दारात उभे राहून हवा खाण्यापेक्षा कधी रेल्वे ट्रकच्या बाजूचा परिसर पहिला तर दिसेल की मुंबईत सर्वत्र बकाल वस्ती आणि गलिच्छ परिसर आहे. मला हिंदी सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या परदेशातील रम्य स्थळांची चित्रे डोळ्यापुढून गेली, तिथले लोक इथे आल्यावर काय म्हणत असतील...? तरी कौतुकाने फोटो काढतात त्याचे ! त्यात येता-जाता खाड्या दिसल्या की निर्माल्य टाकायला हात जास्तच सरसावतात...देवपूजेचे निर्माल्य असे पाण्यात टाकून घाण वाढवण्यापेक्षा कचऱ्यात टाकलेले चांगले. धार्मिकदृष्ट्या पाप नाही लागायचे पण सामाजिकदृष्ट्या पुण्य तरी मिळेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवाळी झाली की पहा सर्वत्र फटाक्यांचा कचरा असतो...पिकनिकला जायचे आणि तो सुंदर परिसर घाण करायचा...स्वातंत्र्य दिनी झेंडे मिरवायचे आणि ते मातीत मिळतील याचीही खात्री बाळगायची. कुणाला असे कचरा टाकताना अडवू पाहिले तर ते तुमच्या इज्जतीचा कचरा करू पाहणार...'तुमच्या बापाचं काय जातं म्हणे ?' जागोजागी थुंकायची तर लोकांना एवढी सवय झालीये की जणू सरकारने तरतूद केली आहे थुंकण्याची. कचरा सर्वत्र टाकतो कारण आम्ही टॅक्स भरतो ना...सफाई कामगार आहेत कचरा उचलायला. चुकून एखाद्याला आपल्या चुकीची जाणीव होईल पण आपण प्रयत्न नाही सोडायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वच्छता पाहण्यात येते ती फक्त कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कारण तिथे अमुक एका मालकाच्या हाती सत्ता असते, बिझिनेसमध्ये पाश्चिमात्य देशांकडून आलेली स्वच्छतेची, शिस्तीची, टापटीपपणाची परंपरा स्पर्धेत टिकायला हवे असेल तर जपायलाच हवी म्हणून. अन्यथा भारतातील पारंपारिक व्यवसाय कुठे इतके नियम आणि मॅनर्स पाळायचे. इतका मोठा देश लोकशाही तत्वावर चालवायचा तर त्याची प्रांतवार विभागणी आणि त्या त्या प्रांताची जबाबदारी सांभाळणारे सरकार निवडून देण्यात यावे याच अनुषंगाने राज्यघटना लिहिली असावी ना...पण देशाच्या प्रगतीपेक्षा आपला खिशा कसा भरायचा याची अधिक चिंता म्हणून जिथे 'जाऊ तिथे खाऊ' आणि त्याचे परिणाम म्हणून स्वत:ची मुले सुद्धा याच अस्वच्छ परिसरात वाढणार आहेत हे सर्रासपणे विसरत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपली संस्कृती म्हणून ओळख असणारे किल्ले, प्रेक्षणीय स्थळे तर 'बंटी' लव्स 'बबली' अशा प्रेमवीरांच्या हस्तकलांनी बरबटली आहेत. माझे तिच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला कळले पाहिजे...संस्कृती गेली खड्ड्यात ना ? काय फरक पडतो नाव लिहिले तर...फरक पडतो ना...कुण्या एकाच्या बिनडोक कृत्त्यांनी देशाची लाज जाते पण त्याची पर्वा नाहीच त्यांना. स्वातंत्र्य म्हणजे काय ? त्याची किंमत काय? आणि आज या अशा मनमानी स्वातंत्र्याला आला घालायचा तर इंग्रजी शासनच हवे. त्यांच्या गुलामीत वाढले असते तर इतका माज चढला नसता, नाही का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सर्व बेशिस्त कारभारावर कायद्याने दंड करणे हा एक उपाय फक्त डोळ्यापुढे दिसतो. आता काहीजण म्हणतील यातही नेमलेला अधिकारी पैसे खाईल पण १०० ऐवजी २० रुपये जरी द्यावे लागले तरी ते काही कुणाला आवडणार नाहीच. म्हणून हा नियम अतिशय आवश्यक आहे पण सरकारला केव्हा जाग येणार ठाउक नाही. काही ठिकाणी हा नियम सुरु आहे देखील, परिणाम नाही पण !मध्यंतरी क्लीन-अप मुंबई मोहीम आली होती त्याचे काय झाले ? माहित नाही. मला तरी अजूनही सर्वत्र कचरा दिसतोच आहे याअर्थी मोहीम थंडावली आहे एवढे नक्की, की बंद पडली ? स्वच्छता मोहीम ही संघटनांमार्फत न होता सरकारमार्फत व्हायला हवी तरच लोकांना शिस्त लागेल. काही लोकांचा गट कचरा उचलणार आणि बाकीचे परत टाकणार तेव्हा तो उचलला जाईल आणि परत कुणी टाकणार ही नाही अशी खबरदारी घ्यायला हवी.&amp;nbsp;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला माझी मुंबई स्वच्छ आणि सुंदर हवी आहे. मला माझा देश स्वच्छ आणि सुंदर हवा आहे आणि ती फक्त माझी वैयक्तिक जबाबदारी नसून आपली सामुहिक जबाबदारी आहे तेव्हा तुम्हीही शक्य असेल तिथे कचरा न करण्याची प्रतिज्ञा करा आणि इतरांनाही याची जाणीव करून द्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-8480750941327834910?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/8480750941327834910/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2012/01/blog-post.html#comment-form' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/8480750941327834910'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/8480750941327834910'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2012/01/blog-post.html' title='अस्वच्छ भारत'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-2842928452641071380</id><published>2011-12-26T10:51:00.000+05:30</published><updated>2011-12-26T11:24:32.512+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पुल'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पत्र'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लवलेटर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पोस्ट'/><title type='text'>पत्रास कारण की...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;शेवटचं पत्र केव्हा आलं होतं काही आठवत नाही पण बरीच वर्षे झाली असावीत. बहुतेक विसाव्या शतकातच आले असेल. तेव्हापासून पोस्टमनकाका, पोस्टाचे पाकीट, पोस्टाची तिकिटे काहीच पाहण्यात नाही. तरी त्या मानाने माझ्या (तरुण) पिढीने पत्रे फार काही पाहिलीच नाही. आमची लहान होतो तेव्हाच काय ती पत्रे पाहिली. जसे मोठे झालो तशी पत्रे हळूहळू कमीच झाली आणि मग एकदम साक्षात्कार झाला...पत्र हरवलं कुठे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;पत्र कारभाराचा इतिहास चाळला तर कळले की इंग्रजांनी १६८८ मध्ये (आमच्या!) मुंबईत देशातील पहिले टपाल कार्यालय सुरु केले. पूर्वी संदेशवहनासाठी म्हणून निर्मिलेले हे दळणवळणाचे साधन हळूहळू जिव्हाळ्याचे झाले. लोक आपल्या प्रियजनांना आपले क्षेम कुशल पत्राद्वारे कळवू लागले आणि त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत पत्रांच्या वाटेकडे डोळे लावून बसले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-ekCn5gC-ol4/TvbaAqefGPI/AAAAAAAABBU/iwMJ_VBK0j0/s1600/post-card00011.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="206" src="http://2.bp.blogspot.com/-ekCn5gC-ol4/TvbaAqefGPI/AAAAAAAABBU/iwMJ_VBK0j0/s320/post-card00011.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;पत्रांमध्ये कित्येकांच्या भावना गुंफल्या जात. पत्र लिहायचे तर एकजन लिहिणारा पण त्यात सर्वांचे निरोप, काळज्या, आपुलक्या यांचे मिश्रण होई. पत्र वाचणे हा तर आनंद सोहळाच ! कुणी तरी आपली प्रयत्नपूर्वक आठवण ठेवून, वेळ काढून ( तेव्हा लोक इतके बिझी नव्हते म्हणा! ) आपल्याला पत्र लिहिले आहे याचेच किती कौतुक. पत्र वाचायचे तर घरातील शक्यतो नव्या पिढीच्या मंडळींनी आपल्या अशिक्षित पण जाणत्या वडीलधारया मंडळींस वाचून दाखवावे. दीड पानाच्या पत्रात काय तो मजकूर मावायचा पण त्यात सर्वांची खुशाली वाचून जो दिलासा मिळायचा तो हल्ली सहजासहजी शक्य असणाऱ्या संपर्कातून लोप पावत चालला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या दहा वर्षात पत्रांच्या दळणवळणात ७२ टक्क्यांनी घट झाली आहे असे वाचण्यात आले. सर्वत्र आधुनिकतेचे वारे वाहू लागल्याने जिथे-तिथे लोकांच्या खिशात मोबाईल खणखणू लागला आहे. हल्ली तर मोबाईलपेक्षा नेटवर ऑनलाइन भेटीगाठी होत असल्याने टपाल खाते 'बुडित खाते' झाले आहे. हल्लीच्या अभ्यास क्रमातून 'पत्र लेखनाचे' धडे दिले जातात की नाही याबद्दल मला शंका आहे आणि दिले तरी प्रत्यक्षात कोण लिहिणार ते ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतिहास अभ्यासकांना ऐतिहासिक पत्रांचा अभ्यास करायची संधी मिळत असते. शिवाजी महाराजांची पत्रे, तसेच स्वातंत्र्य संग्रामात काही थोर लोकांची दुर्मिळ पत्रे आता एखाद्या संग्रहालयात जपून ठेवली जातात. पुढील काही वर्षात साधे पोस्ट कार्ड सुद्धा दुर्मिळ म्हणून गणले जाईल पण तेव्हा या पत्रांना विचारणार कोण ? &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-_8hygp9Ukcg/TvbZ3XuynwI/AAAAAAAABBI/Dp5kHf-b7ko/s1600/NashikEdition-6-4-09-10-2011-05e12.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://4.bp.blogspot.com/-_8hygp9Ukcg/TvbZ3XuynwI/AAAAAAAABBI/Dp5kHf-b7ko/s320/NashikEdition-6-4-09-10-2011-05e12.jpg" width="179" /&gt;&lt;/a&gt;टपाल खात्यावर तर आपल्या 'पुलंचेही' प्रेम एवढे की 'माझे पौष्टिक जीवन' सांगताना वाचकांना अगदी पोस्ट हापिसात नेऊन बसवले आहे. टपाल खात्याचे वेगळेपण, त्याचा स्थायीभाव आणि पत्र व्यवहाराचा त्या काळी असणारा प्रभाव पुलंनी जो वर्णिला आहे त्याच टपाल खात्याची आज झालेली दयनीय अवस्था पाहून 'पुल'देखील हळहळले असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पत्रांची महती सांगणारी कित्येक गाणी जुन्या पिढ्यांनी गायली. 'ये मेरा प्रेमपत्र पढकर' ,' चिट्ठी आयी है', 'संदेसे आते है', 'कबूतर जा जा...' यां गाण्यांनी पत्रांना सिनेसृष्टीत स्थान दिले. प्रेमपत्र लिहायला प्रेमवीरांना उद्युक्त केले ते या रंगीत दुनियेनेच ! प्रेमपत्रास अधिक गुलाबी छटा देत त्याला ग्लॅमरही मिळवून दिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता ई-मेल, मोबाईल, एसएमएस, इंटरनेट यामुळे कोण पत्र लिहिण्यात वेळ दवडतो. जग एका हाकेच्या अंतरावर आले आहे मग पत्र 'आउट डेटेड' होणार नाही तर काय? पोस्टाची तिकिटे जमवण्याचे छंद जुने झाले नाही का? आईचं पत्र हरवलं हा खेळ सध्याच्या पिढीस माहिती आहे का? की तो काळाच्या ओघात नाहीसा होणार आहे...पत्रासारखाच !&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-2842928452641071380?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/2842928452641071380/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/12/blog-post_26.html#comment-form' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/2842928452641071380'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/2842928452641071380'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/12/blog-post_26.html' title='पत्रास कारण की...'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-ekCn5gC-ol4/TvbaAqefGPI/AAAAAAAABBU/iwMJ_VBK0j0/s72-c/post-card00011.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-4707706118943447831</id><published>2011-12-12T15:17:00.000+05:30</published><updated>2011-12-12T16:18:04.767+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निरर्थक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तरुणाई'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गप्पा-टप्पा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='काल्पनिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फेसबुक'/><title type='text'>फेसबुक चाट</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;संध्याकाळचे ७.३० वाजले आहेत.&lt;br /&gt;मी ऑफीसमधून घरी येऊन लॅपटॉप उघडतो आणि फेसबुक लॉग-इन करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाहतो तर ४ नवीन फ्रेंड रिक्वेस्ट्स, ६ मेसेजेस, ४५ नोटीफिकेशन्स आणि २५ जन ऑनलाइन !&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या भिंतीवरचे अपडेट्स पाहायला सुरूवात करणार तोच...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: हा....य!!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: हेल्लो...!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: कसा आहेस? (नेहमीचाच प्रश्न- काही जणांच्या फेसबुक प्रोफाइल मध्ये हा डिफॉल्ट चॅट सेव झालाय का?)&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: एकदम मजेत...तू कशी आहेस?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: आहेस कुठे तू? भेटत नाही, फोन पण नाही.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: कामं आहेत ग...बिझी असतो आजकाल [:P]&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: माझ्यासाठी पण वेळ नाहीये का?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: तो कसा नसेन...उलट तू ऑफीस सोडल्यापासून बोर होतंय ऑफीसमध्ये...[;)]&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: खरंच?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: हाय स्वीटहार्ट....:)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: हाय डियर... :) (अजुन एक आली!)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: कसा आहेस ? [:P]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: एकदम मजेत (पुन्हा तेच...!)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: मला वाटले विसरलास मला...:(&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: शक्य आहे का ते ? [:D]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: काय करतोस सध्या? कॉलेज मधले फ्रेण्ड्स भेटतात का कोणी?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: तुझ्याखेरीज कोणीच नाही...तुलाच तेवढी आठवण होते माझी [;)]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: हेल्लो...कुठे हरवलास...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: अग इथेच आहे...म्हणजे हरवलो होतो तुझ्या स्वप्नात (!)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: हो का? जागेपनी स्वप्न पाहु नयेत अशी...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: मग झोपायला जातो मी...[:P]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: ए...थांब रे...बर सध्या काय करतोयस मग...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: तुझाच विचार करतोय...[!]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: कसला विचार करतोयस...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: तुझाच विचार करतोय...[!!]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: मला वाटले गेलास...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: तुला न सांगता कसा जाईन बरे...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: त्यापेक्षा कामाचा विचार कर...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: ( तू अर्धवट टाकून गेलेल्या....?) ते तर करेनच...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: सन्डे ला काय करतोयस? मूवीला जाऊया?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: चालेल...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: मी वाशीला येणार आहे एका मैत्रिणीकडे...संध्याकाळी भेटू...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: चालेल...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: आणि मला शॉपिंग पण करायची आहे नंतर&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: (अरे देवा) चालेल...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: काय?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: काय?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: आता काय?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: कामाचा विचार करतोय!&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: हाइइइई.........:)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: हाय डियर....( ही एक अजुन आली...)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: हाउझ यु?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: F9...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;केतकी likes your profile pic&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: थॅंक्स&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: छान आहे...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: थॅंक्स [;)]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: तुझी त्या दिवशीची कविता पण मस्त होती...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची/ अनघा: अजुन कोणी आहे का चॅटवर...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: नाही ग...नेट स्लो आहे....&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: बोर होतंय यार...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: तेच ना....[:o]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: कधी भेटतोयस मग?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: तू बोलशील तेव्हा...आता येऊ ? (हो बोलू नकोस फक्त)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: आता कुठे? त्यापेक्षा सन्डेला भेटू...&lt;/span&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: आवडली तुला ?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: हो...कोणासाठी केली आहे?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: [तुझ्याचसाठी!] अशीच केली...कुणाला स्पेशली डेडिकेट नाही केली.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: नमस्कार...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;मी: ( हा कुठून टपकला आता?) बोला साहेब...!&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: काय चाललाय राव?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;मी: तुझ्यासाठी वहिनी शोधतोय...!&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: अजुन?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी and प्रियांका जोशी are friends now&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: ही प्रियांका कोण रे?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: नवीन गर्लफ्रेंड...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: तुझी?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: नाही ग...अभीची...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: हो...? स्वातीशी ब्रेक-अप झाले त्याचे?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: असेल...फेसबुक वर काही दिवस सिंगल होता तो...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: सन्डेला नको...फॅमिलीबरोबर बाहेर चाललोय...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: मग कधी...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: शनिवारी भेटू ना...मी ठाण्याला येणार आहे काही कामासाठी...ऑफीस सुटल्यावर भेटू!&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: ग्रेट...!&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: आहेच मी...[;)]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: आम्हाला शोधा की एखादी...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;मी: वहिनी का गर्लफ्रेंड ?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: ते सोड...अरे...माझ्यासाठी जॉब शोधनार होतास ना रे...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;मी: प्रयत्न चालू आहेत...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: आपण नेहमी ऑनलाइनच भेटतो ना...कधी भेटूया ना वेळ काढून&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: ह्म....&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: अभीची कितवी गर्लफ्रेंड असेल रे ही...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: (तुला काय करायचेय त्याचे?) मला काय करायचेय त्याचे...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: पक्का फ्लर्ट आहे तो...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: (माझ्यापेक्षा कमीच) हो ना....पण मी तसा नाहीये....&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: माहितीये मला...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बराच वेळ विचार करून....&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: एक विचारू ?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: (पडली वाटते प्रेमात !) काय ?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: तुला गर्लफ्रेंड आहे?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: दोन आहेत ! [:D :D :D ] ( कधी नाही ते खरे बोललो...!)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: [:( :( :( ]मी सीरियसली विचारतेय...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: मी मस्करीत बोलतोय!!&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: मग सांग ना खरे काय ते...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: आय अम सिंगल [इश्श्य!]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: लवकर दे ना यार...इथे कंटाळा आलाय पार....&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;मी:&amp;nbsp;मग मी काय करू?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: जॉब दे ना यार...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;मी:&amp;nbsp;जास्त डोकं नको खाऊस...(निघ आता)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची/ अनघा: परत गायब?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: {&lt;strike&gt;जास्त डोक नको खाऊस...निघ आता&lt;/strike&gt;} लॅपटॉप हॅंग होतोय...(ओवरलोड होतोय...!)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: मग काय विचार आहे?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: बघुया कोणी भेटतेय का?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: अरे तुझ्याशिवाय कोण मदत करणार यार?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;मी: (साईन आउट हो.....)???&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(ह्या अम्याच्या प्रोफाइल मध्ये ही 'नेहा साने' कोण? सीम्स इंट्रेस्टिंग...! गुड प्रोफाइल)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;मी: अरे देतो रे...टेन्शन नको घेऊ...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: ओके मी निघतो आता...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: ओके मी निघतो आता...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #274e13;"&gt;सोनल: हाय....!&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: तुला नाही का बॉयफ्रेंड...?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: ना...अजुन कोणी आवडलाच नाही&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: मिळाल्यावर सांग मला...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: नक्की...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: चाललास पण? ओके...पण सन्डेचे नक्की!&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: नक्की...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: ठीक आहे...मिस मी ओके...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: नक्की...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #274e13;"&gt;सोनल: आहेस का रे..?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #274e13;"&gt;मी: ( )&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: थॅंक्स यार...तू ही तो मेरा दोस्त है...&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;मी: आय नो....&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;अनघा: लव यु...मिस यु &amp;lt;3&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #4c1130;"&gt;मी: लव यु अनु &amp;lt;3&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: लव यु अनु &amp;lt;3&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: अनु?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;मी: जानु...! जे राहिला लिहायचा...[:P]&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;प्राची: अच्छा....लव यु...&amp;lt;3&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: (पुन्हा बराच वेळ विचार करून) बाय...टेक केअर...सी यु सून&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;मी: लव यु....&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;.&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;माय फ्रेंड...:)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #0c343d;"&gt;केतकी: &amp;lt;3&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #274e13;"&gt;सोनल: ?????&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;अमित: अरे ऐक ना...!&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी फेसबुक साईन आउट करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;तळटीप: वरील सर्व नावे आणि व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत आणि संभाषणातील मी म्हणजे 'वाचणारा मी' आहे 'लिहिणारा मी' नाही.&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-4707706118943447831?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/4707706118943447831/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/12/blog-post.html#comment-form' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/4707706118943447831'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/4707706118943447831'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='फेसबुक चाट'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-3680669882402630151</id><published>2011-11-26T15:53:00.000+05:30</published><updated>2011-11-26T16:17:21.733+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बालपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='खेळ'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सुट्टी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवणी'/><title type='text'>बालपणीचा खेळ सुखाचा</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;या विषयावर तसं या पूर्वी बऱ्याच जणांनी, बऱ्याच ठिकाणी लिहिले आहे पण तरीही मी पुन्हा लिहिणार आहे. एक तर ही पोस्ट लिहायची असे दीड वर्षापूर्वीच सुचले होते आणि तेव्हापासून मोडक्या-तोडक्या अवस्थेत ती ब्लॉगच्या अडगळीच्या ई-पानात बंद होती आणि काही केल्या लिहायचे होते पण जमत नव्हते. शिवाय लहानपणीचा विषय निघाला आहे तर तेव्हा एखादी गोष्ट तो करतो म्हणून मी पण करणार या त्या वेळच्या स्वभावास अनुसरून मला पण या विषयावर लिहायचे होतेच. बालपणीचे खेळ तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. लिहायला सुरुवात करणार तर प्रत्येक खेळाच्या कैक आठवणी. त्यातील निवडक आठवणी शेअर करतो आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-06qtH2XVGfk/Ts-eE48fwzI/AAAAAAAAA9A/6-ZUsScGGVc/s1600/playing-cards.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="187" src="http://4.bp.blogspot.com/-06qtH2XVGfk/Ts-eE48fwzI/AAAAAAAAA9A/6-ZUsScGGVc/s200/playing-cards.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;पत्ते हे आम्ही पार लहानपणापासून खेळत आलो आहोत. बैठ्या खेळांमध्ये सगळ्यात जास्त हाच खेळला असावा. आम्ही भावंडे गावी जमलो की न चुकता पत्त्यांचे डाव होतात. गावाच्या घरातच तशी काही जादू आहे म्हणून की तिथे फक्त पत्ते खेळल्याच्या आठवणी आहेत म्हणून ते काही ठाउक नाही पण एरवी वर्षभर आम्ही कधी पत्ते खेळत नाही आणि गावी गेलो की पुन्हा लहान होऊन पत्ते मांडून बसतो. त्यात पत्ते खेळण्याचा मोठ्या मंडळींना त्रास कमीच म्हणून त्यांचा ही काही आक्षेप नाही. रमी, मेंढीकोट, तीन-पानी,चॅलेंज,भिकार-सावकार, लाडू-लाडू,डॉंकी-मंकी,सात-आठ, पाच-तीन-दोन, गटार-उपसी,चटई-चटई, गुलामचोर, जोडपत्ता पासून सगळे खेळ आम्ही उकरून उकरून काढतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पत्त्यांची जादू ही आठवत असेलच न तुम्हाला ? लहान मित्रांना अशा जादू करून दाखवायच्या आणि भाव खायचा, मग कधीतरी त्याची युक्तीही 'कुणालाच सांगायची नाही !' या अटीवर सांगून टाकायची. म्हणजे या जादूचा वारसा तसाच पुढे चालू राहावा म्हणून...! पत्त्यांचे घर तर पत्ते खेळणाऱ्या प्रत्येकाने बांधले असेलच. सिनेमात दाखवतात तसे स्वप्नाळू नायिकेने बांधलेल्या पत्त्यांच्या घरापेक्षा आपण प्रथमच बांधलेले पत्त्यांचे घर आणि वाऱ्यापासून वाचवत ते पूर्ण झाल्यावर झालेला आनंद व्यक्त करत सगळ्यांना तो पाहायला बोलावणे हे आता कुठे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-tMf10Qdf9XM/Ts-eLsh6A3I/AAAAAAAAA9M/taeISEDeN7k/s1600/pa100053.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="148" src="http://2.bp.blogspot.com/-tMf10Qdf9XM/Ts-eLsh6A3I/AAAAAAAAA9M/taeISEDeN7k/s200/pa100053.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;नव्वदीच्या दशकात ट्रम्प कार्ड्सचा खूप बोलबाला होता. आमच्या मित्र मंडळीत बऱ्याच जणांकडे तसे WWF आणि क्रिकेटचे 'कॅट' होते. हाईट आणि वेट 'क्लॅश' होण्याची शक्यता ही यातच कळली आणि क्रिकेटचे चाहते असाल तर तेव्हाचे Big Fun आणि centre fresh यांनी काढलेले क्रिकेट कार्ड्स तर माहिती असायलाच हवेत. माझ्याकडे कित्तीतरी म्हणजे जवळपास हजारेक कार्ड्स जमले होते आणि ते अजूनही कुठल्याशा बॉक्स मध्ये ठेवले आहेत जपून. त्यातील काही आम्ही दुकानामधून ढापले ही होते हे सांगायला आता मला बिलकुल अपराधी वाटत नाही. कारण चिंगममध्ये इंटरेस्ट नव्हताच आम्हाला...! ट्रम्प कार्ड्स सारखे पैशाने विकत घ्यायचे खेळ तेव्हा परवडत नव्हते म्हणून मग आम्ही माचीसाचे कवर जमा करायचो. असे वेगवेगळे १००-२०० कवर जमवून त्यांनी तशाच प्रकारचा एक खेळ खेळायचो. तो बहुतेक नवीन शोध लावला होता आम्ही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बैठ्या खेळांमध्ये कॅरम आणि बुद्धिबळ जास्त लोकप्रिय असले तरी लहान असताना ते मोठ्यांना खेळताना पाहायला तितकेच आवडायचे. पत्ते खेळताना 'मला पण घ्या न...'म्हणणारी लहान मुले बुद्धिबळ बघताना कशी सिरीयस होऊन तो खेळ पाहत राहायची. अगदी लहान असायचो तेव्हा हा खेळ कधी समजायचाच नाही असे वाटायचे. केवढे डोके लावावे लागते हा खेळताना...कॅरम मध्ये हाताचे कौशल्य आणि अचूकता लागते पण बुद्धिबळात हुशारी आणि योग्य निर्णयक्षमता असावी लागते हे त्या भाबड्या मनास कसे कळायचे. तेव्हा तरी आम्ही या दोन्हीमध्ये प्रेक्षकच होतो पण कुतूहल मात्र भारी !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-ZgztvUqHfeU/Ts-d4JErK6I/AAAAAAAAA80/I6L3I75eli4/s1600/snakes_and_ladders.gif" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://1.bp.blogspot.com/-ZgztvUqHfeU/Ts-d4JErK6I/AAAAAAAAA80/I6L3I75eli4/s200/snakes_and_ladders.gif" width="200" /&gt;&lt;/a&gt;त्याशिवाय काही विकत आणलेले खेळ ही त्या-त्या वेळी खूप आवडते असत. सापशिडी आणि ल्युडो हे अगदी घराघरात पोहोचलेले खेळ. मजल-दरमजल करत, शिड्यांच्या सहाय्याने घर गाठायला यावे तर  ९८ वर सापाने गिळून पुन्हा १३ वर यावे. या उलट ल्युडो मध्ये सगळ्या चार सोंगट्या घरी पोचवण्याची घाई आणि शिवाय रस्त्यामध्ये शिकार करायची संधी आणि व्हायची भीतीसुद्धा ! त्याचे कवडे फेकताना ही त्यावर जादू फुकून टाकायचे म्हणजे हवे ते आकडे मिळतात. हे सारे खेळ पाहुणे मंडळी आली की विशेष उत्साहाने खेळले जात. सापशिडी पण महाग म्हणून गावी आठ-चल्लस ने जमिनीवर चौकोन आखून एक वेगळा खेळ मांडायचो. त्याचे नाव नाही आठवत. सोंगट्या असायच्या बांगड्यांचे तुकडे किंवा दगडी. आठ किंवा चल्लस पडल्या शिवाय डावाला सुरुवात नाही आणि पट आखायचे ते कोळशाने.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;सापशिडी प्रमाणेच 'नवा व्यापार' हा ही एकदम आवडीचा. हा खेळायचा म्हणजे भरपूर वेळ हवा. रविवारी दुपारी खेळायला घेतला तर सूर्य मावळतीला आला तरी पूर्ण होत नाही. सगळे खेळाडू नवी शहरे घेण्यात आणि तिथे घरे बांधून भाडे वसूल करण्यात दंग ! हा खेळ आम्ही बऱ्याचदा मोडायचा नाही म्हणून लिहून ही ठेवायचो...पुन्हा इथून पुढे सुरु करण्यासाठी...तो किती वेळा केला असेल ते काही आठवत नाही. 'व्यापार' सदृश असे नवनवे खेळ आलेही काही पण आमची पिढी रमली ती यातच. क्रिकेट आवडायचे म्हणून एक हिरवी चादर पसरलेला क्रिकेटचा खेळही आणला होता पप्पांनी. ज्यात ११ खेळाडू उभे करायचे आणि घसरगुंडीवरून पडणारा सिसम म्हणजे चेंडू एक होल्डरला जोडलेल्या बॅटने तटवायचा आणि बाउंडरी म्हणून कुंपणदेखील ! पण बसून बसून पाठ दुखून यायची मग संध्याकाळी खऱ्या-खुऱ्या क्रिकेटची ओढ लागायची.&amp;nbsp;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कागदी खेळांमध्ये 'नाव-गाव-फळ-फुल' आणि 'चोर-पोलीस'. अभ्यासाच्या वहीची पाने आईच्या नकळत फाडली जायची आणि एका पानावर सगळ्या खेळगड्यांची नावे आणि गुण. अर्धा ते एक तास खेळ झाला की 'टोटल'...मग मी पहिला, तू दुसरा आणि चोर कोण ? याने कल्लोळ नुसता...'जानेवारी-फेब्रुवारी' तर अजूनही खेळतो आम्ही...!&lt;br /&gt;&lt;br /&gt;फुल्ली-गोळा तर ऑल-टाईम फेवरेट. एका मिन्टात उरकण्याइतका छोटा खेळ. शिवाय मधले बोट ओळखा म्हणत एका हाताच्या पंजात दुसऱ्या हाताची बोटे वेडी-वाकडी लपवायची. नाही ओळखले तर ठेंगा ! अलीकडेच मी फुल्ली-गोळाचा प्लास्टिक गेम पण पाहिला. जुनेच खेळ नव्या रुपात पाहून आश्चर्य वाटले&lt;br /&gt;&lt;br /&gt;असेच आठवले...आमच्या लहानपणी काही कागदी फॉर्म मिळायचे ज्यावर १ ते १५ किंवा २० असे चौकोन असायचे आणि त्यावर चिकटवायचे ते विकत घेतलेल्या चॉकलेट सोबत मिळणारे कागदी लेबल. त्या लेबलने ठराविक पान पूर्ण झाले की मग त्यावर सायकल, टोपी, बॅट अशी बक्षिसे असायची. हिरो-हिरोईन पासून WWF असे वेगवेगळे फॉर्म आणि त्याचे लेबल...कमालीचे प्रसिद्ध होते तेव्हा !&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरात कुणीतरी चिमुरडा असायचा ज्याची पाटी आणि दगडी पेन्सिल सहज मिळायची. त्यात मामाच्या घरी जायचा रस्ता शोधायचा खेळ ही आवडता. एक लाईन दुसऱ्याला चिकटली नाही पाहिजे म्हणून अगदी जपून रस्ता काढत सांगितलेल्या आकड्यावर गाडी थांबायची. पाटीवरून आठवली ती 'दगडी पेन्सिल', कळायला लागल्यावरही जी चोखत राहायला आवडायची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-bAUp49r40_8/Ts-edlezN1I/AAAAAAAAA9Y/RJYgP_zu1YA/s1600/12p1.gif" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://3.bp.blogspot.com/-bAUp49r40_8/Ts-edlezN1I/AAAAAAAAA9Y/RJYgP_zu1YA/s200/12p1.gif" width="156" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;साबणाच्या पाण्याचे बुडबुडे हा दुपारचा उद्योग...गावच्या घरी माडीवर गॅलरीत उभे राहून बुडबुडे सोडायचे आणि लहान भावंडे ती पकडायला खाली. साबणाचे पाणी पण घरीच बनायचे. कपडे धुण्याची पावडर एका ग्लासात किंवा वाटीत घ्यायची आणि फुगे बनवण्यासाठी रिफील काढलेलं पेन किंवा शेविंग रेझरची दांडी. पण अगदीच हे नाही मिळाले तर मोठ्या कागदाची सुरळी करून पण हे फुगे बनवता येतात आणि ते अधिक चांगले बनतात हे आम्हाला उशीराने कळले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शाळा-कॉलेज मध्ये पेन फाईट हा कॅरम सदृश खेळ कोणी शोधून काढला असेल त्याचे आभार कारण त्यामुळे आमच्या बऱ्याच मधल्या सुट्ट्या रंगल्या होत्या. शेवटच्या पानावर ठिपके काढून आपल्या अक्षराचे बॉक्स बनवण्याचे खेळ तास चालू असतानाही खेळलो आहे. शाळेत तर वहीचे शेवटचं पान हे खेळ खेळण्यासाठीच असायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;"&gt;काय म्हणता ?&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;"&gt;बसून बसून पाठ दुखून आली...?चला तर मैदानावर!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मैदानी खेळांमध्ये तर रांगच आहे. क्रिकेट आणि फुटबॉल हे विदेशी खेळ सोडले ( ज्यांची हल्ली जास्तच 'क्रेज' आहे ) तरी भारतीय खेळांमध्ये कितीतरी खेळ आहेत आणि ते सगळे मैदानातच खेळायला पाहिजे असेही नाही तर अंगणात, गच्चीवर, मंडपात कुठेही जमू शकतात. 'आंधळी-कोशिंबीर' ह्या खेळात कोशिंबीर कुठून आली पण आम्ही कुणी विचारले नाही आणि बहुतेक कोणाकडे याचे उत्तर असेल असे वाटत नाही. एकाला डोळ्यांवर पट्टी बांधून तीन वेळा गोलाकार फिरवले की आंधळा कारभार सुरु...! 'ए-शुक शुक...इकडे-इकडे, धोका-धोका' असे बोलत, डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या मित्राच्या पाठीवर मारत खेळ रंगत जातो आणि चुकून सापडलो की आपल्या डोळ्यापुढे अंधार...पण राज्य येईल या भीतीने लांब राहिलो तर खेळाची मजा कुठे येणार ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;लपंडाव उर्फ लपाछपी हा कायम संध्याकाळसाठी राखून ठेवलेला खेळ असे. सकाळी किंवा दुपारी हा खेळण्यात मजा येत नाही. सूर्य मावळतीला आला की जणू लपलेले गडी अंधारात गुडूप होऊन जाणार आणि सापडता सापडणार नाही अशा भावनेने लपंडाव खेळायला हुरूप येतो. लपंडाव हे झाले पुस्तकी नाव, गल्लोगल्ली हा लपाछपी म्हणूनच जास्त 'फेमस' होता. राज्य आलेला गडी भिंतीकडे तोंड करून डोळे मिटून, चेहरा झाकून आकडे मोजणार आणि मोजून झाले की 'रेडी का ?'म्हणून विचारणार. 'नो रेडी' असा आवाज आला तर अजून मागे वळायची परमिशन नाही आणि मागून काही आवाज नाही आला तर मग मिशन सुरु. त्यात राज्य असणारा हातात पिस्तुल घेतल्याप्रमाणे शोधाशोध करणार. कुणी सापडलाच तर मग '.....ई-स्टोप' असे जोरात नाव घेऊन पिस्तुल रोखून ओरडायचे. पण लपणारे ही हुशार असत. ते एकमेकांचे शर्ट किंव टी-शर्ट बदलत आणि राज्य असणाऱ्याने त्याला पाहून चुकीचे नाव घेतले की मग 'अंड...!' नाहीतर सगळे मिळून 'धप्पा' करायला टपलेलेच असतात. ते ही सगळे एकत्र दिसले की लांब-लांब पळत नाव घेत -ई-स्टोप, ई-स्टोप ओरडायचे.मग पहिला कोण सापडला त्याच्यावर डाव...आम्ही बहुतेक कच्चे लिंबुच होतो तेव्हा म्हणून दादाच्या मागे-मागेच आमचं शेपूट...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-x-cQ4LbiV7o/Ts-h8D8k7PI/AAAAAAAAA98/F3_jHFb4iDg/s1600/crop2.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="153" src="http://2.bp.blogspot.com/-x-cQ4LbiV7o/Ts-h8D8k7PI/AAAAAAAAA98/F3_jHFb4iDg/s320/crop2.jpg" width="250" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;लगोरी उर्फ लिगोर्चा म्हणजे एकावर-एक थप्प्या मांडायच्या आणि बरोब्बर नेम लावून म्हणजे असा एक डोळा बंद करून चेहरा वाकडा-तिकडा करत चेंडू फेकायचा आणि दुसऱ्या टीमने चेंडू घेऊन आपल्याला आउट करायच्या आधी थप्पी पुन्हा लावायची. टिक्कर आणि थप्पीच्या खेळात काही चौकोन आखून थप्पी घेऊन ते पार करायचे असा काहीसा खेळायचे पण आमच्याकडे हा खेळ मुली जास्त खेळात त्यामुळे माहित असूनही खेळलो नाही कधी. तसे खेळायला बरेच खेळ होते पण काही आवडत नसायचे वा येत नसायचे म्हणून कधी खेळलोच नाही. डब्बा -ऐसपैस, आट्या-पाट्या सारखे खेळ आमच्या मित्र-मंडळींना कोणी शिकवलेच नसावेत म्हणून ते खेळ मुकलोच आम्ही. विटी-दांडू हा खेळ पण माहित असूनही फार खेळायलाच मिळाला नाही. विटीला ऐटीत उडवायचे आणि फिरवायचा दांडू की नजर दूर-दूरवर...एक तर एवढे खेळ खेळायला असत की सगळे खेळ खेळणे प्रत्येक वेळी शक्यच होत नसे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-ovlYiXnLznI/Ts-ifYE1DnI/AAAAAAAAA-I/E2OA5YE9tYQ/s1600/images.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="162" src="http://4.bp.blogspot.com/-ovlYiXnLznI/Ts-ifYE1DnI/AAAAAAAAA-I/E2OA5YE9tYQ/s200/images.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;लगोरी प्रमाणे आबादुबी म्हणजे चेंडूची हाणाहानी...प्लास्टिक चेंडूने जास्तच मजा ! चेंडू वरून आठवले तेव्हा 'क्रेझी बॉल्स' मिळायचे जे टणाटण उडायचे पण ते महाग असत त्यामुळे कधीतरी हरवला की पुन्हा घ्यायला पैसे मिळत नसत. आम्हाला जास्त लागायचे ते रबरी बॉल्सच.लंगडी हा खेळ खेळायचा तर जितके जास्त जण तितकी मजा जास्त. एक पाय गुडघ्यात दुमडून एका पायावर पळत सगळ्यांना 'आउट' करायचे आणि नुसतेच हात लावून आउट नाही करायचे तर जोरात धपाटा हाणायचा पाठीत.यात बऱ्याचदा धडपडून गुडघे फुटले होते, खरचटले होते पण म्हणून थांबणार कोण ? शाळेत आम्ही छोट्या वर्गात असे पर्यंत तर मुला-मुलींची एकत्र लंगडी जमायची.त्यात शिवाय किती जणांना आउट केले हे ही मोजले जायचे म्हणजे इज्जत का सवाल!  हे असले खेळ कॉलेजमध्ये असताना का नाही झाले ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;खो-खो आणि कबड्डी सारखे खेळ मात्र जास्त करून शालेय स्पर्धापुरतेच मर्यादित राहिले. आवडीने मित्रांनी जमून खेळण्यासाठी हे कधी 'फेवरेट' नव्हते. खो-खो मध्ये शाळेत पण असे काही नियम होते की आउट केले तर 'आउट' बोलायचे नाही, नाही तर आउट झालेला आउट नाही. कबड्डी मध्ये पण कबड्डी किंवा हुतुतू जे बोलायचे असेल ते सिनेमात लीप मुवमेंट करत तशा फक्त पुटपुटायच्या. मग कोणी बोललेच तर 'बोलतोय ना...' असे डोळ्यांनीच खुणावत आवाज वाढवायचा...&lt;br /&gt;&lt;br /&gt;गोट्या हा खेळ पण फार लोकप्रिय कारण खेळाचे साहित्य फार काही महाग नाही. मातीमध्ये कुठेतरी खड्डे खणायचे आणि एक वित- दोन वित मोजत नेम लावायचे. नेम लागल्याचा आनंद एक विलक्षण असायचा. गोट्यांचा खेळ आमचा तासंतास रंगायचा. बहुतेक सकाळीच !गोट्यांमध्ये एखादी दुधाळ,पांढरी गोटी लकी समजली जायची. ती हरवून नाही द्यायची. शिवाय नेमबाजीसाठी एखादा खास मोठा 'ढंपर' असायचा. कोयबा हा देखील गोट्यांसारखाच पण खेळला जायचा दगडी पांढऱ्या गोट्यांनी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-VYD1-sOeZQ8/Ts-hV9c0jFI/AAAAAAAAA9k/YO0MMiDqq-I/s1600/kanche.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="149" src="http://1.bp.blogspot.com/-VYD1-sOeZQ8/Ts-hV9c0jFI/AAAAAAAAA9k/YO0MMiDqq-I/s200/kanche.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;गोट्यांप्रमाणे भोवरा हाही अतिफेवरेट खेळ. कोल्ड्रिंक बाटल्यांचे बिल्ले भोक पडून जाळी गुंफायची आणि गुंडाळला भोवरा सर्रकन जमिनीवर वा डायरेक्ट हातावर घ्यायचा. तो तसा घेणे किंवा जमिनीवरून हातावर घेणे हे पहिल्या-पहिल्यांदा फारच कठीण काम वाटायचे. कित्येक भोवरयांना टोकदार खोपचे पडायचे आणि त्यात प्रतिस्पर्ध्यांचे कौशल्य दडलेले. कानावर जाळी घेऊन दुसऱ्या भोवऱ्याला पार करायचे असा ही काही नियम असल्याचे आठवतेय. ह्या बिल्ल्यांवरून आठवले, मुली जशा काचापाणी खेळत तसे आम्ही बिल्ल्यांनी खेळायचो. असे नाविन्यपूर्ण खेळ प्रत्येकाने आपापल्या बालपणी खेळले असतातच. खेळ कोणी आणि कसा बनवला ते महत्त्वाचे नसतेच आनंद महत्त्वाचा !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-qP9ndobLkcE/Ts-i3GCqslI/AAAAAAAAA-U/XjpIkWC8gLs/s1600/4897169142_fa9a4becc7.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="136" src="http://4.bp.blogspot.com/-qP9ndobLkcE/Ts-i3GCqslI/AAAAAAAAA-U/XjpIkWC8gLs/s200/4897169142_fa9a4becc7.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;सायकल चालवणे हा देखील तेव्हा एक खेळच होता. आजकालच्या प्रमाणे तेव्हा प्रत्येक कडे सायकली नव्हत्या आणि घरी विकत घ्यायची तर सगळे मित्र मागत राहतील म्हणून टाळाटाळ केली जाई. तेव्हा सगळे मित्र भाड्याने सायकली विकत घ्यायचो- एक किंवा अर्धा तास आणि मग वाऱ्याशी स्पर्धा. टायर किंवा चाकाचे चक्र एका तारेने पळवत नेण्याचा उद्योग ही एक आगळा-वेगळा खेळ. मला ते लहान असताना जमत नसायचे तर पप्पांनी एका लाकडी काठीला एक छोटे चाक खिळ्याने ठोकून दिले म्हणजे मोठे मित्र हे खेळायला पळत सुटले की माझी ही काठीची गाडी त्यांच्या मागे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पतंग उडवायचे तर थंडीतच...संक्रांती जवळ आली की बाजार आपोआप पतंगांनी भरले जात. फिरकी धरायला आम्ही आणि पतंग उडवायला दादा. मांजा पण कसा धारदार! ''बदव...बदव अजून...अरे ढील दे ना...''आणि पतंग कटली की धावाधाव...एकदा आमचा एक मित्र अशीच पतंग पकडण्याच्या नादात एका काट्याच्या झाडात जाऊन अडकला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-CPgEzkL5lYw/Ts-h0N0lJjI/AAAAAAAAA9w/11QCrc_30QI/s1600/kite_reel.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="120" src="http://3.bp.blogspot.com/-CPgEzkL5lYw/Ts-h0N0lJjI/AAAAAAAAA9w/11QCrc_30QI/s200/kite_reel.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;कांदा-फोडी मध्ये ही 'कांदा-फोडी' हे नाव कसे हे न विचारता एक-एक लेवल पार करत उद्या मारणे सुरु व्हायचे.त्यात मी लहानपणापासूनच उंच म्हणून सगळे माझ्या पाठीवरून उडी मारताना माझ्यासकट धडपडायचे. संगीत-खुर्ची, चमचा-गोटी सारखे खेळ सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा मध्ये जास्त खेळले गेले. तळ्यात-मळ्यात, डोंगर का पाणी हेही खेळले जात अधून-मधून...'डोंगराला आग लागली पळा..पळा' आठवतंय की नाही अजून ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदम लहानपणी 'शिवाजी म्हणतो' तसंच करायचं असं आजीने शिकवले आणि त्याचाही एक खेळ झाला...टीपी-टीपी..टीप-टोपं म्हणत कोणता रंग म्हटला की सांगितला रंग शोधायची काय धावपळ. अमुक एकाच्या शर्टावर रंग सापडला तर सगळे त्याला लटकलेले आणि सापडायच्या आधी पकडला की बाद. गावी असलो की आम्ही मंदिराच्या आवारात 'आईचं पत्र हरवलं....तेSSS मला सापडलं' खेळायचो. खेळून बरीच वर्षे झाल्याने अस्पष्टसा आठवतोय. पण ही ओळ आणि तिचा ठेका अजूनही कानात घुमतोय- गाभाऱ्यात घुमणाऱ्या आवाजासारखा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खुपसनी हा खेळ खास पावसाळी खेळ...लोखंडी सळ्या भिजल्या मऊ मातीत खुपसत अंतर कापत जायचे. सळी पण अशी जोरात फेकायची की ऐटीत उभी राहिली पाहिजे मातीत.आणि हरणार तो लंगडी घालत जिथून सुरुवात केली तिथपर्यंत येणार...पावसाळी दिवसात रस्त्याच्या कडेने वाहणारे पाणी असेल की आम्ही आपापले पान त्यात सोडून वाहवत न्यायचो. पाण्यात होड्या सोडण्यापेक्षा ही हे अधिक प्रिय होते आम्हाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काहीच नाही तर मग पकड-पकडी किंवा झटापटी आहेच. हल्ली पिकनिकला गेलो तर शक्य असूनही हे खेळ कोणी खेळत नाही. तिथे सो-कॉल्ड प्रोफेशनल खेळच खेळले जातात. टीम-वर्क चा चांगला धडा देणारे साखळी-साखळी,खांब-खांब, विष-अमृत सारखे खेळ आजची पिढी खेळते असे वाटत नाही. अमुक एका मित्राला विष दिले तर आउट व्हायची भीती असूनही त्याला अमृत देऊन आपल्यात घेणे हे शिकण्यासारखे आहेच ना?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;'टॅमप्लीज' हा प्रकार खेळ सुटले तसा परत दिसलाच नाही.टॅमप्लीज म्हणजे आपण सुरक्षित आहोत. म्हणजे ऑफिस मध्ये एखाद्या महत्त्वाच्या मीटिंग दरम्यान आपण बॉसला मनगटावर थुकी लावून 'टॅमप्लीज' म्हणून बाहेर गेलो तर कसे वाटेल ना ? किंवा असेच 'जास्ती की मेजॉरिटी' असे हात पालथा की सरळ ठेवत सुटण्यातली गंमत कुठे हरवली ? त्या सुटण्यात काय तर दिलासा मिळायचा ! 'राज्य' आपल्यावर नाही !! आणि सुटलो की गुडघ्या खालून हात घालत टाळी वाजवायची. आता मजा करायला मोकळे किंवा राज्य असणाऱ्या मित्राला छळायला तरी !&lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून एक आठवले ते म्हणजे -टीम पाडायच्या युक्त्या. एक तर दोन गटप्रमुख एक-एक जन निवडणार नाही तर मग नाव पाडून या असा आदेश दिला जायचा- मग मी आंबा-तू पेरू, मी वाघ- तू सिंह, मी ढवळ्या- तू पवळ्या...आणि मग ढवळ्या पाहिजे का पवळ्या पाहिजे हे विचारले जायचे. यातून निर्माण होणारी गटबाजी खेळ संपताच मोडली जायची हे किती बरे होते.कट्टी-बट्टीचे रुसवे फुगवे आता कायम स्वरूपी भांडणात बदलले आहेत. हल्ली त्याला 'पॅच-अप' असेही आधुनिक नाव मिळाले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाप रे...कित्ती खेळ झाले...किती तरी विस्मरणात ही गेले...आठवतो तो फक्त किलकिलाट...लुटुपुटूची भांडणे, दंगा-मस्ती आणि हसरे चेहरे...आता सुद्धा कित्येक जण हे खेळ आठवून जुन्या आठवणीत रमले असतील पण पुन्हा खेळावेसे वाटले तरी खेळतील का ? आता मोठे झालो म्हणून, लोक हसतील म्हणून का आपण आपले सुखाचे क्षण गमावून बसायचे...जुन्या स्मृतींना उजाळा देण्यापेक्षा पुन्हा आयुष्यभर पुरेल असे सोहळे साजरे केले तर काय वाईट आहे का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेख बराच मोठा झालाय...पण आठवणीच इतक्या की संपता संपेना...बऱ्याचशा गोष्टी तर मेंदूला ताण देऊन आठवाव्या लागल्या. इतक्या दूर राहिल्या का त्या आठवणी ? पण लिहिता लिहिता चेहऱ्यावर हसू आले आहे. वाटतंय पुन्हा लहान व्हावं, शाळेच दप्तर टाकून खाली खेळायला पळावं आणि दमून आल्यावर हात-पाय धुवून शांत पडावं. आई बोलावतेय जेवायला आणि मी इकडे झोपेच्या आहारी...कसलीच चिंता नाही...काही नाही...शांत शांत !&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्हाला आजूबाजूचे काही ऐकू येतंय की गेलात तुम्हीही भूतकाळात ?&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-3680669882402630151?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/3680669882402630151/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/11/blog-post_26.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/3680669882402630151'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/3680669882402630151'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/11/blog-post_26.html' title='बालपणीचा खेळ सुखाचा'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-06qtH2XVGfk/Ts-eE48fwzI/AAAAAAAAA9A/6-ZUsScGGVc/s72-c/playing-cards.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-1319985232851199176</id><published>2011-11-18T15:07:00.000+05:30</published><updated>2011-11-18T15:07:42.266+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सहज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आनंदी-आनंद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='२०११'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वाढदिवस'/><title type='text'>दुसरा वाढदिवस</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;गेलं वर्ष इतक्या लवकर कसं गेलं कळलंच नाही आणि हे असं दरवर्षी होतं. नव्या वर्षी, वाढदिवशी, सणासुदीला मागे वळून पाहिलं तर गेल्या वर्षीच्या घटना अगदी ताज्या वाटतात. यंदा अभ्यासात, कामात जरा जास्त बिझी झाल्याने ब्लॉगकडे दुर्लक्ष झाले खरे ( ते नेहमीच होत राहील बहुधा ) पण म्हणून वाढदिवस विसरून चालणार नाही. &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-hFrn9QV75yI/TsU107RPMtI/AAAAAAAAA8k/NleczN1yZEk/s1600/6a00e54f86af5688330120a5aa7ad0970c-800wi.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="286" src="http://2.bp.blogspot.com/-hFrn9QV75yI/TsU107RPMtI/AAAAAAAAA8k/NleczN1yZEk/s320/6a00e54f86af5688330120a5aa7ad0970c-800wi.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;तसं दुसऱ्या वाढदिवसाचं पहिल्या वाढदिवसाइतकं कौतुक नसलं तरी निदान या पोस्टच्या निमित्ताने मी जीवंत असल्याची (ब्लॉगवर) वाचकांना खात्री पटावी आणि ब्लॉगिंगला कंटाळून मी हे ब्लॉगविश्व सोडल्याच्या अफवा पसरू नयेत असाही हेतू आहे. शिवाय कासवाच्या गतीने चालणाऱ्या ब्लॉगच्या पोस्टसंख्येत अजून एक भर. त्यामुळे दरवर्षी वाढदिवशी तरी एक पोस्ट टाकावीच असा संकल्प आहे जो शक्यतो मोडला जाणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिल्या वाढदिवशी ब्लॉगिंगच्या अनुभवाबद्दल एवढे काही लिहिले की या वेळेस वेगळे काही लिहायला सुचत नाहीये. आणि यंदा ब्लॉगने विशेष आणि कौतुकास्पद असे काहीही केले नसल्याने त्याबद्दल उल्लेख करण्याजोगेही काही नाहीये. पण जे काही आहे ते आपलं आहे आणि कशीही का असो आपलीही एक पतंग आकाशात उडते आहे याचा आनंद आहेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाढदिवसाचे आमंत्रण सगळ्यांना दिले आहेच, शुभेच्छा द्यायला विसरू नका...:)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-1319985232851199176?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/1319985232851199176/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/11/blog-post_18.html#comment-form' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/1319985232851199176'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/1319985232851199176'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/11/blog-post_18.html' title='दुसरा वाढदिवस'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-hFrn9QV75yI/TsU107RPMtI/AAAAAAAAA8k/NleczN1yZEk/s72-c/6a00e54f86af5688330120a5aa7ad0970c-800wi.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-7666774721747214678</id><published>2011-11-14T16:50:00.000+05:30</published><updated>2011-11-22T12:44:18.406+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपट'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्लॅमर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रॉकस्टार-Rockstar'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनोरंजन'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रणबीर-Ranbir'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गाणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='संगीत'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='समीक्षा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रहमान-Rahman'/><title type='text'>'आर' फॉर रॉकस्टार</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;"११.११.११" &amp;nbsp;जगभर लोक ह्या खास तारखेचे गुणगान गात आपापल्या तऱ्हेने साजरा करत होते पण आम्ही 'रहमान भक्त' मात्र संकष्टीला गणपती मंदिरात, महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी करावी तसे न चुकता पहिल्याच (आणि इतक्या खास) दिवशी जमलो ते रॉकस्टार पाहायला. त्यापूर्वीचे कितीतरी दिवस मोबाईलवर, लॅपटॉपवर, टी. व्ही. वर फक्त रॉकस्टारची गाणी ऐकून धन्य झालो होतो तो आता मोठ्या पडद्यावर ती ऐकायला आणि पाहायला मिळणार म्हणून जरा जास्तच उत्सुक होतो.पहिल्या पाच मिनिटात होणारी रणबीरची एण्ट्री आणि अगदी आवेषात मोठ्या जनसमुदायासमोर त्याचा रॉकिंग परफॉर्मन्स पाहून उत्सुकता एकदम वाढु लागते. लगेचच मग चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जाऊन कॉलेजयुवक रणबीर हातात गिटार घेऊन गाताना दिसू लागतो. '&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=sbDy_elJxGs&amp;amp;feature=BFa&amp;amp;list=ULl2bgVITJjVA&amp;amp;lf=mfu_in_order"&gt;जो भी मैं कहना चाहू..&lt;/a&gt;' &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-BkOd1XO2eeg/TsDlEUKFHTI/AAAAAAAAA7A/yPIHl7VTW3I/s1600/Jo-Bhi-Main-Rockstar-Movie-Track.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="158" src="http://1.bp.blogspot.com/-BkOd1XO2eeg/TsDlEUKFHTI/AAAAAAAAA7A/yPIHl7VTW3I/s320/Jo-Bhi-Main-Rockstar-Movie-Track.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;इथून मग हीर(नर्गिस) आणि जनार्दन उर्फ जॉर्डनची &amp;nbsp;(रणबीर) गोष्ट सुरू होते. मोठा कलाकार बनायचे तर आयुष्यात दु:ख हवे या भावनेने प्रेरित होऊन 'जॉर्डन' त्याच्या कॉलेजमधील 'दिल तोडने की मशीन' 'हीर' ला प्रपोझ करतो आणि तिने नकार दिल्यावर दु:खी झाल्याचे नाटक करतो. पण पुढे दोघांची चांगली मैत्री होते आणि मजा-मस्ती चालू राहते.चित्रपटात नायिकेच्या वाटेला केवळ एकच गाणे आहे...'&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=l2bgVITJjVA&amp;amp;feature=BFa&amp;amp;list=ULCXmaFeiVoSE&amp;amp;lf=mfu_in_order"&gt;कटिया करूँ&lt;/a&gt;' पण ते सुंदर जमले आहे. जिथे-जिथे हीर आणि जॉर्डन बाइकवर आहेत तिथे हे गाणे पेरले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-RMoW9uPPlhQ/TsDlK0pEtdI/AAAAAAAAA7M/8zCOvyaHi9A/s1600/Katiya%2Bkaroon%2Brockstar%2Bnew%2Bsong%2Blatest%2Bsong%2Bankur%2Bsoni%2Bfilmy%2Bfuntoosh%2Bankur%2Bsoni%2Branbir%2Bkapoor%2Bnargis.JPG" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="149" src="http://2.bp.blogspot.com/-RMoW9uPPlhQ/TsDlK0pEtdI/AAAAAAAAA7M/8zCOvyaHi9A/s320/Katiya%2Bkaroon%2Brockstar%2Bnew%2Bsong%2Blatest%2Bsong%2Bankur%2Bsoni%2Bfilmy%2Bfuntoosh%2Bankur%2Bsoni%2Branbir%2Bkapoor%2Bnargis.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;हीर जॉर्डन बरोबर पळून जाईल असे वाटते असते पण तसे काही होत नाही. हीरचे लग्न होते आणि तिच्या लग्नासाठी म्यूज़िक कंपनीला विसरून कश्मीरला गेलेला जॉर्डन घरी परततो. '&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=zGtr4H8Bhyc"&gt;फिर से उड चला&lt;/a&gt;' हे गाणे अर्धवट घेण्यात आले आहे. इथे गाडी घसरते. हीरच्या लग्नाला त्याचे जाणे, घरच्यांनी त्याला घराबाहेर काढणे, त्याचे दर्ग्यात दोन महिने राहणे या घटना जुळवून आणल्यासारख्या वाटतात. '&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=GGUiQ1_IR9s"&gt;कुन फाया कुन&lt;/a&gt;' हे पुन्हा एक मास्टरपीस. रहमान अशा गाण्यांमध्ये जे काही करतो, जे काही गातो ते इतर कोणाला जमत नाही. अशा गाण्यांमध्ये गिटारपीस टाकून तो इतक्या सहजपणे एकरूप करून टाकणे हे सूचणे आणि ते करणे म्हणजेच महान बाब आहे. 'कुन फाया कुन' सारखे गाणे वैयक्तिक पातळीवर अतिउत्तम असले तरी चित्रपटात तितका परिणाम साधत नाही. &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-mDDVCfFxakc/TsDlSHxhKvI/AAAAAAAAA7Y/bMXb_TNyzro/s1600/ranbir-kun-faaya-kun-song-rockstar.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="163" src="http://4.bp.blogspot.com/-mDDVCfFxakc/TsDlSHxhKvI/AAAAAAAAA7Y/bMXb_TNyzro/s320/ranbir-kun-faaya-kun-song-rockstar.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;इथून पुढे जॉर्डनचा गायक म्हणून प्रवास सुरू होतो. पण सामान्य गायकांच्या पठडीत तो बसणारा नसल्याने म्यूज़िक कंपनीशी खटके उडत राहतात. '&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=k_Pak8Cz3Ho"&gt;शेहर मे&lt;/a&gt;' सारखे गाणे ऐकायला नाही मिळाले याचे फार वाईट वाटले. रहमानने गाणे वाटावे असे ते बिलकुल रचले नाहीये. सीडी मध्ये हे गाणे नसते तर 'मेकिंग ऑफ...'म्हणूनच ते ओळखले गेले असते.पण आधीच अकरा गाणी त्यात तीन तासांच्या जवळपास चित्रपटाची लांबी त्यामुळे कुठेतरी कात्री लावायची ती गाण्यांना लागली आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. चित्रपटात मात्र त्याचा 'शेहर' आल्बम हिट होतो आणि त्याला प्रसिद्धी मिळू लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;युरोपला जाण्याची संधी मिळणार असल्याचे ऐकून जॉर्डन सर्व अटी मान्य करून कांट्रॅक्ट साइन करतो. 'हीर'च्या शोधात 'प्राग' ला पोहोचलेल्या जॉर्डनला ती भेटतेही. तिच्या बोरिंग आयुष्यात तो आल्याने पुन्हा नवे रंग भरतात.' &lt;a href="http://www.youtube.com/watch?v=S14wvBNc5Tc"&gt;हवा हवा&lt;/a&gt;' मधे रहमानची प्रयोगशीलता मोहीतच्या आवाजावर झाली आहे. मोहितच्या यॉडलिंगने तर किशोरदांची आठवण करून दिली. रहमानसरांनी यात एकाहून एक अशी गाणी दिली आहेत की काही वेळेस ती चित्रपटास मारकही ठरली आहेत. लोक कथानक विसरून गाण्यात जास्त हरवून जातात. अर्थात यात कथानकाचा काही दोष आहेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=LZ7-UZt5zaE"&gt;और हो&lt;/a&gt;' गाणे झक्कास झालाय. ते नेमक्या वेळी येते आणि परिणाम साधते. या गाण्यातून त्याची रॉकस्टारची प्रतिमा अधिक ठळकपणे समोर येते. '&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=2V1WBx7e4Bs"&gt;साड्डा हक़&lt;/a&gt;' हे गाणे म्हणजे प्युअर रॉकस्टारला शोभणारे आहे. हे संपूर्ण गाणे, त्याचे शब्द, त्यातील रणबीरचे भाव सगळे आग लावते पण गाणे कथानकात अगदीच घुसखोरी करून आल्यासारखे वाटते. म्हणजे जे आहे ते छान आहे पण ते का आहे आणि त्याचा कथानकाशी संदर्भ काय हे कळत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-RYEZ7DcCbfA/TsDpMb1i8YI/AAAAAAAAA7w/xvMpnhZxtBY/s1600/Sadda%2Bhaq%2Branbir%2Bkapoor%2Brockstar%2Bnargis%2Bankur%2Bsoni%2Bfilmy%2Bfuntoosh%2Bnew%2Bsong%2Blatest%2Bbollywood.JPG" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="137" src="http://2.bp.blogspot.com/-RYEZ7DcCbfA/TsDpMb1i8YI/AAAAAAAAA7w/xvMpnhZxtBY/s320/Sadda%2Bhaq%2Branbir%2Bkapoor%2Brockstar%2Bnargis%2Bankur%2Bsoni%2Bfilmy%2Bfuntoosh%2Bnew%2Bsong%2Blatest%2Bbollywood.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;हीरच्या परत येण्याने कथानकाचा वेग पुन्हा मंदावतो. रॉकस्टार म्हणून उफाळलेला ज्वालामुखीही थंडावतो. दिग्दर्शकाला या चित्रपटातून बरेच काही सांगायचे आहे पण जे काही सादर केले ते ही कमीच पडले असे वाटते. शेवटी शेवटी पुन्हा '&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=uomfRRDIkZk"&gt;नादाँ परिंदे&lt;/a&gt;' च्या वेळेस रॉक म्यूज़िक ऐकल्याचा आनंद मिळतो पण तो पर्यंत बरेचजण कंटाळून जातात. चित्रपटाचे कथानक तसेही क्लिष्ट आहे. उत्तरार्धात कथानक खूपच झोके घेत राहते त्यामुळे हातातली मॅच पडत धडपडत जिंकल्यासारखी वाटते. चित्रपटाची लांबी जास्त असल्यामुळे प्रेक्षकांचा 'मेमरी लॉस' होण्याची शक्यता आहे कारण खूप सार्‍या घटनांचे संदर्भ जुळवावे लागतात त्यात प्रेक्षक गोंधळून जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-IzrZyBbCar8/TsDvs7_gqfI/AAAAAAAAA8M/jvvq7k2KGdo/s1600/nadaan+parinde+parindey+rockstar+2011+ranbir+kapoor+imtiaz+ali+a+r+rahman+hd+720p+video+song+high+quality+definition+desi+indian+2.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="136" src="http://4.bp.blogspot.com/-IzrZyBbCar8/TsDvs7_gqfI/AAAAAAAAA8M/jvvq7k2KGdo/s320/nadaan+parinde+parindey+rockstar+2011+ranbir+kapoor+imtiaz+ali+a+r+rahman+hd+720p+video+song+high+quality+definition+desi+indian+2.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;'&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=LcIsOnNOlEQ"&gt;तुम हो पास मेरे&lt;/a&gt;' आणि '&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=5uqTFiIFla8"&gt;तुम को पा ही लिया&lt;/a&gt;' ही केवळ दोन गाणी रोमॅंटिक सदरात मोडणारी आहेत. एकाच ट्रॅकवर थोडेफार बदल करून मेल आणि फीमेल वर्जन रेकॉर्ड करण्यात आले आहे आणि दोन्ही गाणी अप्रतिम झालीयेत यात काही आश्चर्य नाही. ही दोन्ही गाणी मी बॅक-टू-बॅक बर्‍याचदा ऐकली आहेत आणि जे गाणे ऐकतो आहे ते मागच्या गाण्याहून चांगलेच वाटते. ( कितीतरी वेळा) फीमेल वर्जन चित्रपटात तर केवळ दोन ओळींचे घेतले आहे पण मेल वर्जन पूर्ण असूनही ते चित्रपटाच्या शेवटी आहे आणि चित्रपट संपला म्हणून गाणे न ऐकताच लोक थियेटर बाहेर पडत होते (मूर्ख!)! चित्रपटाची लांबी हे ही कारण असेल त्याला पण रहमानची गाणी न ऐकता थियेटर बाहेर जाणे म्हणजे 'गाढवाला गुळाची चव काय?' &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-I0PmywBzi8o/TsDpZJN6SKI/AAAAAAAAA78/LJcWDyOhnxE/s1600/tum%2Bho%2Brockstar%2B2011%2Bfull%2Bhd%2B%2B1080p%2Bvideo%2Bsong%2Bhigh%2Bdefintion%2Bquality%2Branbir%2Bnargis%2Bsmall%2Bsize%2Bdesi%2Bindian%2B9.png" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="136" src="http://1.bp.blogspot.com/-I0PmywBzi8o/TsDpZJN6SKI/AAAAAAAAA78/LJcWDyOhnxE/s320/tum%2Bho%2Brockstar%2B2011%2Bfull%2Bhd%2B%2B1080p%2Bvideo%2Bsong%2Bhigh%2Bdefintion%2Bquality%2Branbir%2Bnargis%2Bsmall%2Bsize%2Bdesi%2Bindian%2B9.png" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;रणबीर या चित्रपटातून 'स्टार' म्हणून उदयास आला आहे. त्याचा वावर, आत्मविश्वास, अभिनय हा सर्वथा 'रॉकस्टार' म्हणून साजेसा आहे. नर्गिसला अभिनयास वाव असूनही तिला भाव खाता आलेला नाहीए. तिचा नवखेपणा जाणवत राहतो. रणबीर समोर तरी ती फिकी वाटते (अभिनयाच्या बाबत)! रणबीर जसा यातून रातोरात स्टार झाला आहे तसाच 'मोहित चौहान' ही झाला आहे. रहमानच्या परिसस्पर्शाने त्याचे सोने झाले आहे. कधी न कल्पलेल्या रचना तो इथे गाऊन गेलाय. शम्मीजींना पुन्हा पडद्यावर पाहून आनंद जाहला. शहनाईवादक म्हणून ते शोभून दिसतात. चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्यांचा पोस्टर झळकतो आणि त्यांच्या काळी ते ही 'रॉकस्टार' होते याची आठवण करून देतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जाता जाता, परीक्षण वाचून चित्रपटाची योग्यता ठरवू नका. त्याचे बारकावे शोधून हिरमोड करून घेण्यापेक्षा मनोरंजन म्हणून पाहिला तर चित्रपट सुंदर आहे. प्रेमकथा आणि एका रॉकस्टारचा प्रवास यात कथानक दोन होड्यांवर पाय ठेवून जाते. चित्रपट मित्रांसोबत पाहणार असाल तर रॉकस्टारची कथा म्हणून पाहा आणि मैत्रिणीसोबत पाहायचा असेल तर प्रेमकथा म्हणून पाहा. म्हणजे पैसा वसूल झाल्याचा आनंद तरी मिळेल.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-7666774721747214678?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/7666774721747214678/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/11/blog-post.html#comment-form' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7666774721747214678'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7666774721747214678'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='&apos;आर&apos; फॉर रॉकस्टार'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-BkOd1XO2eeg/TsDlEUKFHTI/AAAAAAAAA7A/yPIHl7VTW3I/s72-c/Jo-Bhi-Main-Rockstar-Movie-Track.jpg' height='72' width='72'/><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-987338364477195495</id><published>2011-08-28T15:27:00.003+05:30</published><updated>2011-11-14T17:09:39.911+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बाप्पा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपट'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मोरया'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अवधूत गुप्ते'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गणपती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कला'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='समीक्षा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सण'/><title type='text'>मोरया- जल्लोष की आक्रोश...!!</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;i&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;&lt;b&gt;तूच माझी आई देवा तूच माझा बाप&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;i&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #20124d;"&gt;&lt;b&gt;गोड मानूनी घे सेवा पोटी घाल पाप...&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;/i&gt;&lt;br /&gt;या ओळींसह चित्रपटाची सुरूवात होते आणि सोबतीला सगळ्यांच्या लाडक्या लालबागच्या  राजाची मिरवणूक. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशाच्या नावाने करावा तशी 'मोरया' चित्रपटाची सुरूवात ही या गाण्याने आणि ज्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहतात अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते. &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-Tk1TIINxKqA/TloKuc6vmPI/AAAAAAAAA6c/YQHrF1-pjV0/s1600/Morya%2BMarathi%2BMovie%2BAvdhoot%2BGupte%2B101.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://1.bp.blogspot.com/-Tk1TIINxKqA/TloKuc6vmPI/AAAAAAAAA6c/YQHrF1-pjV0/s400/Morya%2BMarathi%2BMovie%2BAvdhoot%2BGupte%2B101.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;(अवधूत गुप्ते ज्यांनी या चित्रपटाचे संगीत आणि दिग्दर्शन अशा दोन्ही बाजू सांभाळल्या आहेत त्यांनी हल्लीच एका मुलाखतीत सांगितले की 'मोरया' चित्रपट करायचा ठरला तेव्हाच म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी ही लालबागच्या राजाची मिरवणूक रेकॉर्ड करायचे ठरवले. तब्बल १० तासाच्या रेकॉर्डिंग पैकी जेमतेम ५-६ मिनिटांची दृश्‍ये या चित्रपटात वापरली आहेत. परंतु ती प्रदीर्घ शूटिंग पाहताना कधीच कंटाळा येत नाही. प्रत्येक भाविकच्या चेहऱ्यावरील भाव, ढोल -ताशाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे भक्तगण पाहताना आपणही हरवून जातो.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;'गणेश चाळ' आणि' खटाव चाळ' या मुंबईतील दोन जुन्या चाळी आणि तेथील २० वर्षांची परंपरा लाभलेले दोन गणेश मंडळे या पार्श्वभूमीवर कथानक आकार घेते. मनोज शिंदे उर्फ मन्या (संतोष जुवेकर) आणि समीर सय्यद (चिन्मय मांडलेकर) हे दोघे अनुक्रमे गणेश चाळ आणि खटाव चाळीचे प्रतिनिधित्व करतात. आपापली गणेश मंडळे सांभाळणारे हे दोघे आणि त्यांची मित्रमंडळी कायम एकमेकांशी स्पर्धा करू पाहतात. मग ती दहीहांडी असो वा गणेशोत्सव प्रत्येक ठिकाणी ते प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे राहतात. या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे ' दिलीप प्रभावळकर' . या दोघांच्या भांडणामध्ये कायम त्यांना समजावून सांगणारे, त्यांची कान उघडणी करणारे 'काका'. गणेशोत्सवाचा मूळ हेतू विसरला जाऊन आपण कसे गटबाजी करून एकमेकांशी स्पर्धा करत आहोत याची वेळोवेळी या दोघांना जाणीव करून देऊनही ते आपला हट्ट काही सोडत नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गणेशोत्सवाला सुरुवात होते तशा चित्रपटात वेगवान घडामोडी होऊ लागतात. मन्या आणि समीर नवनवे डाव टाकून आपल्या गणपतीची शेवटची उत्तरपूजा होणार नाही यासाठी शक्य ते सर्व काही करतात पण लढाई जिंकायची तर पैसा लागणार आणि म्हणून दोघेही नाईलाजास्तव राजकारण्यांशी हातमिळवणी करतात. इथून पुढे मग ते स्वत:च आपल्या डावाचे बळी ठरत जातात. या सगळ्याचा पश्चाताप होईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. आपल्या गणेश मंडळास ग्लॅमर मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नात त्यांची बदनामी आणि समस्यांसह न सुटता येण्यासारखे जाळे विणले जाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटाची गाणी ही प्रसंगानुरूप आहेत. शीर्षक गीत सुंदर जमलंय. गोविंदा रे गोपाळामुळे दहीहांडीसाठी एक नवे मराठमोळे गाणे मिळाले आहे. संदीप खरे लिखीत कव्वाली तर अप्रतिम झालीये. अवधूतने गाण्याच्या निमित्ताने चित्रपटात दिग्दर्शकाने झळकण्याची हिंदीमधली प्रथा मराठीतही आणली आहे. उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर यांची जुगलबंदी असणारी लावणी प्रेक्षणीय असली तरी तितकीशी श्रवणीय नाही. पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने धिंगाणा घालण्याच्या वृत्तीचा इथे अनुभव येतो आणि प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी खालच्या पातळीवर जाण्याच्या मनोवृत्तीचा इथे निषेध नोंदवला आहे. 'देव चोरला' हे अरविंद जगताप लिखीत गाणे सुरेख झाले आहे. सर्वत्र वाजणारे उत्सवाचे पडघम एकाएकी नाहीसे होऊन शांतता पसरावी तसे हे गाणे मनात रुजत जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्पृहा जोशी आणि परी तेलंग यांच्या वाट्याला फार कमी दृश्‍ये आहेत ज्यात त्यांचे काम चांगले झाले आहे. मूळ कथानक हे 'मनोज' आणि 'समीर' या दोन व्यक्तिरेखांभोवती अधिक असल्याने नायिकांना फारसा वाव नाहीये. स्पृहाने मनोजला सांभाळून घेणारी आणि स्वाभिमानी मुलीची भूमिका साकारली आहे तर परी तेलंग हि एका न्युज चॅनेलची रिपोर्टर आहे. गणेश यादव यांनी विनोदी ढंगाचा इनस्पेक्टर साकारला आहे. तो 'जोश' मधील शरत् सक्सेनाच्या इनस्पेक्टरच्या भूमिकेची आठवण करून देतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राजकारणाचा 'झेंडा' हाती घेऊन चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणाऱ्या अवधूतने 'मोरया' मध्ये समाजकारणास हात घातला आहे. सामाजिक जीवन असो वा राजकीय, अवधूतने मराठमोळ्या प्रेक्षकांस रुचेल अशी कथानके आणि पात्रे मांडली आहेत. शिवाय टूकार मनोरंजनपर चित्रपट बनवण्यापेक्षा गंभीर आणि संवेदनशील विषय यांची निवड केल्याने प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा दोन्ही चित्रपटांना लाभला आहे.&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;झेंडाप्रमाणे इथेही राजकारणाचे गल्लिच्छ रूप अवधूतने काही प्रमाणात पडद्यावर आणले आहे. प्रत्येक वाईट घटना आणि गुन्ह्यांमध्ये राजकारण्यांचा असणारा हस्तक्षेप पाहून सामान्य जनतेची कीव येते.याबाबत हिंदीमध्ये राजकुमार हिराणी जे काम करत आहेत ते काही प्रमाणात अवधूतनेही सुरू केले आहे आणि त्याबाबत अवधूतचे विशेष कौतुक.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुदैवाने मी चित्रपट मल्टिफ्लेक्समध्ये न पाहता एका साध्याच सिनेमागृहात पाहिला. कारण अवधूत गुप्तेना अपेक्षित असणारा प्रेक्षक तिथे मिळेल याची काही खात्री नाही. संतोषच्या आक्रमक संवादांना, चिन्मयच्या शेरो-शायरीला, उर्मिला-क्रांतीच्या ठसकेबाज लावणीला- जिथे जिथे शिट्ट्या आणि टाळ्या अपेक्षित होत्या त्या पुरेपूर होत्या आणि चाळ संस्कृतीची नाळ मध्यमवर्गीय मराठी तरुणाईशी जितकी जुळते तितकी उच्चभ्रू तरुणाईशी नाही जुळत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटात व्यावसायिक यश आणि प्रेक्षकांची पसंती केवळ महेश मांजरेकरांच्या चित्रपटांनाच मिळाली आहे.  यंदा अवधूत गुप्तेचे ग्रह चांगले असल्याने त्यांना सर्वत्र यश मिळते आहे. झेंडा आणि मोरयाच्या यशानंतर अवधूतकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.शिवाय संतोष आणि चिन्मय हे दोन अवधूतचे लाडके कलाकार 'झेंडा'नंतर 'मोरया' मध्ये पुन्हा एकत्र आलेत. हिंदीप्रमाणे इथे 'कॅम्पबाजी' मात्र सुरु होऊ नये कारण ते मराठी चित्रपटाच्या प्रगतीच्या दृष्टीने हितकारक नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपट एकंदर छान जमलाय. शेवट थोडा फिल्मी वाटला तरी तो तसाच होणे अपेक्षित होते आणि योग्यही. जाता जाता एवढेच सांगता येईल की चित्रपटाची&amp;nbsp;&lt;a href="http://marathisangeetpremi.blogspot.com/2011/08/blog-post_18.html"&gt;गाणी&lt;/a&gt; हल्ली नेटवर सर्वत्र उपलब्ध झाली असली तरी पायरटेड कॉपी मिळण्याची वाट पाहु नका. सिनेमागृहात जाऊन पाहून या. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन द्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गणपती बाप्पा मोरया!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;ता. क. - अवधूतवर असणाऱ्या प्रेमापोटीच लेखात एकेरी उल्लेख केला आहे .गुप्तेंच्या चाहत्यांना सदर बाब खुपू नये.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-987338364477195495?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/987338364477195495/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/08/blog-post_28.html#comment-form' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/987338364477195495'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/987338364477195495'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/08/blog-post_28.html' title='मोरया- जल्लोष की आक्रोश...!!'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-Tk1TIINxKqA/TloKuc6vmPI/AAAAAAAAA6c/YQHrF1-pjV0/s72-c/Morya%2BMarathi%2BMovie%2BAvdhoot%2BGupte%2B101.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-3835259263746219040</id><published>2011-08-03T20:11:00.000+05:30</published><updated>2011-10-26T12:23:03.137+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्वच्छंद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तडजोड'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सहज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निरर्थक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रश्न'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अस्वस्थ'/><title type='text'>अस्वस्थ मनाचे किडे</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;माणसाचं मन हे फार चंचल असते. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असते. 'मन चिंती ते वैरी न चिंती' असं म्हणतात कारण विचार करणं हे कित्येकदा त्याच्या हाताबाहेर गेलेले असते. असंख्य विचारांनी आपले मन कायम गुंतलेले असते. म्हणून आजचा हा लेख काही अशा गोष्टींसाठी ज्या करायच्या तर असतात किंवा कराव्याश्या वाटतात पण आपणच त्या करणे टाळतो आणि मग अस्वस्थ मनास अजून बेचैन करून सोडतो. याला आम्ही सभ्य भाषेत किडे म्हणतो कारण मनातल्या मनात ते वळवळ करत राहतात. ते असणे तसे फायद्याचेही असते नाहीतर माणूस आळशी आणि मंद बनत जातो. याउलट जो सतत काहीना काही विचारांनी अस्वस्थ राहतो तो पुढे पुढे जात राहतो. ( तत्त्वज्ञान पुरे !)&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्याला हवे तसे वागण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणून एखाद्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटली तरी ती करता येईलच असे नाही. परीक्षेच्या दिवसात मला नेहमी वाटते की आपण परीक्षेला जातो असे सांगून कुठेतरी दुसरीकडेच फिरायला जावे. परीक्षा न देऊन होणारे नुकसान लक्षात घेतले की आपण शहाण्या मुलासारखे मनास मुरड घालतो. परीक्षा हॉल मध्ये गेलो कि मला नेहमी गाणी गुणगुणावीशी वाटतात पण गाणार कशी ? कविताही सुचतात कधी-कधी पण लिहिणार कुठे ? हातात आलेली प्रश्नपत्रिका सोपी आहे हे पाहून शेजारच्या बाकावरील मित्रास आनंदाने टाळी द्यावीशी वाटली तरी ती देता कुठे येते. परीक्षेच्या दिवसात क्रिकेटची मॅच असणे, आवडता चित्रपट टी. व्ही. वर लागला असणे यासारख्या गोष्टी मनास अस्वस्थ करत राहतात. पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडल्या तर 'तडजोड' हा शब्दच जन्मला नसता. 'तडजोड' या एका शब्दापायी माझ्या आयुष्यातील असंख्य आनंदाच्या क्षणांना मुकावे लागते. अर्थात 'याला जीवन ऐसे नाव' असे कुणीतरी म्हटले असेल त्यात याचाही समावेश होत असावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पावसात भिजायला कोणाला आवडत नाही ? पण जसजसे वय वाढते तसा पाऊस केवळ येता-जाता भेटून जातो. पावसाच्या पाण्यात होड्या सोडायला, साचलेल्या डबक्यात उड्या मारत पाऊस एन्जॉय करणे आपणच सोडून देतो. एकीकडे हव्याहव्याश्या वाटणार्‍या अशा बर्‍याच इच्छा आपल्या प्रतिमेवर डाग लागू नये म्हणून सोडून देतो. त्यापेक्षा' डाग अच्छे हैं' म्हणत थोडा एन्जॉय केले तर नक्कीच चांगले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भटकंतीची आवड असणार्‍यांना, विकांतात डोंगरवाटा तुडवणार्‍या पावलांना एकदा निसर्गाचा सहवास लाभला की आपले भौतिक सुखसोयींनी नटलेले आयुष्य सोडून तिथेच ध्यानमग्न कायम राहावे असे वाटणे सहज शक्य आहे. पण करियर,पैसा,घर या गोष्टी पुन्हा मागे खेचतात. अर्थात माघारी परतताना आठवणींचा ठेवा घेऊन परतलो तरी परतल्यावरही मन कुठेतरी 'दूर दूर नभपारच असते'. मग पावसाचे निमित्त साधून पुन्हा पावले तिकडेच वळतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी भटकंतीला गेलो की गड-किल्ल्यांवर कुठे काही नावे लिहून येत नाही पण काहीतरी हरवून येणे, खरचटून घेणे किंवा अशाच लक्षात राहण्यासारख्या गोष्टी करणे हे ना चुकता होते. आणि ते तसे नाही झाले की मग काही मजा नाही. एखाद्या उंच ठिकाणी गेलो कि मला नेहमी तिथून काही तरी फेकून द्यावेशे वाटते. इतिहासाशी नाते जोडणारे गड-किल्ले यांच्या माथ्यावर पोहोचल्यावर तिथल्या वातावरणाशी न जुळणाऱ्या वस्तू म्हणजे मोबाईल, गॉगल्स, कॅमेरे तिथल्या खोल दरीत टाकून द्याव्या असे फार वाटते.  या सगळ्या सुखसोयी त्या आनंदापुढे खुजा वाटतात म्हणून टाकून द्याव्याश्या वाटतात पण टाकता येत नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सिद्धिविनायकला जायला रात्री कधी घराबाहेर पडलो तर नेहमीचे रहदारीचे रस्ते मोकळे दिसू लागतात. मला नेहमी त्या निर्मनुष्य रस्त्यांवर झोपून जावेसे वाटते. रस्त्याच्या मधोमध आपलेच राज्य असल्यासारखे चालायचे...जगाची पर्वा न करता.कधीतरी बिनधास्तपणे विदाउट तिकीट प्रवास करावा असे वाटते, कधीकधी तोच लोकांना फसवून कमावलेला पैसा गरीबांत वाटून टाकावा असेही वाटते पण असले स्वच्छंदी आयुष्य हवेहवेसे वाटले तरी तसे वागता येत नाही ही खंत आहेच..&lt;br /&gt;&lt;br /&gt;मध्यंतरी 'चेतन भगत'चे 'One Night @ call centre' वाचण्यात आले. आपल्या बॉसची धुलाई करणे ही तमाम नोकरदार भारतीयांची फॅंटेसी कशी आहे हे त्यांनी लिहिले होते. या ठिकाणी आपले हात बांधलेले असतात म्हणून ही फॅंटेसी प्रत्यक्षात येत नाही पण कधी असे काही करायला मिळाले तर काय आनंद होईल. हे सगळे मनाचे किडे आपण सभ्यतेच्या बुरख्याखाली दडपतो. हा सभ्यतेचा बुरखा आपली प्रतिमा सांभाळतो पण मनास कुठेतरी बोचत राहतो. वयाला शोभत नाही म्हणून मन मारत आपल्या इच्छाना मुरड घालणे कित्येकांनी केले असेल ज्याची अनेकदा काहीच आवश्यकता नसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आयुष्यात आपल्याला हवे तसेच वागायचे असे म्हटले तरी काही बाबतीत बंधने येतातच आणि ती मोडता येण्यासारखी असून ही मोडत नाही कारण आपल्याला त्याचे दुष्परिणाम ठाउक असतात. त्याहूनही फार खटकते ते म्हणजे संगणकाप्रमाणे इथे UNDO करता येत नाही आणि या एका गोष्टीमुळे बरेच आनंद मुकतात. विशाची परीक्षा घेऊ नये असे म्हणतात कारण त्याचे परिणाम आपल्याला ठाऊक असतात आणि शिवाय हेही की ही क्रिया अंडू करून त्याचा परिणाम नाहीसा होत नाही. देवाने आपल्या आयुष्याच्या प्रोग्रॅममध्ये अंडू ला रीप्लेस्मेंट म्हणून 'संयम, सामंजस्य,अनुभव' असे काही गुण दिलेत जे वापरायला कुणालाच आवडत नसावेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सगळ्या गोष्टी थोड्या अशक्यप्राय वाटतात किंवा त्या केल्याने होणारे नुकसान माहित असल्याने आपण त्या करायचे टाळतो पण अशा ही बर्‍याच गोष्टी आहेत ज्या केवळ एका कारणासाठी आपण करावयाचे टाळतो ते म्हणजे 'लोक काय म्हणतील!' . मुलांच्या बाबतीत हा प्रकार कमी असेल पण हा विचार बऱ्याच मुली करत असाव्यात. समाजातील आपली प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मनातील बऱ्याच इच्छा आपण मनातच ठेवतो. त्या कधी पूर्णत्वास येतच नाहीत. या बाबतीत मुले बहुतेकदा बिनधास्त वागण्यामुळे हवे तसे वागू शकतात आणि त्यांना तसे स्वातंत्र्य देण्यात समाजाला काहीच गैर वाटत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवीन फॅशनेबल कपडे घालण्यापासून ते मित्रांबरोबर फिरायला जाण्यापर्यंत सगळीकडे 'लोक काय म्हणतील' याचा विचार केला जातो. डेरी मिल्कची एक जाहीरात आठवली ज्यात ''नीना कुलकर्णी' प्रथमच जीन्स घालून घराबाहेर पडतात. नवीन गोष्टींचा शुभारंभ करण्यासाठी आपल्याला चॉक्लेटची गरज आहे कि लोकांचा विचार न करण्याची. आपल्या आयुष्यातल्या करीअर पासून लग्नापर्यंत कित्येक गोष्टी आपण लोकांचा विचार करूनच ठरवतो आणि ते ही आपल्याला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य असूनही. हे सारे काही अस्वस्थ करत राहते मनाला तरीही आपण हट्ट काही सोडत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी ब्लॉग लिहायला सुरूवात केली त्याचे कारण ही असेच काहीसे आहे. प्रत्यक्ष आयुष्यात ज्या गोष्टी, जे विचार मांडता येत नाहीत ते ब्लॉगवर लिहिता येतात. सोशल साईटस वर जास्त रमणारे लोक एकलकोंडे असतात असे वाचले होते पण आपल्या विचारांशी सहमत होणारे मित्र इथे भेटत असतील जे प्रत्यक्षात कधीच भेटत नाहीत तर त्यात काहीच गैर नाही. ब्लॉगला आपली खुली रोजनीशी म्हणता येईल कारण आपण आपल्या मनातलेच इथे मांडतो पण सगळ्यांसमोर. मनातील घुसमट, मनाची होणारी तगमग यास कुठेतरी वाट करून द्यावी असे वाटले तर त्यात काही वावगे नाही. आणि ही अस्वस्थता असल्यामुळेच तर अजूनही लिहितो आहे. ती कायम राहील याचीही खात्री आहेच त्यामुळे ब्लॉग कडे दुर्लक्ष झाले तरी जेव्हा-केव्हा मनात हे नभ दाटून येतील तेव्हा हा पाऊस इथे बरसत राहीलच.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-3835259263746219040?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/3835259263746219040/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/08/blog-post.html#comment-form' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/3835259263746219040'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/3835259263746219040'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/08/blog-post.html' title='अस्वस्थ मनाचे किडे'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-8272245347495837146</id><published>2011-06-12T12:10:00.001+05:30</published><updated>2011-06-12T12:29:36.829+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सहज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आनंदी-आनंद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गाणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पाऊस'/><title type='text'>पाऊसगाणी</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;जून महिना सुरु झालाय आणि पाऊस आता मुक्तहस्ताने बरसू लागलाय. उन्हाळ्याची तहान भागवणारा, धरतीस तृप्त करणारा, सगळ्यांना वेड लावणारा असा पाऊस आभाळातून खाली उतरला आणि मग पावसाच्या निमित्ताने सगळीकडे आनंदसोहळा सुरु झाला. पावसाच्या ओघानेच मग पाऊसगाणीही साऱ्यांच्या ओठी मृदगंधाप्रमाणे दरवळू लागली. कधी पावसात भिजताना तर कधी खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी पाहून नकळत ही गाणी आपण गुणगुणायला लागतो. म्हणूनच पाऊसगाण्यांनी भिजलेला हा ओला लेख.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पावसाचे वेड तर तसे सगळ्यांनाच आहे आणि तसेच पाऊसगाण्यांचेही. पण ब्लॉग मराठी असल्याने आणि मराठी भाषेवर आणि संगीतावर हिंदीहून जास्त प्रेम असल्याने आज केवळ मराठी पाऊसगाणीच ऐकुया. पावसावर कविताही असंख्य लिहिल्या गेल्यात पण त्यांची संख्या आणि उपलब्धता पाहता त्याच्यावर लिहिणे फारच कठीण आहे. म्हणून आपल्या आवडीची, मनोमनी रुजलेली व काही नवी पाऊस गाण्याची मैफिल आज ब्लॉगच्या दरबारी सादर करीत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बालपणीचा पाऊस म्हटला कि सर्व प्रथम आठवणारे बालगीते म्हणजे -&lt;b&gt;'येरे येरे पावसा...'&lt;/b&gt;ज्या कुठल्या मराठी कुटुंबात हे गाणे पावसाकडे पाहून पालकांनी आपल्या चिमुकल्यांस शिकवले नसेल ते मराठी कुटुंब नाही. बालगीतांमध्ये आणि खास करून पाऊसगाण्यांत हे गाणे म्हणजे सगळ्यात पहिल्या क्रमांकावर...त्या शिवाय &lt;b&gt;'नाच रे मोरा'&lt;/b&gt; आंब्याच्या वनात आहेच. या गाण्यावर लहान मुलांसकट सगळेच गाण्याच्या तालावर नाचू शकतात इतके गोड गाणे आहे. काही जणांना माहित नसेल पण हे गाणे पु.ल.देशपांडे यांनी संगीतबद्ध केले आहे.लहानांसह लहान होऊन नाचण्या-गाण्याची गंमत पुलंनाही कळली ती अशी. शाळेत जायला निघालो आणि बाहेर पाऊस सुरु झाला की मग&lt;b&gt;' सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?'&lt;/b&gt; असे गाणे गावेसे ही वाटले आणि मग 'शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?' अशी स्वप्ने पाहणे हे त्या वयात 'शाळेला सुट्टी म्हणजे काय मोठी गोष्ट' वाटायचे...आणि सुट्टीच्या दिवशी पाऊस पडला की &lt;b&gt;' ए आई मला पावसात जाऊ दे...'&lt;/b&gt; असा हट्ट धरणारी मुले आणि आईचा डोळा चुकवून भिजल्यावर पाठीत धपाटे खाणारी मुले यांनाच काय ती पावसात भिजण्याची गंमत कळली. बाकीची मुले केवळ छत्र्या आणि रेनकोट मधून भिजली आणि ती ही नाईलाज म्हणून...&lt;br /&gt;&lt;br /&gt;बालपण ओसरले तरी पाऊस मात्र ओसरत नाही. तारुण्यात नव्या रंगात, नव्या रुपात तो बरसू लागतो आणि मग लहानपणीची अल्लड, खेळकर पाऊसगाणी सोडून प्रेमाचे सूर आळवू लागतो. तारुण्यात जिथे-तिथे हिरवळ शोधणारे मन निसर्गाच्या हिरवळीकडे पाहून अजूनच खुलते. मराठीमध्ये तरुणाईला ज्या गाण्यांनी शब्द-सुरातही ओले चिंब केले असा अल्बम म्हणजे &lt;b&gt;'गारवा'&lt;/b&gt;. सौमित्रच्या शब्दांनी नटलेली आणि मिलिंद इंगळे यांच्या स्वरांनी आणि संगीताने सजलेली सदाबहार गाणी यांनी गारवा म्हणजे पाऊस आणि तरुणाई यांचे समीकरण झाला.ज्यांना पाऊस आवडत नाही किंवा ज्यांना गाणी आवडत नाही असेही लोक या गाण्यांच्या माध्यमातून मनसोक्त भिजले. गारव्यानंतर लगोलग &lt;b&gt;'सांज गारवा'&lt;/b&gt; ही आला. अजून पावसात भिजण्याच्या स्मृती वाळल्याही नव्हत्या आणि हा जणू सायंकाळी आकाशी इंद्रधनू बनून साकारला. पुन्हा सारेच तृप्त, शांत आणि कानात घुमत राहिले ते काही पावसाचे आवाज. गारवा आणि सांजगारव्याने तरुणाईला प्रेमात पडायला शिकवले. यातील प्रत्येक गाणे खास पाऊस पडत असतानाच ऐकले जावे. ही गाणी उन्हाळ्यात ऐकण्यासारखी नाही. ती लिहिली गेली ती पावसासाठीच आणि पावसावर प्रेम करणाऱ्यांसाठी. काही वर्षांपूर्वी आलेला &lt;b&gt;'गंध गारवा'&lt;/b&gt; हा अमोल बावडेकर याचा अल्बम ही छान आहे पण त्यास फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर पावसाची वेगवेगळी रूपे दाखवणारी गाणी यात ऐकायला मिळतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठीत आधीही बरीच सुंदर पाऊस गाणी रचली गेली आहेत. त्यातील बरीचशी तर मंगेशकर कुटुंबियांच्याच नावे आहेत. गर्द रानात भटकंतीला गेल्यास आणि पाऊसही सोबतीला असल्यास ना.धों. महानोरांचे &lt;b&gt;'चिंब पावसानं रान झालं'&lt;/b&gt; हे गाणे गुणगुणतच कित्येक भटक्यांनी ओल्या पायवाटा तुडवल्या असतील. त्यांच्याच शब्दांत पुन्हा &lt;b&gt;'घन ओथंबून येती'&lt;/b&gt; आणि लतादीदींच्या स्वरांसवे बरसती. लतादीदींप्रमाणेच आशाताईंनीही एकाहून अनेक सुंदर पाऊस गाणी गायली आहेत.&lt;b&gt;' झुंजुर मुंजुर'&lt;/b&gt; पावसात भिजता भिजता &lt;b&gt;'सोसाट्याच्या आला वारा'&lt;/b&gt; अन &lt;b&gt;'भिजुनिया देह चिंब झाला'&lt;/b&gt; आणि त्यासाठी खऱ्याखुऱ्या पावसात भिजायची ही श्रोत्यांना गरज भासली नाही. याच गाण्याचे अजय-अतुल मधील अजय गोगावले यांच्या आवाजात एक नवे गाणे ही रेकॉर्ड करण्यात आले आहे. नव्या चालीत बांधलेले हे गाणे मूळ गाण्याहून मुळीच कमी नाहीये.&lt;br /&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-iKW4F6-gVYM/TfRaDAH9chI/AAAAAAAAAv0/R6Le-RU5w6s/s1600/image005.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="185" src="http://4.bp.blogspot.com/-iKW4F6-gVYM/TfRaDAH9chI/AAAAAAAAAv0/R6Le-RU5w6s/s320/image005.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; line-height: 28px;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-small;"&gt;सौजन्य :गुगल&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;पावसावर द्वंद्व गीते फार कमी लिहिली गेलीत. त्यातील एक सुंदर गाणे म्हणजे बाबूजी आणि आशाताईंच्या आवाजातील &lt;b&gt;'पावसात नाहती'&lt;/b&gt;.पाऊस आणि प्रेम यांचे अतूट असे नाते आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या सानिध्यात पाऊसही वेळ साधून आला तर शब्दांची माळ गुंफण्यास इतके निमित्त पुरेसे आहे..&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाऊस म्हणजे बहुतेकदा प्रेमी युगुल किंवा नुसतेच पावसाचा आनंद व्यक्त करणारे गाणे असते. याला अपवाद ठरणारी ही काही गाणी आहेत जसे -ग्रेस यांनी लिहिलेले &lt;b&gt;'पाऊस कधीचा पडतो'&lt;/b&gt;. याशिवाय &lt;b&gt;'ती गेली तेव्हा'&lt;/b&gt; हे हृदयनाथजींच्या आवाजातील गाणे तितकेच हृदयद्रावक. काहीशा गंभीर स्वरूपाची हि गाणी ऐकताना आपण अंतर्मुख होऊन जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रावण महिना हा तर सगळ्यांचा लाडका. कवी आणि गीतकारांनीही या महिन्याचे वेळोवेळी गुणगान गायले आहे. &lt;b&gt;'श्रावण आला ग वनी'&lt;/b&gt; म्हणत कधी आशाताई त्याचा दरवळणारा गंध आपल्या पर्यंत पोहोचवतात तर &lt;b&gt;'झिमझिम झरती श्रावणधारा'&lt;/b&gt; म्हणत सुमनताई 'प्रियाविन उदास वाटणारी रात' गातात. उषाताईंनीही &lt;b&gt;'पाऊस पहिला जणू कान्हुला'&lt;/b&gt; म्हणत पावसाचे स्वर आळवले आहेत. पण श्रावणाचे सगळ्यात सुंदर वर्णन कुठल्या गाण्यात आले असेल तर ते म्हणजे मंगेश पाडगावकरांचे &lt;b&gt;'श्रावणात घन निळा बरसला'&lt;/b&gt; या गाण्यातून. खळेकाकांच्या जादुई संगीताने नटलेले आणि त्यात पुन्हा लतादीदींच्या मोहून टाकणारा स्वर म्हणजे अगदी 'दुग्ध शर्करा' आणि असेच बरेच काहीसे योग इथे जुळले आहेत. प्रत्येक ओळीतून श्रावण असा सांडला आहे की बस्स...&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही वेळेस संगीतकाराच्या हातून असे काहीशी किमया घडते की केलेल्या सर्व कलाकृतींना सुवर्णस्पर्श लाभावा जणू. &lt;b&gt;'ऋतू हिरवा'&lt;/b&gt; मध्ये श्रीधर फडके यांनी ती किमया केली. इतर वेळेसही श्रीधरजींनी सुंदर चाली दिल्या पण या अल्बम मधील गाण्यांची बात काही औरच. आशाताईंनी तर वेडेच करून सोडले श्रोत्यांना. &lt;b&gt;'ऋतू हिरवा'&lt;/b&gt; असो की &lt;b&gt;'घन राणी'&lt;/b&gt;- आशाताईंनी कमाल केली आहे. आशाताईंचे अजून एक सुंदर गाणे आठवते ते म्हणजे -&lt;b&gt;'नभ उतरू आलं'&lt;/b&gt;&amp;nbsp;आदिवासी पाड्यातील रानामाळातले चित्रीकरण आणि त्यावर हे गाणे...अहाहा...&lt;b&gt;' ये रे घना...ये रे घना...न्हाऊ घाल माझ्या मना...'&lt;/b&gt; म्हणत आपणही त्यांच्यासह गाऊ लागतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाऊसगाण्याची भुरळ आजच्या नव्या गीतकार आणि संगीतकारांस ही पडली आहेच. नवी-नवी पाऊस गाणी नव्या पिढीस नव्या पिढीकडून ऐकायला मिळत आहेत. &lt;b&gt;'आईशप्पथ'&lt;/b&gt; चित्रपटातले &lt;b&gt;'ढग दाटुनी येतात'&lt;/b&gt; हे पुन्हा एकदा सौमित्रलिखित पाऊसगाणे अशोक पत्कींनी संगीतबद्ध करत त्यांच्या 'चिर'तरुण संगीताचा पुरावा दिला आहे. एरवी लोककला आणि आधुनिक संगीत यामध्ये अधिक रमणारे अजय-अतुल यांनीही &lt;b&gt;'चिंब भिजलेले रूप सजलेले'&lt;/b&gt; या गाण्यातून प्रणयधुंद पाऊसगाणे रसिकांना भेट दिले आहे. नायक आणि नायिका यांच्यावर चित्रपटात पाऊस गाणी चित्रित करणे म्हणजे हमखास प्रसिद्धी मिळणार असे असले तरी ते गाणे तितके सुंदर नसेल तर ते केवळ प्रेक्षणीय होते पण श्रवणीय होत नाही. &lt;b&gt;'इरादा पक्का'&lt;/b&gt; मध्ये निलेश मोहरीर यांनी केलेले &lt;b&gt;'भिजून गेला वारा'&lt;/b&gt; हे गाणे या दोन्ही अटी पूर्ण करते म्हणून नव्या पाऊस गाण्यात त्याचा विशेष उल्लेख.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नव्या पिढीचा लाडका संगीतकार अवधूत गुप्ते यांचे पावसावर जरा अधिकच प्रेम आहे म्हणून त्यांनी &lt;b&gt;'पाऊस'&lt;/b&gt; या नावाचा खास अल्बम केला आहे. वैशाली सामंत यांनी गायलेले &lt;b&gt;'अंगणी माझ्या मनाच्या...'&lt;/b&gt; हे सुंदर गाणे तसेच अवधूत यांच्या आवाजातील &lt;b&gt;'थेंबभर तुझे मन...'&lt;/b&gt; हे संथ लयीतून रॉक कडे जाणारे गाणे यातून पावसाचे निरनिराळे रंग यांचा आविष्कार गुप्तेंनी साधला आहे. वैशाली सामंत यांच्या आवाजातील &lt;b&gt;'स्वर पावसात भिजतात'&lt;/b&gt; या अल्बममध्ये तर अस्सल रॉक संगीताचा वापर करत गाणे रचले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पावसावरचे प्रेम इथेच थांबत नाही. &lt;b&gt;'अमृता सुभाष'&lt;/b&gt; या गुणी अभिनेत्रीने देखील गायन क्षेत्रात पाऊल ठेवले ते &lt;b&gt;'जाता जाता पावसाने'&lt;/b&gt; या पाऊस गाण्यांच्या अल्बम मधूनच. नाजूक गळ्याच्या गायिकांच्या परंपरेला छेद देत अमृताने या अल्बममधून एक नवा पायंडा पडला आहे. भटकंती करत सारा महाराष्ट्र पालथा घालणारा अभिनेता &lt;b&gt;'मिलिंद गुणाजी'&lt;/b&gt; यांनीही कवितेवरील प्रेम व्यक्त करण्यास &lt;b&gt;'मन पाखराचे होई '&lt;/b&gt; म्हणत पावसाशी नाते जोडले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नव्या पिढीची लाडकी जोडी सलील आणि संदीप यांनी &lt;b&gt;'आयुष्यावर बोलू काही'&lt;/b&gt; म्हणत सगळ्यांना मुग्ध केले आहेच. त्यांनीही आपल्या कार्यक्रमातून पाऊसगाणी सादर करून प्रेक्षकांना आणि रसिकांना पावसात भिजण्याचे नवे बहाणे दिले आहेत. लहानग्यांसाठी &lt;b&gt;'अग्गोबाई ढग्गोबाई'&lt;/b&gt; गाताना हे दोघे लहान मुलांचे बोबडे विश्व आपल्यासमोर उभे करतात आणि तितक्याच सहजपणे तरुणाईच्या प्रेम भावना व्यक्त करणारे &lt;b&gt;'तुझ्या माझ्या सवे'&lt;/b&gt; म्हणता पावसालाही गाणे गायला भाग पाडतात. प्रेयसीच्या आठवणीत रमणाऱ्या मनाला पाऊस अधिकच बेचैन करून सोडतो तेव्हा खिडकीतून बाहेर पाहताना &lt;b&gt;'पाऊस रुणझुणता असा ...पैंजणे सखीची स्मरली...'&lt;/b&gt;अशा ओळी आठवल्या नाही तर त्याने हे गाणे ऐकले नसावे या कारणखातरच केवळ माफ करण्यात यावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाऊसगाण्यांचा शेवट माझ्या एका अतिशय आवडत्या गाण्याने करीत आहे. संदीप खरे यांचे शब्द-संगीत आणि स्वर असा तिहेरी संगम जिथे जुळून आला आहे त्या &lt;b&gt;'सरीवर सर'&lt;/b&gt; या गाण्यातून पावसाचे आणि निसर्गात रमणाऱ्या भटक्या मनाचे वर्णन अनुभवायचे असेल तर पाय घराबाहेर टाकून पावसाच्या कधी उधाणत्या आणि कधी थेंबांच्या संथ लयीच्या धारा अंगावर झेलत बाहेर पडायला हवे. मग हे शब्द आणि अंतरंगात उमटणारा हर्ष पावसासंगे एकरूप होऊन जातात. सर्वत्र केवळ पाऊस आणि पाऊस...सरीवर सर बरसतच राहतात.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-8272245347495837146?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/8272245347495837146/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/06/blog-post.html#comment-form' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/8272245347495837146'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/8272245347495837146'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/06/blog-post.html' title='पाऊसगाणी'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-iKW4F6-gVYM/TfRaDAH9chI/AAAAAAAAAv0/R6Le-RU5w6s/s72-c/image005.jpg' height='72' width='72'/><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-2630338303095639010</id><published>2011-05-28T19:48:00.000+05:30</published><updated>2011-10-26T12:32:06.512+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ईडियट बॉक्स'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फाल्तूगिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निरर्थक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मालिका'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='टी.व्ही.'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सिरीयल'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><title type='text'>सिरीयल कीलिंग</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;आज मी एका गंभीर विषयावर लिहायचे ठरवले आहे. पोस्टच्या शीर्षकावरून तुम्हाला जर असे वाटले असेल की हे कुठल्या तरी सिरीयल किलर विषयी लिहित आहे तर तसे बिलकुल नाहीये. हा मुद्दा समस्त पुरुष वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मांडणे जरुरीचेच होते! तशाही स्त्रिया नेहमीच नवरोबांचे डोके खातात पण गेल्या काही वर्षात त्यांच्या डोक्यावर हे सिरीयलचे भूत बसले आहे तेव्हापासून पुरुषांना टी.व्ही. ही पाहायला मिळू नये हे अतीच होत आहे. या संदर्भात कोणी काही मोर्चे वगैरे पण काढत नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला गेल्या कित्येक वर्षात मी असा निवांतपणे टी. व्ही. पाहत बसलोय असे आठवतच नाही. दुपारी सगळे झोपलेत आणि मी पिच्चर पाहतोय किंवा सगळेजण आपापल्या कामात आहेत आणि मी तासभर नुसतीच चॅनेलसर्फिंग करतोय हे फार मिस होतंय...पण हे सगळे सुखाचे क्षण आता पुन्हा मिळतील असे वाटत नाही. टी.व्ही.फेकून नाही दिलाय आमचा,पण बिघडलाय जरूर! गेली दहा वर्षे समस्त टी.व्ही.ना ही सिरीयल नामक कीड लागलीय पण 'जिच्या हाती रिमोट कंट्रोल, तीच करील पेस्ट कंट्रोल' असेच म्हणायची वेळ आली आहे. मी टी.व्ही.पाहायचो असे मी हल्ली बोलतो. नाहीतरी लॅपटॉप आहेच त्यामुळे टी.व्ही.काही खास निमित्त असेल तरच म्हणजे क्रिकेट,बातम्या वगैरे तरच पाहिले जाते.         &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता मुद्द्याचे बोलू-तर गोष्ट अशी असते कि एक नायिका असते. गोड चेहऱ्याची, सुसंस्कृत, सगळ्यांशी प्रेमाने वागणारी, मोठ्यांचा आदर करणारी. लग्नानंतर जी आदर्श सून-पत्नी-आई आणि सर्व काही असते. नायिका बनायचे तर एवढे आणि अजून बरेच गुण असायलाच हवे तिच्यात. ती पतिव्रता असते शिवाय बरीच सोशिकही असते. ती कधीच संकटात हार मानत नाही( संकटे पण नेमकी तिच्याच वाटेला येतात), सत्याची साथ सोडत नाही. आणि तिच्याच घरात कोणी-ना-कोणी तिच्या वाईटावर टपलेले असते. खलनायिकेच्या भूमिकेत तिची सासू,जाऊबाई,वहिनी,बहिण यापैकी कोणीही असू शकते. हे कमी म्हणून मग तिची एक लाडकी सवत वगैरे पण असते. म्हणजे नायकसुद्धा तसा पत्नीव्रताच असतो पण तरी त्याचे कुठेतरी अनैतिक संबंध असतात किंवा नसले तरी ते या ना त्या कारणाने जोडले जातात. घरातील लोकांना बाहेरच्या लोकांबद्दल काहीच माहित नसते. बऱ्याच वर्षांनी त्यांना त्याचा साक्षात्कार होतो तेव्हा ती अनैतिक मुले मोठी झालेली असतात. ती बदला वगैरे घ्यायला येतात पण आपली नायिका सुरुवातीला प्रचंड अश्रू ढाळते, आकांड-तांडव करते (बॅकग्राउंड मध्ये जे मंत्र वगैरे लावतात ते तर त्यांना मुळीच शोभत नाही) आणि तरीही शेवटी त्यांचा स्वीकार करते. हे असे तर फक्त सीरियल मधेच होऊ शकते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सिरीयल मधल्या पात्रांचे मृत्यू आणि त्यांचे होणारे कमबॅक हा तर संशोधनाचा विषय आहे. आणि त्यासाठी नायिका जितक्या हुशारीने शोध लावते तितकेच हुशार लोक नेमले पाहिजेत. बरे नायिका सगळे शोध लावण्यातही पटाईत असते. एसीपी(प्रद्युम्न)ची मुलगी असल्याप्रमाणे खलनायिकेचा पाठलाग वगैरे करून तिचे डाव उधळून लावते. सिरीयल जर 'सोनी'वर नसेल तर एसीपी(प्रद्युम्न)ला गेस्ट अपिअरन्स करायला ही संधी नाही. म्हणजे इथेही हीच भाव खाणार. एकवेळ रियलिटी शो मध्ये कॉलबॅक होणार नाही. पण सिरीयल मध्ये कुणी मेलेले दाखवले तर ते पात्र काही एपिसोड नंतर पुन्हा दिसणार नाही याची काही खात्री नाही. नायक किंवा नायिका मेली तर मग कुठेतरी भलत्याच शहरात ती सापडते आणि बहुधा तिची स्मृती गेलेली असते. इकडे घरात एकदम सुतक पडते. काही एपिसोड नंतर नायक किंवा नायिकेचे दुसरे लग्न वगैरे करायचे ठरते तेव्हा अचानक त्याच वेळेला त्याची/तिची एन्ट्री होते. लेखकाकडे अजून बरेच पर्याय असतात- जसे तिची प्लास्टिक सर्जरी करणे, त्यांचा पुनर्जन्म करणे. बरे तिच्यासारखी दिसणारी नायिकाही ती मेल्यावरच नायकाला भेटते तोपर्यंत ती कुठेच नसते. कारण लेखकानेच तिला उशीराने जन्माला घातलेले असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही कार्यक्रमात 'बीस साल बाद'चे लीप घेतले जातात त्यात फक्त केसाची एक बट पांढरी होते. आणि भावाच्या वयाचे कलाकार मुले बनून परिवारात सामील होतात. आजीबाई तर मालिकेची प्रमुख नायिका असते. तिला अमरत्व मिळाले असते किंवा ती लेडी अश्वथामा तरी असते आणि एवढे करून ते थांबत नाहीत तर अजुन एखादा 'बीस साल बाद' चा लीप यायचा असतो.एपिसोड लिहीणे म्हणजे वर्तमानपत्रातले राशिभविष्यच झाले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या मालिकांत केले जाणारे एवढे भडक मेकअप हा देखील एक चेष्टेचा विषय आहे. जणू काय सगळीकडे कृष्ण-धवल चित्र दिसणार आहे अशा रीतीने इतके गडद मेकअप केले जातात. बरं घरी काही कार्यक्रम असेल तर ठीक आहे पण रात्री झोपतानाही आणि सकाळी उठल्यावरही तितकाच मेकअप असतो म्हणजे जन्मजात कुंडलाप्रमाणे मेकअप ही जन्मजात असावा त्यांचा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हे आणि असे अनेक प्रश्न आपल्यासारखे त्या सिरीयल पाहणाऱ्या स्त्रियांनाही पडतात पण हे नाही बघायचे तर काय बघायचे असा उलट प्रश्नही असतो. सिरीयल पाहण्यापेक्षा बातम्या पहा, सिनेमे पहा, रियलिटी शो पाहा, खाद्य संस्कृती दाखवणारे सगळे कार्यक्रम पहा ( हे महत्वाचे !) पण त्यांना तेच पाहायचे असते. काही वर्षांपूर्वी यांना टी.व्ही. पाहायला वेळ मिळत नसायचा पण हल्ली सगळी कामे चालू असली तरी टी.व्ही. पाहिजेच. टी.व्ही. पाहायला आक्षेप नाही पण चांगल्या सिरीयल पहा ना...( शोधून दाखवा बरे !). आजकाल सगळ्याच चॅनेलवर डेली सोप्सचे जाळे पसरले आहे. आणि त्याच चालतात हे माहित असल्याने चॅनेलही वेगळे काही देण्याचा प्रयत्नच करत नाही. विनोदी मालिका पाहायला माझी काहीच हरकत नसते पण डेली सोप्सने विनोदाची परिसीमा गाठली आहे.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;हिंदीमध्ये एकता कपूरने निर्विवादपणे मालिका विश्वात वर्चस्व राखले आहे (जी हल्ली मराठीतही आली आहे). कैच्याकै कथानक, सॉलिड ड्रामाबाजी, मोठमोठाले सेट्स ह्यांची सुरुवात हिने केली आणि लोकांना सवयच लागली मग. हिंदीतल्या काही गाजलेय 'क' कारांत मालिका म्हणजे -&lt;b&gt;क्योंकी सास भी कभी बहु थी, कहाणी घर घर की, कसौटी जिंदगी की, कही तो होगा, कही किसी रोज,कसम से, केसर, काव्यांजली&lt;/b&gt; आणि अजूनही बऱ्याच काही होत्या (कसल्या पकाऊ होत्या ना सगळ्या !). मला ही नावे ठाउक आहेत कारण आमच्या घरी कायम या मालिका लागलेल्या असायच्या. त्या चालू झाल्या की डोके दुखायचे. विशेष म्हणजे यातलेच काही कलाकार नंतर काही कॉमेडी कार्यक्रमातून त्या डेली सोप्स्ची खिल्ली उडवू लागले. हल्ली एकतासुद्धा एका विनोदी कार्यक्रमात जज आहे आणि तिच्या समोरच सगळे तिच्या डेली सोपसची,आपल्याच कामाची चेष्टा करतात. लाज विकलीय सगळ्यांनी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्टार परिवार हा एक असाच मूर्खांचा बाजार आहे. नात्यांचे कसले अवॉर्ड देतायत? काय तर म्हणजे फेवरेट बहू, फेवरेट सौतन, फेवरेट मजेदार सदस्य(?)...च्यायला...! आणि आव तर सगळ्यांचा असा असतो की फिल्मफेअर जिंकल्याचा ! बिनडोक लोकांचे कार्यक्रम बिनडोक लोक बघतात!&lt;br /&gt;&lt;br /&gt;हल्ली हिंदी मालिका आमच्या घरी कमी झाल्या असून त्याची जागा मराठीने घेतली आहे पण ही काही एक अभिमानाची गोष्ट नाहीये त्यामुळे मराठी पाऊल पुढे जाण्यापेक्षा तिथल्या तिथेच अडकून पडले आहे. आमच्याकडे हल्ली संध्याकाळी झी मराठी आणि सकाळी रिपीट टेलीकास्ट मध्ये स्टार प्रवाह असे वेळापत्रक झाले आहे.(ई टी व्ही पासून सूटका झाली एकदाची!) शिवाय मधल्या ब्रेकमध्येही इकडून तिकडे उड्या चालूच असतात. त्यामुळे कुठलीच मालिका पाहायची चुकत नाही. एक दिवस मालिका चुकली की हळहळ होते. ज्या दिवशी केबल जाते तेव्हा मला फार आनंद होतो.       &lt;br /&gt;&lt;br /&gt;सुरुवातीला ठरवले की याच लेखाचा दुसरा पार्ट म्हणून &lt;b&gt;'मराठी सिरीयल किलिंग टू'&lt;/b&gt; असे लिहूया पण म्हटले जे आजकाल हिंदीत दाखवतात तेच मराठीत चालते मग वेगळे लिहायचे काय ? म्हणून मग एकाच भागात डबल धमाका ! &lt;br /&gt;&lt;br /&gt;मला पहिले वाटायचे की सिरीयल फक्त घरातल्या गृहिणी पाहत असतील. पण एकदा कॉलेजला जाताना बसमध्ये काही &lt;b&gt;'सो कॉल्ड फॅशनेबल'&lt;/b&gt; मुलींना सिरीयलच्या गप्पा मारताना ऐकले आणि हसूच फुटले. घरोघरी सीरीयल पाहणार्‍या मुली याची मला तेव्हाच खात्री पटली. पण ऑफिसमध्येही जे मित्र मुलींशी सिरीयल विषयी गप्पा मारतात ते त्यांच्या बायकोच्या धाकात आहेत असे समजावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दहा-बारा वर्षांपूर्वी ज्या चांगल्या सिरीयल पहिल्या त्या नंतर पाहायलाच नाही मिळाल्या. त्यांचे रिपीट टेलीकास्ट लागले तरी मी पाहेन. मराठीतल्या काही चांगल्या सिरीयल म्हणजे &lt;b&gt;नायक, प्रपंच, श्रीयुत गंगाधर टिपरे, श्रावणसरी, ४०५ आनंदवन,हसा चकटफू, पिंपळपान, साईबाबा, व्यक्ती आणि वल्ली, कथाकथी&lt;/b&gt; आणि अजून ही काही चांगल्या मालिका होत्या. विशेष म्हणजे आठवड्यातून एकदाच लागायच्या त्यामुळे खास आठवणीने पाहिल्या जायच्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;झी मराठीवर तर एका दिग्दर्शकाने कहरच केलाय...त्याच्या सगळ्या मालिकांमध्ये(वहिनीसाहेब, सावित्री, भाग्यलक्ष्मी) नायिकेचे अतोनात हाल होतात. तिच्यावर देवी प्रसन्न असते तरीही सगळी संकटे तिच्याच वाटेला. इतक्या फालतू सीरियल बायका का पाहतात ? त्या पाहतात म्हणून यांचे फावते. म्हणून सारख्या एकसारख्याच सीरियल बनवल्या जात आहेत. कुठे अक्कल गहाण ठेवलीस बा प्रेक्षका! &lt;br /&gt;&lt;br /&gt;हल्ली मराठी मालिकांची शीर्षक तर उगाच काहीपण ठेवली जातात. जसे &lt;b&gt;माझिया प्रियाला प्रीत कळेना, स्वप्नांच्या पलिकडले, तुजविण सख्या रे, मन उधाण वाऱ्याचे, कळत नकळत, आभास हा&lt;/b&gt;...आता या शीर्षकाचा कथानकाशी काही संबंध नाही...पण शीर्षक गीत चांगले असले पाहिजे या हट्टापायी काहीपण नाव ठेवून देतात. त्यातल्या त्यात लज्जा, अनुबंध या मालिकांनी काहीतरी वेगळे विषय तरी हाताळले. पण भरकटणे हा स्थायीभाव असल्याने त्याही वाहवत गेल्या. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' मधून काही नवे कलाकार आले पण बहुतेक पुन्हा त्याच टिपीकल मालिकांमध्ये रमले. मराठी तरुणाईच जर या मालिका करू लागली तर काय म्हणावे ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही दिवसांपूर्वी एक बातमी ऐकली कि &lt;b&gt;'चार दिवस सासूचे'&lt;/b&gt; हि मालिका बंद झाली म्हणून. पण मला लगेच कळले की ही अफवा असणार. अशी कशी बरी बंद पडेल. वर्षानुवर्षाचा इतिहास आहे या मालिकेला. मी शाळेत होतो तेव्हापासून लागायची ही, अजूनही आहेच. कोणत्या मुहूर्तावर चालू केली होती ते एक शोधायला हवे. बाकी फार लहानपणी एक &lt;b&gt;'दामिनी'&lt;/b&gt; नावाची मालिका होती जी बराच काळ चालली पण या मालिकेचे सगळे रेकॉर्ड्स मोडायचे असे ठरवून 'चार दिवस...'सुरु झाली. 'भिकेला लागलो तरी चालेल पण मालिका चालूच ठेवायची...'असा बहुतेक या मालिकेच्या निर्मात्यांचा निर्धार असावा. किंवा निदान सचिन तेंडूलकरचा आदर्श तरी त्याच्या डोळ्यापुढे असावा. म्हणजे या मालिकेच्या सुरुवातीला जे जन्मलेही नव्हते त्यांना ही बहुतेक देशमुख घराण्याचे पणतू-खापर पणतू व्हायचे भाग्य मिळणार...कठीण आहे! &lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून एका गोष्टीचे फार वाईट वाटते ते म्हणजे मराठीत इतके चांगले चांगले कलाकार असूनही ते सगळे या सिरीयलच्या कचाट्यात अडकून पडले आहेत. इथे पैसा मिळतो, झटपट नाव मिळते म्हणून रंगभूमी गाजवणारे कलाकारही या टुकार मालिकांत काम करत आहेत. चांगल्या मालिका बनत नाहीत हे खरे असले तरी &lt;b&gt;असंभव, अग्निहोत्र&lt;/b&gt; सारख्या मालिकांना प्रेक्षक ही मिळाले व कौतुक ही झाले. चांगली मालिका बनवायची प्रक्रिया ही चित्रपटाप्रमाणेच असावी. ज्याला काही निश्चित कथानकच नाहीये ती चांगली मालिका कशी बनेल आणि नंतर हवे तसे कथानकात बदल करू या सध्याच्या वृत्तीमुळे मालिकेचा शेवटही (लो टीआरपी मुळे) कसाबसा केला जातो. मालिका निर्माते केवळ पैसा कमावण्याच्या दृष्टीने मालिका बनवत आहेत. काही चांगली कलाकृती सादर करावी असे कुणालाच मनापासून वाटत नाही त्यामुळे आपण पाहणार तरी काय ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;या टुकार मालिकांविषयी राज ठाकरेंचे काय मत आहे हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. म्हणजे त्यांचा यांना विरोध असेल तर लागलीच एक आंदोलन करून टाकू. मराठी प्रेक्षकांवरील अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. चला तर मग एक पत्र पाठवूनच देऊ.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-2630338303095639010?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/2630338303095639010/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/05/blog-post_28.html#comment-form' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/2630338303095639010'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/2630338303095639010'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/05/blog-post_28.html' title='सिरीयल कीलिंग'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-7532050758254229835</id><published>2011-05-20T20:18:00.004+05:30</published><updated>2011-10-26T12:36:09.255+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपट'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्लॅमर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कला'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बालगंधर्व'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सामाजिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><title type='text'>कलेचं देणं</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;कलेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे म्हणा. तसे पाहिले तर प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात कोणत्या ना कोणत्या कलेचे वरदान लाभलेले असते. महत्वाचे हे आहे की आपण त्या कलेला कसे जोपसतो ते. कित्येकांना आपल्या अंगी असणार्‍या कलेचे महत्त्वच कळत नाही. काहींना ते ठाऊक असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. असे म्हणतात की कला हे देवाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. जिथे आपण 'मी'पणा विसरून त्या कलेच्या धुंदीत हरवून जातो आणि या कलेतून मिळणारा आनंद ही स्वर्गीयच असतो, थेट ईश्वराशी भेट व्हावी असा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कला नक्की काय आहे? ती एक ईश्वरसेवा आहे, ती मनोरंजनासाठी आहे, समाजप्रबोधनासाठी आहे की केवळ पैसा कमवण्यासाठी आहे. ती याहून बरेच काही आहे. कलेतून पैसा कमावणे हा त्याच्या प्राथमिक हेतू तरी नक्कीच नाही. तरीही जे अगदीच गरीब आहेत, ज्यांचा उदरनिर्वाहच या कलेवर आहे, ज्यांना ती अमुक एखादी कला सोडून काही येत नाही त्यांनी आपला संसार चालवण्यासाठी, आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कलेचा वापर केला तर त्यास काही एक हरकत नाही. बहुधा देवाने ती कला त्यांना यासाठीच दिली असावी. हरकत आहे ती कलेचा बाजार मांडणार्‍यांची. आपली कला विकून भरघोस पैसा कमवण्याची स्वप्ने पाहणार्‍यांची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर कलावंत सच्चा असेल आणि आपल्या कलेवर मनापासून प्रेम असेल तर त्या कलाकारासाठी सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर ती त्याची कला. तीच त्याची देवता असते आणि तीच सर्वस्व असते. तिच्याशिवाय इतर काहीच रुचत नाही, पटत नाही. आयुष्यात एक निष्ठा राखवी तर ती कलेशी, असे एका कलाकाराचे आयुष्य असते. मग ती विकली कशी जाऊ शकेल? एक सच्चा कलावंत आपल्या कलेशी, आपल्या देवतेशी कायम प्रामाणिक राहतो आणि त्याने तसे वागणेच अपेक्षित आहे. मग कला ही विकाऊ असते का ? मला असे मुळीच वाटत नाही. कला ही कधीही पैशाच्या किंवा कुठल्याही मूल्याच्या प्रमाणात मोजली जाऊ शकत नाही. तिचे कौतुक होऊ शकते, तिला दाद दिली जाऊ शकते. राजाच्या दरबारी कलेला मान मिळत असे. राजा कलावंतांचा सन्मान करी पण त्यांना विकत थोडी न घ्यायचा. जे तिला पैशाच्या तराजूत मोजू पाहतात त्यांची कीव येते मला. आपण फारफार तर कलाकारांचा सन्मान करू शकतो. पैशाच्या मोबदल्यात आपण अमुक एक कला सादर करा हे म्हणणे किती चुकीचे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण हल्ली जो कलेचा बाजार मांडला जातोय ते पाहून निश्चितच खटकते. आजकाल अधिक तर लोक प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याच्या हेतूनेच या क्षेत्रात येत आहेत. रिअलिटी शोमुळे झटपट पैसा आणि नाव कमावण्याच्या दृष्टीने पालक देखील आपल्या मुलांना सहजरीत्याही कलेची आणि स्पर्धेची ओझी पेलायला भाग पाडत आहेत. त्यामुळे हे होतकरू कलाकार केवळ परीक्षकांचे कौतुक, मोठमोठे सेट्स, प्रेक्षकांच्या टाळ्या यात हरवून जाणार आणि हे शो बंद झाल्यावर ही झगमगती दुनिया एकदम नाहीशी होणार आणि ते पुन्हा जमिनीवर येणार. यातून टिकाव धरणे हे फार कठीण असते कारण आपणच त्यांना या ग्लॅमरची सवय लावून देतो. मग यातून कलाकार निर्माण झाले तरी त्यांची निष्ठा पूर्णत: कलेशी राहीलच याची खात्री कशी देणार ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजच बालगंधर्वांचा चित्रपट पाहिला. या अशा जुन्या काळातल्या कलाकारांना पाहून वाटते की त्यांनी जी जपली ती खरी कला. आपण जिला कला म्हणतो, जी कला जपतो ती त्याच्या कुठे आसपासही नाही. घर-दार सोडून एका कलेचा ध्यास घेऊन सारे आयुष्य खर्ची पाडणे हे आजच्या पिढीला कितपत जमण्यासारखे आहे. बालगंधर्वांसारखे असे कितीतरी दिग्गज कलावंत कायम पडद्याआडच राहीले असतील त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचली नाही म्हणून काही त्यांनी कलेची सेवा सोडली नाही. जे काम देवाने त्यांना सोपवले ते आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांना दिले. जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना आयुष्याची कित्येक वर्षे त्यांनी खर्च पाडली आणि कित्येक कठीण प्रसंगांना तोंड दिले असेल ते तिथे उपस्थित राहून टाळ्या वाजवणारे कल्पनाही करू शकणार नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही दिवसांपूर्वी एक मराठी दिग्दर्शक त्याच्या मुलाखतीत म्हणाला की, 'हल्ली कलेचा व्यवसाय झाला आहे. निर्मात्यांना कला की कलेसाठी नसून पैसा कमवण्यासाठी हवी आहे.'' हे अगदी माझ्या मनातलेच सांगितले त्याने. काही चांगली कला सादर करावी असे फार कमी जणांना वाटते. आनंदाची गोष्ट म्हणजे मराठीत आता नव्या विषयांचे चित्रपट येत आहेत, नवी नाटके येत आहेत. पण लोक घराबाहेर पडून पाहायला गर्दी करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कलेचे हवे तसे चीज होत नाहीये. सीरीयल मात्र खोर्‍याने येत आहेत. जिथून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे तिथे अतिशय टूकार दर्जाची कला सादर केली जाते. मराठी सीरीयल मधे कितीतरी दिग्गज कलाकार काम करत आहेत. पैसा अधिक मिळतो हेच जर त्यामागचे कारण असेल तर हे फार चुकीचे आहे. या कलाकारांनी स्वत:हून पुढाकार घेत हे शिवधनुष्य पेलले पाहिजे. एक कलाकार म्हणून उत्तम तेच सदर करायला आपण बांधील आहोत याची जाणीव केव्हा होणार यांना ? आजच्या घडीला देखील जे कलावंत आपल्या क्षेत्रात यशस्वी आहेत ते त्यांच्या कलेशी प्रामाणिक आहेत म्हणूनच. ग्लॅमरच्या ओघात वाहून जाणारे आपल्या कलेशी एकनिष्ठ कसे राहू शकतील ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठीतल्या एका कलाकाराने मागे मुलाखतीत सांगितले होते की, हल्ली नाटकांना जे अनुदान दिले जाते ते बंद केले जावे कारण नाटक निर्मितीच मुळात अनुदानाचे हिशोब ठेवून केली जाते मग ते नाटक, त्यातील विषय आणि इतर सगळ्याच गोष्टी दुय्यम स्थानावरच राहिल्या. अशाने चांगली कलाकृती कशी पुढे येणार? मराठीत तर नाटकांची मोठी परंपरा आहे. मराठी रंगभूमीवर काम केलेल्या लोकांना इतरत्रही मान दिला जातो. मग ही नाटकेसुद्धा व्यवसायाच्या हेतूने बनवली गेली तर मग ती मालिकांच्या वाटेने जायला वेळ लागणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नटरंगचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, हा चित्रपट म्हणजे सर्व दृष्टीने उत्तम कलाकृती होती. उत्कृष्ट संगीत, अर्थपूर्ण गीतलेखन, सुंदर अभिनय आणि कथानक. चित्रपट अतिशय गाजला तो अजय-अतुलच्या अप्रतिम संगीतामुळे. हीच गाणी सर्वत्र वाजू लागली. हल्लीच एका टी.व्ही.वरील कार्यक्रमात 'नटरंग उभा' या गाण्यावर नृत्य सदर झाले. एकवेळ 'वाजले की बारा' आणि 'अप्सरा आली' या गाण्यांवर नृत्य सादर करणे सोपे आहे पण 'नटरंग उभा' सारख्या गाण्याचे सादरीकरण त्या गाण्याचा अर्थ आणि भाव समजून न घेता केली तर निदान आमच्यासारख्या रसिकांना खटकतेच. आणि श्रोतेही केवळ कानाने ऐकल्यासारखे त्या गाण्यांचा आनंद घेणार असतील तर ते त्या कलावंतांनाही आवडणार नाहीच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कलेच्या संदर्भातील नेहमी खटकनारी अजुन एक गोष्ट म्हणजे चांगल्या गाण्यांच्या चालीवर देवाची किंवा इतर कसली ही खालच्या दर्जाची गाणी बनवली जातात. म्हणजे आपण देवाच्याच दारातील फुले चोरायची आणि पुन्हा त्यालाच वाहायची. अशाने कोणता देव पावनार आहे यांना? आणि भरीस भर म्हणून ही इतकी वाईट गाणी आनंदाने ऐकनारे लोक ही आहेत. चोरांना असे पाठीराखे असले की अजुन काय होणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी काही कुणी कलाकार नाही. मी फक्त मला जमेल तशा मोडक्या-तोडक्या कविता करतो. गाण्यावर प्रचंड प्रेम आहे पण फक्त ऐकण्याइतकेच कळते. तरीही कविता आणि गाणे या दोन गोष्टींनी माझे सारे आयुष्य व्यापून राहते आणि कायमच राहील. माझ्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, त्यात किती यश, किती अपयश, सुख-दु:ख असेल याहीपेक्षा या दोन गोष्टी कायम माझ्या सोबत असतील याची जाणीव फार सुखावणारी आहे. माझी कला माझ्यासोबत आहे. मला नको तो पैसा, नको ती श्रीमंती कारण इथे समाधान नाही, ते या कलेतून मला मिळते. अजुन तर बरीच वर्षे गाठायची आहेत त्यात बरेच काही करायचे आहे. पण पुढे कधी जर या क्षेत्रात काही करायची संधी मिळालीच तर शक्य तितका कलेशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करील इतके नक्की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जाता जाता &lt;b&gt;' बालगंधर्व'&lt;/b&gt; चित्रपटातील काही गोष्टी आठवल्या त्या इथे नमूद करतो. बालगंधर्वांनी कायम रसिकांची सेवा करण्यातच धन्यता मानली. बालगंधर्वांनी कलेचा व्यवसाय नाही केला, त्यांनी ती एक तपश्चर्या म्हणूनच स्वीकारले. त्यांनी कधीच पैशासाठी किंवा इतर कुठल्याही मोहासाठी कलेशी, आपल्या रसिकांशी प्रतरणा केली नाही. त्यांना जे काही लाभले होते ते दैवी वरदानच होते तेच त्यांनी रसिकांना वाटले.&lt;br /&gt;&lt;b&gt;तेरा तुझे मैं सोप दूँ....कुछ भी नही है अब मेरा...&lt;/b&gt;&lt;br /&gt;गीतकाराने जे लिहिले तेच त्यांच्याबाबत अगदी हुबेहुब लागू होते.एका प्रसंगी बालगंधर्व म्हणतात- 'अमरत्व मिळवण्यासाठी काम नाही करायचे त्यांना, आनंद घेण्यासाठी करायचे आहे' आणि मग असेच कलाकार खर्‍या अर्थी अमर होऊन जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;( ता.क.- ही पोस्ट 'बालगंधर्व' पाहण्याआधीच लिहिली होती. पण मुद्दामहून चित्रपट पाहिल्यावरच पोस्ट करत आहे )&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-7532050758254229835?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/7532050758254229835/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/05/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7532050758254229835'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7532050758254229835'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='कलेचं देणं'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-6918966879384782211</id><published>2011-04-08T16:21:00.002+05:30</published><updated>2011-11-14T17:10:13.102+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सचिन'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वर्ल्ड कप'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आनंदी-आनंद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='२०११'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भारत'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='क्रिकेट'/><title type='text'>मला भारतरत्न पाहिजे !</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-O7iWQavDW84/TZ7lwd3b5vI/AAAAAAAAAeA/ur0swHmUbRQ/s1600/190860_152562244808712_100001648115251_321590_5469952_o.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/-O7iWQavDW84/TZ7lwd3b5vI/AAAAAAAAAeA/ur0swHmUbRQ/s320/190860_152562244808712_100001648115251_321590_5469952_o.jpg" width="278" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;बस...ठरलं ! आता अजून काही नाही...हट्ट म्हणा हवा तर पण पाहिजेच...काय म्हणता ? मला कशाला...? छे छे...माझ्यासाठी नाही..मी कुठे काय केलेय...मला हा पुरस्कार पाहिजे तो आपल्या सचिनसाठी ! क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याने एक हट्ट केला होता...भारताला विश्वचषक जिंकून देण्याचा ! आता २१ वर्षाच्या तपानंतर कुठे त्याचे स्वप्न साकार झालेय. २ एप्रिल २०११ रोजी तो सोनियाचा दिवस उजाडला आणि ती झळाळती ट्रॉफी त्याच्या हाती आली. आणि तेव्हापासून सगळे जण वेडेच व्हायचे बाकी राहिलेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला पुरस्कार पाहिजे असे म्हटले कारण सचिनचा गौरव तो आमचाच गौरव. सचिनने शतक केले तर आपल्याला आपणच शतक झळकावल्याचा आनंद होतो. सचिन आउट झाला म्हणजे आपणच आउट झाल्याचे वाटते. सचिन खुश तर आपण खुश. गेल्या वर्षी सचिनने &lt;a href="http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/06/blog-post_6028.html"&gt;द्विशतक&lt;/a&gt; केले तेव्हा कोण आनंद झाला होता. भारतभर नुसता जल्लोष आणि आनंदी-आनंद ! पन्नास षटके खेळून काढणे ते ही वयाच्या ३७व्या वर्षी काही सोपी गोष्ट आहे का? पण त्याने ते केले. सेहवागने ही ठरवले ५० षटके खेळायचे पण काही जमले नाही. राजाचा मुकुट राजालाच लाभायचा होता ! म्हणून एवढे पराक्रम केल्यावर आता नवीन काय करावे असा विचार त्याने केला आणि मारले एक द्विशतक ! आता इतका आनंद दुसरा कोणी खेळाडू देतो का ? सचिन मात्र देतो. भारतीयांचे काहीतरी ऋण असल्यागत एकामागे एक शतक करून फेडत जातो. आता वर्ल्डकपही जिंकून दिला. काय करावे या माणसाला ? ( गेल्या काही वर्षात तो देव असल्याचा साक्षात्कार झालाय लोकांना !)   &lt;br /&gt;&lt;br /&gt;सचिनबद्दल बोलायला लागलो की शब्दच अपुरे पडतात...किती बोलू आणि काय बोलू. त्याच्या महानतेविषयी तर दर महिन्याला एक-एक पोस्ट टाकेन मी. मला एकट्यालाच नाही सर्व सचिनच्या चाहत्यांची हीच अवस्था आहे. गेल्या २१ वर्षात त्याने किती पराक्रम गाजवले. त्याच्या कारकिर्दीत रेकॉर्ड आणि सचिन हे समानार्थी शब्द बनले. बघता-बघता सगळे या जादूगाराच्या करामतीने गुंग झाले. हल्लीच नाना पाटेकरने आपल्या लेखात सचिनला म्हटले ' 'आमच्या वेळी अमुक एक महान खेळाडू होता' असे म्हणायचे पण तुझ्या बाबतीत तसे म्हणता येत नाही कारण तू सर्वांच्या वेळीस होतास !' आता अजून किती वर्षे खेळेल ते तोच (देवच) ठरवेल !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-ZFnNpRyIe1g/TZ7lCF3pWZI/AAAAAAAAAd4/NB9iFmcyiBc/s1600/Sachin%2B001.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="247" src="http://2.bp.blogspot.com/-ZFnNpRyIe1g/TZ7lCF3pWZI/AAAAAAAAAd4/NB9iFmcyiBc/s320/Sachin%2B001.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;कितीतरी दिग्गजांनी भारत सरकारला सांगितले की सचिनला भारतरत्न द्या पण त्यांना काही मुहूर्त सापडत नाहीये. एक तर सचिन स्वत:हून कधी मागणार नाही...सचिन काही पुरस्कारांसाठी खेळत नाही. आता हा एक पुरस्कार मिळाला की सवयीप्रमाणे तो भारतीयांना अर्पण करेन म्हणजे आम्हालाच मिळाला की ! भारत सरकार बहुतेक निवृत्त होण्याची वाट बघताहेत पण त्याला अजून बरीच वर्षे खेळायचे आहे, तुम्ही किती वर्षे हा पुरस्कार राखून ठेवणार आहात ?  मला कधी कधी वाटते की हा नक्कीच कोणीतरी अवतारी पुरुष असून, निवृत्त झाल्यावर अचानक गायब वगैरे होईल किंवा स्वर्गातून त्याला न्यायला विमान तरी येईल. मग त्याच्या पश्चात पुरस्कार देण्यापेक्षा आता दिला तर चांगले होईल. तेवढेच आम्हा सचिन-वेड्या भारतीयांना अजून एक आनंदाची बातमी. बस आता लवकरात लवकर तो शतकसोहळा आटोपता घे. म्हणजे पुढची पोस्ट लिहायला अजुन एक निमित्त.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-6918966879384782211?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/6918966879384782211/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/04/blog-post.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/6918966879384782211'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/6918966879384782211'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/04/blog-post.html' title='मला भारतरत्न पाहिजे !'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-O7iWQavDW84/TZ7lwd3b5vI/AAAAAAAAAeA/ur0swHmUbRQ/s72-c/190860_152562244808712_100001648115251_321590_5469952_o.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-9448948226279064</id><published>2011-03-01T15:02:00.001+05:30</published><updated>2011-11-14T17:12:26.849+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तरुणाई'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वेग'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अपघात'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='क्रिकेट'/><title type='text'>विकेट</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;क्रिकेट आणि आपले जीवन हे माझ्या बाबतीत प्रत्येक वेळी कुठे न कुठे जोडले जातात. क्रिकेटप्रेमी असल्यामुळे हे होणे साहजिक आहे आणि भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर क्रिकेट विषयी चर्चा, वाद-विवाद हे नित्यनेमाने होत असतात. कुणी कशी कॅच घेतली, कुणी किती सिक्स मारले, कुणी किती मॅचेस जिंकल्या, कुणी किती विकेट्स काढल्या etc . क्रिकेटप्रेमी हल्ली एक नवीन वाक्प्रचार वापरू लागले आहेत तो म्हणजे 'विकेट जाणे'. ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण कुण्या व्यक्तीच्या निधनाच्या बातमीला हल्ली विकेट जाणे असे क्रिकेटच्या शब्दकोशातील शब्द येऊ घातले आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="https://lh3.googleusercontent.com/-dYlEEORqRmg/TWuqBfo2RhI/AAAAAAAAAZk/33l210b3WA8/s1600/360px_cricket-bails_shutter.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="213" src="https://lh3.googleusercontent.com/-dYlEEORqRmg/TWuqBfo2RhI/AAAAAAAAAZk/33l210b3WA8/s320/360px_cricket-bails_shutter.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;You Are OUT!&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;काही दिवसांपूर्वी एका मित्राचा अपघात झाला आणि त्यातच गेला. मित्र म्हणजे फार जवळचा नसला तरी ओळखीच्यांपैकी होता आणि त्याचा अपघात असाच बाईकवर असताना झाला. बाईक अपघात हा काही नवीन प्रकार नाही. तारुण्यात प्रवेश केला कि प्रत्त्येकाला बाईक हवी असते. तरुणांना फक्त क्रेझ असते ती वेगाची, आपल्यापेक्षा फास्ट पळणाऱ्याला मागे टाकण्याची. या क्षुल्लक गोष्टीपायी सुद्धा कित्येकांनी जीव गमावले आहेत किंवा दुखापती करून घेतल्या आहेत. कशाला आपण या मोहात पडत राहतो ? आपल्या सुरक्षिततेहून का महत्त्वाचे आहेत हे खेळ? आपल्याला मनावर, आपल्या वेगावर का नाही नियंत्रण ठवत आपण ? पण तरुणाई असते आपल्याच धुंदीत! तिला कशाची पर्वा नसते, तिला फक्त आनंद लुटायचा असतो. हायवे रोड वर नेहमी लिहिलेले आढळते -'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक'. कारण बहुतेक अपघात हे वेगावर नियंत्रण न ठेवल्यानेच होतात. आपल्याला एका क्षणभरासाठी मिळणारा आनंद हा आपल्याला एका मिट्ट काळोख्या वाटेकडे नेऊ शकतो याचे तरी भान असायला हवे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आई नेहमी म्हणते कि मुलगा घराबाहेर पडला कि तो जोपर्यंत सुखरूप घरी पोहोचत नाही तोपर्यंत जीवात जीव नसतो. कारण हल्ली कुठे काय होईल याचा नेम नाही. आपले आई-वडील केवळ आपल्या मुलाच्या इच्छेखातर त्याला बाईक आणून देतात. कित्येकांना परवडत नसते तरीही, पण याची जाण किती तरुणांना असते ? आपल्याला घरी कुणीतरी आपली वाट बघत असल्याचे, कुणीतरी काळजी करत असल्याचे भान असेल तर मित्रांच्या नादी लागून असले जीवावर बेतणारे प्रकार नक्कीच कमी होतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्रिकेट मध्ये असे बऱ्याचदा होत असते. एक चूक, एक सुटलेली कॅच, एक चुकीचा शॉट आणि मग पुन्हा मागे वळायला संधीच नाही. आपले आयुष्यही असेच असते पण आपल्याला जोपर्यंत अशा प्रसंगाला सामोरे जात नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य जाणवत नाही. क्रिकेट मध्ये किमान पुढच्या मॅच मध्ये पुन्हा खेळायला संधी मिळेल पण इथे एकदा विकेट गेली कि खेळ खल्लास...&lt;br /&gt;&lt;br /&gt;सेहवाग मागे एका मुलाखतीत म्हणाला होता...कि बॅट्समन कितीही चांगला असला तरी त्याला आउट करण्यासाठी एक चेंडूच पुरेसा ठरतो. क्रिकेट प्रमाणेच इथेही ती एक चूकच फार महागात पडते. एक क्षण आयुष्य संपायला पुरेसा ठरतो. एक क्षण जिथे चूक-बरोबर यातील अंतर दिसेनासे होते, आपल्या सुरक्षेपेक्षा मस्तीची नशा अधिक चढते. जिथे होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता पुढे पुढे जात राहतो आणि मग पश्चाताप करायला ही संधी मिळत नाही. तारुण्यात आपल्याला चांगले-वाईट, चूक-बरोबर भले ही कळत असेल पण जर ते आपल्या आचरणात आणता नाही आले तर काय फायद्याचे? अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यातील मॅचमध्ये विकेट गमावली तर आपल्याला पुन्हा खेळायची संधीच मिळणार नाही. सुनील गावस्कर यांनीही एका चित्रपटातील गाण्यात म्हटले आहे...हे जीवन म्हणजे क्रिकेट रे राजा...जो हुकला तो संपला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणूनच सांगावेसे वाटते आहे कि आपल्या वेगावर नियंत्रण ठेवा, आपल्या आई वडीलांनी आपल्यासाठी खूप स्वप्न पाहिली असतील ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यांच्या उतारवयात त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आपलीच आहे. आयुष्य असल्या क्षुल्लक चुकांपायी गमावण्यासाठी नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i&gt;भारतात होणार्‍या अपघातांबद्दल माहिती देणारा एक लेख-&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;http://loksatta.in/index.php?option=com_content&amp;amp;view=article&amp;amp;id=126412:2011-01-02-18-49-36&amp;amp;catid=25:2009-07-09-02-01-06&amp;amp;Itemid=2&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-9448948226279064?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/9448948226279064/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/03/blog-post.html#comment-form' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/9448948226279064'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/9448948226279064'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/03/blog-post.html' title='विकेट'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='https://lh3.googleusercontent.com/-dYlEEORqRmg/TWuqBfo2RhI/AAAAAAAAAZk/33l210b3WA8/s72-c/360px_cricket-bails_shutter.jpg' height='72' width='72'/><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-4853012795622947322</id><published>2011-02-12T16:04:00.000+05:30</published><updated>2012-02-12T11:21:13.360+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रेम कविता'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रेम'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हॅपी वॅलेन्टाईन डे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लवलेटर'/><title type='text'>प्रेमात पडतो जो तो...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;प्रेम म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना. आपल्या आवडत्या व्यक्तीशी असणारे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते यात त्या दोन जीवांना जोडणारा दुवा म्हणजे प्रेम. आपण प्रेम कुणावरही करू शकतो पण तरीही प्रेम म्हटले की प्रथम आपल्याला आठवतात ते दोघेच-प्रियकर आणि प्रेयसी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रेमात पडल्यावर कसे सर्व जग रंगीबेरंगी वाटू लागते. आपल्यावर प्रेम करणार्‍या किंवा आपण जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचे बोलणे, हसने, तिचा आवाज, तिचे असणे-नसणे सगळ्याला खूप जास्त महत्त्व मिळायला लागते आणि तिच्या शिवाय या जगात काहीच सुंदर भासत नाही. तिच्याच आठवणीत रमू लागतो, तिच्याच भोवती घुटमळू लागतो. ती म्हणजे प्रेम, ती म्हणजे आयुष्य, ती म्हणजे सर्वस्व. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TVT7Ixm2daI/AAAAAAAAAY0/-zxuI2RVZ70/s1600/images2.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="152" src="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TVT7Ixm2daI/AAAAAAAAAY0/-zxuI2RVZ70/s320/images2.jpg" width="244" /&gt;&lt;/a&gt;प्रेमात पडल्यावर बहुतेकांना कविता सुचू लागतात. कित्येकांना गाणीही सुचू लागतात किंवा निदान आपण बरे गातो असे भास तरी होतात कारण प्रेमात पडल्यापासून बरीच रोमॅंटिक गाणी गुणगुणायला सुरूवात झालेली असते. आपल्या मोबाईल मध्ये तिला आवडणारी गाणी ठेवली म्हणजे बरेच फायदे होतात. एकतर आपले महत्त्व फार वाढते शिवाय गाणी ऐकण्याच्या निमित्ताने आपल्याला तिची कंपनीही मिळते. त्यात ही जर एक हेडफोन तिच्या कानात आणि एक आपल्या कानात असेल तर अजुनच छान. कुणाला दिसो वा ना दिसो - इथे 'Do Not Disturb' चा बोर्ड लागला आहे असे गृहीत धरावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पावसाचे आणि प्रेमाचे ही असेच अतूट नाते आहे. पाऊस पडू लागला की तिची आठवण होते. तिच्या सोबत गेल्या पावसाळ्यात भिजलो होतो ते आठवून आपणच गालातल्या गालात हसू लागतो. कधीतरी कॉलेजला जाताना आपण छत्री आणायला विसरतो (किंवा आणली असेल तरी बॅगेतून बाहेर काढत नाही) तेव्हा तिच्या छत्रीतून एकत्र चालताना हृदयात होणारी धडधड ते आठवले की पुन्हा जाणवू लागते. परिस्थिती याहून उलटी असेल तरी हरकत नाही म्हणजे तिने छत्री आणली नसेल तर आपण मित्राला ताटकळत ठेवून तिला घरी सोडवायला गेलो तरी परत येताना हवेत तरंगत येतो. खरं तर प्रेमात पडलो की हवेतच असतो आपण. कोणी-कोणी आठवत नाही आपल्याला. बस्स मी आणि ती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रेमात पडणे हे असे आयुष्य बदलवून टाकणारे असते. जो माणूस आयुष्यात एकदा ही प्रेमात पडत नाही त्याचे आयुष्य 'ब्लॅक अँड व्हाईट' चित्रपटांसारखे असेल. पण प्रेम हे ठरवून करता येत नाही. आपण नकळत त्यात गुंतत जातो आणि मग कळते की आपण प्रेमात पडलो आहोत. प्रेमात पडण्याचे तसे काही ठराविक वय नाही पण तरीही प्रेमात पडण्याचे मूळ वय म्हणजे कॉलेजचे. हल्ली शाळेतही हे प्रकार होत आहेत. पण कॉलेजमध्ये गेलो की आपल्याला जास्तच अक्कल आलेली असते त्यामुळे आपण करतोय ते सगळे बरोबर आणि बाकी सगळे चुक. आपले ते प्रेम, बाकीच्यांचे लफडे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही जण ठरवूनच प्रेमात पडतात. सगळेच प्रेमात पडतात मग मी पण पडणार. मला ही कोणीतरी स्पेशल हवे आहेच. मग त्या स्पेशल व्यक्तीचा शोध नकळतच सुरू होतो. ही...? का ती...? त्यापेक्षा हीच बरी...असे करता करता स्वप्नातली परी कधीतरी अचानक समोर येते. आधीच रंगीबेरंगी असणार्‍या कॉलेजमध्ये तिच्या येण्याने अधिकच बहर येतो. तिचे नाव, पत्ता शोधण्यापासून, तिच्या मित्र-मैत्रिणी सगळ्यांची चौकशी सुरू होते आणि मग काहीतरी मार्ग काढून तिच्याशी मैत्री करण्याची तयारी केली जाते. मैत्री हे प्रेमाचे पहिले पाऊल म्हणून शहाणे लोक कुणी नुसती स्माईल दिली तर लगेच तिला प्रपोझ करत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत असा उतावीळपणा चांगला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा का मैत्री झाली की मोठे काम झाले. मग प्रेमात पडायला किती वेळ लागतो ? (?) नुसते प्रेमात काही पडून होत नाही. आपल्याला तिच्याबद्दल काय वाटते ही सांगणे ही महत्त्वाचे आहे आणि तितकेच अवघड ही. पण कुणाला तरी प्रपोझ करणे ही देखील एक कला असावी. जे टाईमपास म्हणून प्रेम करतात ते सहज प्रपोझ करून मोकळे होतात याउलट ज्यांचे कुणावर तरी मनापासून प्रेम असते त्यांनाच हे फार अवघड जाते. आपल्या प्रिय व्यक्तीला गमवण्याच्या भीतीनेच असे होत असावे. पण जोपर्यंत आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत तिला तरी हे कसे कळणार ? मग त्यासाठी हि नवनव्या युक्त शोधाव्या लागतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TVT70qA_knI/AAAAAAAAAY8/bjDHtvvgY5Y/s1600/images.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TVT70qA_knI/AAAAAAAAAY8/bjDHtvvgY5Y/s1600/images.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;'लवलेटर'! हे तर फारच दुर्मिळ झाले आहे. पूर्वी तिच्याशी बोलायला मिळत नसे, आपल्या मनातले सांगता येत नसे म्हणून लवलेटर हे प्रेमातील रामबाण उपाय असलेले अस्त्र आता कुणीच वापरत नाही. मुळातच मोबाईल आणि इंटरनेट यामुळे  त्याला तिच्याशी जे काही बोलायचे आहे ते सहज शक्य होते. एसएमएस मार्फत ही काही जण प्रपोझ करतात असे ऐकले आहे. त्यामुळे त्याच्याकडून मिळालेले लेटर गुपचुप वाचणे आणि त्याला उत्तर म्हणून दुसरे लेटर लिहिणे यातली गंमत आता हरवली आहे. अजुन एक गोष्ट म्हणजे हल्ली कुणी आपल्या पॉकेटमध्ये तिचा फोटो लपवून ठेवत नाही. कारण मोबाईलमध्ये फोटोग्राफीची सोय झाल्याने असल्या पकडल्या जाणार्‍या चोर्‍या का कराव्यात? &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला कुठे ना कुठे मिळतोच. बहुतेकदा ते एकतर्फीच असते म्हणून प्रेम कवितांना आणि विरह कवितांना सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. प्रेम कबूल करणे यात एवढे घाबरण्यासारखे किंवा ते नाकारले तर कमीपणा येण्यासारखे काय आहे हेच कळत नाही. एरवी कित्येक गोष्टी सहज तिच्याशी बोलू शकतो पण प्रेमाचे तीन शब्द बोलू शकत नाही आणि म्हणून ही कथा मैत्रीच्या पुढे जातच नाही. प्रेमात पडायचा हक्क सगळ्यांनाच आहे आणि ते व्यक्त करायचा ही. मग आतापर्यंत कुणाला प्रपोझ केले नसेल तर ही संधी दवडू नका. बोलून टाका. नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. जे काही असेल ते होऊन जाऊ दे.ती स्वत:हून विचारेल याची वाट पाहत बसू नका. कदाचित ती पण हाच विचार करत असेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता वॅलेन्टाईन डे जवळ आलाय तर सगळीकडे ग्रीटिंग्स, गिफ्ट्स, केक्स, रोझेस, बलून्सनी बाजार भरले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी या सगळ्या शोभेच्या वस्तू खास असल्या तरी तुम्ही सर्वात जास्त काही देऊ शकत असाल तर त्यांना वेळ द्या.कारण नुसतेच प्रेम असून उपयोग नाही. प्रेमाच्या नात्याला जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आधीच बर्‍याच ब्लॉंगर्सनी बर्‍याच वॅलेन्टाईन आइडियास दिल्या आहेत. त्या वापरा किंवा तुम्ही स्वत:च नवीन शोधा आणि अजुनही कोणी भेटली नसेल तर लवकर शोधा. प्रेमात पडण्याचे वय निघून गेले असे नंतर म्हणत बसू नका. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हॅपी वॅलेन्टाईन डे!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-4853012795622947322?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/4853012795622947322/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/02/blog-post_12.html#comment-form' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/4853012795622947322'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/4853012795622947322'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/02/blog-post_12.html' title='प्रेमात पडतो जो तो...'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TVT7Ixm2daI/AAAAAAAAAY0/-zxuI2RVZ70/s72-c/images2.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-5652595466204116895</id><published>2011-02-03T11:58:00.001+05:30</published><updated>2011-02-10T14:36:48.060+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सचिन'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वर्ल्ड कप'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भारत'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='क्रिकेट'/><title type='text'>वर्ल्ड कप आला रे...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;क्रिकेट म्हणजे आपला एकदम लाडका खेळ. क्रिकेट खेळणे, पाहणे, क्रिकेट वर गप्पा, चर्चा या सगळ्यातच भारतीय लोकांना प्रचंड रस आहे. हल्ली तसे क्रिकेट मध्ये २०-२० आल्यापासून मूळ क्रिकेटकडे फारच दुर्लक्ष झाले आहे. २०-२० वर्ल्डकप शिवाय आयपीएल यांच्यामुळे क्रिकेट मधील रंगत निघून गेली आहे. सध्याच्या फास्ट लाईफला हे शोभणारे असले तरी अजूनही वन डे आणि टेस्ट बघणे  तितकेच छान वाटते. आता तर क्रिकेट पाहायला मोठे कारणच मिळाले आहे ते म्हणजे  वर्ल्ड कप २०११. वर्ल्ड कप केवळ १५ दिवसांवर येऊन ठेपलाय आणि क्रिकेट  रसिकांमध्येही चर्चेला सुरुवात झालीय.विशेष म्हणजे या वर्षी वर्ल्ड कप भारतात होत आहे त्यामुळे पूर्ण भारतभर सध्या क्रिकेट-फिवर चढला आहे.&lt;br /&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TUaLzPrCXII/AAAAAAAAAYg/DOq6IRwU35M/s1600/icc-cwc-mascot.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="156" src="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TUaLzPrCXII/AAAAAAAAAYg/DOq6IRwU35M/s200/icc-cwc-mascot.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;स्टंपी-मॅस्कॉट&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;वर्ल्ड कपचे हे १० वे वर्ष. यापूर्वी ९ वेळा वर्ल्ड कप स्पर्धा घेण्यात  आली. दरवर्षी वेगवेगळ्या देशात ही स्पर्धा घेतली जाते. १९८७ च्या वर्ल्ड कप  नंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा भारतात आली आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून वर्ल्ड कप होत असल्याने जुन्या सिरीज काही  पाहायला मिळाल्या नाहीत. पण जेव्हा पासून क्रिकेट कळायला लागले तेव्हा  पासून हा खेळ आवडतो आहे. वर्ल्ड कप मधल्या माझ्या आवडत्या सिरीज म्हणजे १९९६,१९९९ आणि २००३. कारण या आधीचे वर्ल्ड कप पाहण्याचा योगच आला नाही आणि २००७ च्या वेळी भारताने जी हाय खाल्ली ती पाहून तर जे घडले ते (वाईट) स्वप्नवतच वाटत होते. इतकी चांगली टीम असून पण साखळी सामन्यातच गारद व्हायची वेळ आली हे अगदीच खराब प्रदर्शन होते. आशा करूया कि भारतीय प्रेक्षकांसमोर तरी टीम इंडिया लाज राखेल.&lt;br /&gt;&lt;object class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://i.ytimg.com/vi/HJJ2x3sK628/0.jpg" height="266" style="clear: right; float: right;" width="320"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/HJJ2x3sK628?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266" src="http://www.youtube.com/v/HJJ2x3sK628?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;वर्ल्ड कप मध्ये एक गोष्ट नेहमी पाहायला मिळते कि फायनलपेक्षा सेमी फायनल अधिक चुरशीची होते. १९९६ च्या वेळीची सेमी फायनल कोण विसरू शकेल ? कलकत्त्यात इडेन गार्डन्स वर भारतातर्फे सचिन तेंडूलकर सोडून कोणीच खेळले नाही. एक सचिन विरुद्ध श्रीलंका असाच काहीसा सामना वाटत होता आणि सचिनची विकेट गेली तसा घात झाला. एकामागून एक सारे जण फक्त हजेरी लावून माघारी गेले. सेमी फायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यात इतक्या बेजबाबदारपणे खेळले कि शेवटी प्रेक्षकांनाही संताप अनावर झाला. निकाल हा लागला की प्रेक्षकांच्या व्यत्ययामुळे सामना श्रीलंकेने जिंकल्याचे जाहीर करण्यात आले. क्रिकेट प्रेमींच्या मनात हा पराभव अजूनही तितकाच सलत आहे.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;object class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://i.ytimg.com/vi/gqrr3p_y2nk/0.jpg" height="266" style="clear: right; float: right;" width="320"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/gqrr3p_y2nk?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266" src="http://www.youtube.com/v/gqrr3p_y2nk?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;असाच एक अजून सामना जो कधी न विसरता येण्यासारखा आहे. १९९९ ची सेमी फायनल- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. चुरशीचे सामने खूप होतात पण फार कमी सामने असे होतात ज्यात अनपेक्षित निकाल लागतात. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ पण तरीही या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने क्षुल्लक चुका करून सामना गमावला. एक तर हर्शल गिब्स सारख्या अप्रतिम दर्जाच्या खेळाडूने स्टीव वाची सोडलेली कॅच हीच त्यांना फार महागात पडली आणि सामन्याच्या शेवटाच्या षटकात जिथे चार चेंडूत जिंकण्यासाठी फक्त एक धाव हवी होती आणि ते ही स्ट्राईक वर फुल फॉर्म मध्ये असणारा लान्स क्लुसनर ज्याने पूर्ण वर्ल्ड कप मध्ये तुफानी बॅटिंग केली होती. त्या वेळीस ९९% लोकांनी मनोमनी हे मान्य केले होते की दक्षिण आफ्रिका आता अंतिम सामन्यात पोहोचली आहे पण घडले ते काही भलतेच. तिथे ती एक धाव घेताना क्लुसनर आणि डोनाल्ड दोघांनी ही कदाचित हाच विचार केला असावा की आपण जिंकलो आहोत. त्या क्षणी  केलेला उतावीळपणा खूप जास्त महागात पडला. दक्षिण आफ्रिका हरली आणि ऑस्ट्रेलिया फायनलला गेली. विस्डेनने या सामन्याला आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्वोत्तम सामन्यांत स्थान दिले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;object class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://i.ytimg.com/vi/JBv5DNxCoBc/0.jpg" height="266" style="clear: right; float: right;" width="320"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/JBv5DNxCoBc?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266" src="http://www.youtube.com/v/JBv5DNxCoBc?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;वर्ल्ड कप मधील अजून एक रंगतदार घटना म्हणजे भारत- पाकिस्तान सामना. आजपर्यंत पाकिस्तान वर्ल्ड कप मध्ये भारताला हरवू शकला नाहीये ही आपल्यासाठी वर्ल्ड कप जिंकल्यासमानच गोष्ट आहे आणि जेव्हा जेव्हा भारत- पाकिस्तान वर्ल्डकप मध्ये समोरासमोर आले आहेत तेव्हा भारतीय संघ चांगलाच खेळला आहे. त्यातील काही किस्से अजूनही रंगवून सांगितले जातात. १९९२ च्या वेळी मियांदाद आणि किरण मोरेची वादावादी असो किंवा १९९६ च्या वेळी आमीर सोहेल आणि प्रसाद मधली खुन्नस.&amp;nbsp; त्याच वेंकटेश प्रसादने १९९९ मध्येही पुन्हा प्रभावी कामगिरी करत पाकिस्तानला पाणी पाजले. २००३ च्या वेळी झालेली मॅच तर आनंद सोहळा! सचिन तर पेटलाच होता...शोएब, वासिम, वकार सगळ्यांना झोडपले. त्या सामन्यात मारलेले चौकार-षटकार हे त्याच्या एक-एक शतकाच्या बरोबरीस होते. २००७ च्या वेळीस मात्र हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी साखळीतच गारद झाले आणि घरी परतले. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये हा योग येईल कि नाही ते कळेलच. &lt;object class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://i.ytimg.com/vi/OpsSe_zvaoU/0.jpg" height="266" style="clear: right; float: right;" width="320"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/OpsSe_zvaoU?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266" src="http://www.youtube.com/v/OpsSe_zvaoU?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेकॉर्ड्स पाहिले तर (किंवा नाही पाहिले तरी ) कळते कि वर्ल्ड कप मध्येही ऑस्ट्रेलियानेच बाजी मारली आहे. ९ पैकी ४ वेळा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला आहे ते ही एका हॅट्रिकसह. वेस्ट इंडीजने ही लागोपाठ दोन वेळा वर्ल्ड कप जिंकला पण भारताने त्यांची परंपरा मोडत १९८३ मध्ये वर्ल्डकपवर नाव कोरले. तो 'याची देही याची डोळा' नाही पहिला पण निदान सचिन जेव्हा पासून खेळतो आहे ते सगळे वर्ल्ड कप पहिले हेच खूप आहे. १९८३ ची विजयगाथा बर्‍याचदा ऐकून आणि पाहून ही झाली. ऑस्ट्रेलियाच्या खेळात मात्र जिंकण्याची जिद्द कायम दिसत आली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ते हार मानत नाहीत आणि हे १९९९ च्या सेमी फायनलला कळलेच होते. इतर ही अनेक वेळा ते हातातून निसटलेले सामने जिंकवून दाखवतात आणि प्रत्येक वेळी जिंकवून देणारे स्टार खेळाडू नसतात हे अजून विशेष. २००३ च्या फायनलला भारताविरुद्ध खेळताना जी 'टीम इंडिया' सलग जिंकत फायनलला पोहोचली होती तिला फायनल मध्ये खेळणे हे काय दर्जाचे असावे लागते हे दाखवून दिले. त्या रिकी पॉंटिंगने जी आपली गोलंदाजी धुतली ती कायम स्वप्नात येऊन छळावी अशी. बाकी रिकी कितीही खडूस ऑस्ट्रेलियन असला तरी मला आवडतो. पण त्या दिवशी काही पाहवेना. २० वर्षांनी आलेली संधी भारताने सहजपणे गमावली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;object class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://i.ytimg.com/vi/2AaR9Su1Va0/0.jpg" height="266" style="clear: right; float: right;" width="320"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/2AaR9Su1Va0?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266" src="http://www.youtube.com/v/2AaR9Su1Va0?f=videos&amp;c=google-webdrive-0&amp;app=youtube_gdata" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;दक्षिण आफ्रिका माझी आवडती टीम पण ही टीम वर्ल्ड कप मध्ये नेहमी कमनशिबी ठरली आहे. कधी नियमांचे घोळ तर कधी त्यांच्या स्वत:च्याच चुकांमुळे. सर्व दृष्टीने परिपूर्ण असूनही ही टीम कुठेतरी कच खाते आणि बाहेर पडते. यंदाच्या वर्ल्ड कप साठी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही फेवरेटस समजले जात आहेत. आपल्या सचिनचा हा शेवटचा वर्ल्ड कप त्यामुळे त्याच्याकडून  सगळ्यांच्या फार अपेक्षा आहेत(नेहमीच असतात). वर्ल्डकप मध्येही त्याच्या  नावावर सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड्स आहे आणि अजून नवीन रेकॉर्ड्स करणे  त्याच्यासाठी काही अवघड नाहीये. या वेळीस फायनल मुंबईत आहे म्हणजे अजूनच मजा. मुंबईत फायनलला सचिनने अजून एक शतक ठोकले आहे आणि याच मैदानावर भारताने विश्वचषक जिंकल्याचे स्वप्न कोणत्याही क्रिकेटप्रेमीला वाटणे साहजिक आहे आणि त्यात विश्वचषक जिंकण्याचे सचिनचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी लोकांनी नवस वगैरे करायला सुरुवात केली आहे. आता देव पावो किंवा सचिन पावो, वर्ल्ड कप जिंका म्हणजे बस्स!&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TUaLzPrCXII/AAAAAAAAAYg/DOq6IRwU35M/s1600/icc-cwc-mascot.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-5652595466204116895?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/5652595466204116895/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/02/blog-post.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/5652595466204116895'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/5652595466204116895'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/02/blog-post.html' title='वर्ल्ड कप आला रे...'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TUaLzPrCXII/AAAAAAAAAYg/DOq6IRwU35M/s72-c/icc-cwc-mascot.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-131814092905376420</id><published>2011-01-14T16:42:00.002+05:30</published><updated>2011-02-10T14:35:52.943+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ईडियट बॉक्स'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फाल्तूगिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निरर्थक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रिऍलिटी शो'/><title type='text'>रिऍलिटी शो जिंकायचाय ?</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TTAuewZVCCI/AAAAAAAAAYE/uOVsIF7geAg/s1600/2293239853_ddd6bc4ef4.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TTAuewZVCCI/AAAAAAAAAYE/uOVsIF7geAg/s320/2293239853_ddd6bc4ef4.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;हल्ली सगळीकडे रिऍलिटी शो ची चलती आहे. प्रत्येक चॅनेलवर एक तरी रिऍलिटी शो आहेच. काही वर्षापूर्वी जिथे डेलीसोप्सने कब्जा केला होता तिथे आता रिऍलिटी शो ने त्यांची जागा बळकावली आहे. गायन, नृत्य, अभिनय, विनोद यांच्याबरोबरच अनेक विषयांवर रिऍलिटी शो सुरू झाले आहेत. त्यात क्वीज कॉंटेस्ट, कुकिंगपासून वेट लूसिंग पर्यंत बर्‍याच विषयांनी घुसखोरी केली आहे. आणि विशेष म्हणजे लोकांना हे पाहायला आवडत आहेत.कॉलेजगोइंग क्राउड पासून ते ऑफीसमधल्या स्टाफ पर्यंत सर्वत्र याची चर्चा चालू असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रिऍलिटी शो मधले स्पर्धक ही रातोरात स्टार होऊन जातात. इतक्या कमी वेळात प्रसिद्धी मिळत असेल तर कोणाला नको आहे. म्हणून या स्पर्धांमध्ये भाग घेऊन झटपट नाव कमवायच्या हेतूनेच सर्व जण इथे रांगा लावतात. एकदा टी. व्ही. वर झळकलो की पुढचा मार्ग सोपा होऊन जातो आणि त्याहून पुढे जर ती स्पर्धा जिंक्लो तर लॉटरीच लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रिऍलिटी शो जिंकण्यासाठी काय करावे लागते? तसा तर काही १००% यशस्वी होणारा फॉर्म्युला यासाठी नाहीये पण जर तुम्ही किंवा तुमचे मित्र, नातेवाईक या स्पर्धेत भाग घेत असतील तर काही गोष्टींकडे जरूर लक्ष द्या. तुम्हाला रिऍलिटी शो जिकायचा असेल तर खालील काही गोष्टी तुमच्यात असणे गरजेचे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे स्पर्धेत उतरण्याइतके तरी टॅलेण्ट असायला हवे. अगदीच ओ की ठो माहीत नसणार्‍याला स्पर्धकास यशस्वी होता येत नाही.( आपण स्पर्धेत उतरण्यास लायक आहोत की नाही हे निदान आरशात पाहून तरी जा !)&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;तुमच्याकडे चांगली निरीक्षणशक्ती आणि आकलन शक्ती असायला हवी. काय केल्याने आपण परीक्षकांवर प्रभाव पाडू शकतो याचा विचार तुम्हाला करता यायला हवा.(इतरांनी तुम्हाला काही आइडिया सुचवन्यापेक्षा तुम्हाला त्या सुचल्या तर अधिक चांगले)&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;परीक्षकांशी आणि इतर स्पर्धकांशी नम्र रहा. आपल्याला जास्त येत आहे असे चुकुनही भासवण्याचा प्रयत्न करू नका. उलट त्यांच्यामुळे आपण नवीन-नवीन गोष्टी कशा शिकत आहोत हे नेहमी सांगत रहा.( बहुतेक स्पर्धेत अंडरडॉग समजले जाणारे स्पर्धकच नंतर जिंकतात हा अनुभव आहे)&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;इतर स्पर्धकांचे कौतुक करा आणि त्यांना मदत ही करा. तुमचा अधिक कठीण स्पर्धक कोणता या प्रश्नावर मात्र , ' माझी स्पर्धा माझ्याशीच आहे' असे उत्तर दिले तर चांगले. या सगळ्यांतून तुमची प्रेक्षकांमध्ये चांगली प्रतिमा तयार होईल.(तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही तर शो कसा जिंकणार ?)&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;तुमच्यात इतर काही कलागुण असतील तर ते ही सादर करण्यास हरकत नाही म्हणजे तुमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची लोकांना ओळख होईल. ( किंवा तशा दुसर्‍या शो मध्ये तुम्हाला भाग घेण्याची संधी ही मिळते)&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;तुम्हाला प्रामाणिकपणे जिंकावस वाटत असेल तर चुकुनही स्पर्धेदरम्यान कुणाशी वाद घालू नका. या सगळ्याने चॅनेलचा टीआरपी वाढेल पण तुमचे नाव ही खराब होईल. या रीतीने मिळणारी प्रसिद्धी तुम्हाला हवे ते यश नक्कीच देणार नाही.( लोकांच्या चर्चेचा विषय व्हाल पण चांगल्या अर्थाने नव्हे! )&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;प्रेक्षकांचे आभार मानायला विसरू नका. आपल्याला मिळणारे यश प्रेक्षकांकडून मिळणार्‍या पाठिंब्याशिवाय शक्य होणार नाही हे मान्य करा.( म्हणजे तुम्हाला भरपूर मत मिळतील)&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;जिंकलात तरी पुन्हा प्रेक्षकांचे आभार माना. यातून तुम्ही कृतज्ञ असल्याची जाणीव तुम्हाला मते देणार्‍यांना होईल.( म्हणजे शो नंतर तुम्हाला ते विसरून जाण्याची शक्यता कमी होते)&lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;एवढे सगळे करून ही नाही जिंकलात आणि स्पर्धेबाहेर पडलात तर त्या वेळी परीक्षक हमखास बोलणारे वाक्य नेहमी लक्षात ठेवा ,'' ही स्पर्धा म्हणजे सर्व काही नाही.( इतर स्पर्धा ही आहेत) बाहेरच्या जगात अशा अनेक स्पर्धांना तोंड द्यावे लागेल आणि मला खात्री आहे तू या क्षेत्रात मोठे नाव कमावशील.'' &lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;br /&gt;गमतीचा भाग सोडला तर स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेनंतर आपल्याला मिळालेली ओळख, आपल्यात झालेले बदल आणि सुधारणा हे देखील आपले यशच आहे तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.एक स्पर्धा हरलो म्हणजे आयुष्यात हारल्यासारखे मानू नका. माणूस जोपर्यंत स्वत:हून हार मानत नाही तोपर्यंत तो हरत नाही आणि जिंकणे महत्त्वाचे नसून प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे तेच तुम्हाला यश मिळवून देईल हे ही विसरू नका.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-131814092905376420?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/131814092905376420/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/01/blog-post_14.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/131814092905376420'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/131814092905376420'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/01/blog-post_14.html' title='रिऍलिटी शो जिंकायचाय ?'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TTAuewZVCCI/AAAAAAAAAYE/uOVsIF7geAg/s72-c/2293239853_ddd6bc4ef4.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-7583307862856490893</id><published>2011-01-05T20:53:00.000+05:30</published><updated>2012-01-04T21:05:07.272+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सहज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='संकल्प'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नववर्ष'/><title type='text'>संकल्पाची ऐशीतैशी</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;दरवर्षी संकल्प होतात, दरवर्षी मोडले जातात. मोठ्या उत्साहात आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपले संकल्प सांगून मोकळे होतो आणि संकल्प पूर्ण करण्याची 'जबाबदारी' ही सोडून मोकळे होतो. यातील बहुतेकांचे संकल्प तर पहिल्या दिवशीच मोडले जातात. पण उपवास मोडला तरी चालेल पण संकल्प पूर्ण करायचाच असे हट्टाला पेटणारे ही काही आहेत. मग तऱ्हेतऱ्हेचे संकल्प सोडले जातात त्यातील पूर्ण किती होतात हे महत्वाचे नसले तरी संकल्प करतात हे खरे. काही दिवसांनी हेच लोक नसत्या फंदात पडलो म्हणून वैतागतात आणि जे शहाणे लोक असतात ते या लोकांची फजिती पाहत बसतात.&lt;br /&gt;संकल्प करणार्‍यांपैकी फार कमी जण ते पूर्ण करतात नाहीतर इतरांना त्यांनी संकल्प केले होते याची आठवण करून द्यावी लागते. आणि मग,  &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TSR-9cvwEzI/AAAAAAAAAX4/tPUaOznh2jA/s1600/new%2Byears%2Bresolutions-saidaonline.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="234" src="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TSR-9cvwEzI/AAAAAAAAAX4/tPUaOznh2jA/s320/new%2Byears%2Bresolutions-saidaonline.jpg" width="300" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;''अरे हो रे, &lt;br /&gt;केला 'होता',&lt;br /&gt;वेळ नाही मिळत रे, &lt;br /&gt;तर तर लक्षात आहे माझ्या..., &lt;br /&gt;बरी आठवण केलीस '' असली उत्तरे मिळतात. काही जण फक्त लोकांना सांगण्यासाठीच संकल्प करतात आणि ते पूर्ण होणार नाही याची खात्री बाळगूनच.संकल्प कोणता करावा आणि कोणता करू नये यावर काही एक बंधन नाही कारण ती प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. ज्याला त्याला आपआपले संकल्प करायचे स्वातंत्र्य आहे. तरी ही आजु-बाजूला पहिले तर तेच-तेच संकल्प जिथे-तिथे पाहायला मिळतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळ्यात जास्त केला जाणारा संकल्प म्हणजे खोटे न बोलण्याचा संकल्प. नेहमी खरे बोलावे असे लहानपणापासून शिकवले जात असूनही आपल्याला काही ना काही कारणास्तव खोटे बोलावे लागते आणि मग कुठेतरी मनास लागून राहते. मग नववर्षाचा मुहूर्त शोधून आपण ठरवतो की यापुढे खोटे बोलायचे नाही. आतापासून आपण राजा हरिश्‍चंद्र झालो. बरे पण हा संकल्प गुपचुप आणि गाजावाजा न करता केला तर बरे. नाहीतर आपण याआधी बोलायचो ते सारे खोटे असा समज होऊन पकडले जायचो. खरे बोलायचा महत्वाचा फायदा म्हणजे कधी आणि काय खोटे बोललो हे लक्षात ठेवावे लागत नाही. आणि मग खरे बोलायला सुरूवात केल्यावर अधून-मधून खोटे बोलणेच बरे होते हे कळू लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या बाबतीत असे काही होत नाही कारण मी (निदान) असले (तरी) संकल्प करत नाही. मी फार सफाईदार पणे खोटे बोलतो आणि माझी समाजातील प्रतिमा [(?)(:P)] फार चांगली असल्याने सगळे सहज विश्वास ठेवतात. अर्थात कसल्याही स्वार्थी हेतूने खोटे बोलत नसलो तरी गरज पडेल तिथे मी सराईतपणे थापा ठोकतो.(परीक्षेत खासकरून) आणि म्हणून खोटे बोलणे ही कला अंगी बाळगणे यात काही एक चुकीचे नाही(असे माझे मत आहे).&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TSR_0OGH0LI/AAAAAAAAAYA/m9ytZcmkZrE/s1600/resolutions.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TSR_0OGH0LI/AAAAAAAAAYA/m9ytZcmkZrE/s1600/resolutions.jpg" /&gt;&lt;/a&gt;अजुन एक हिट संकल्प असतो तो म्हणजे वजन कमी करणे. ह्याला काहींनी डाएट असे सोज्वळ नाव दिले आहे.नाव काहीही असो पण शेवटी जुने कपडे अंगभर मावत नाहीत आणि आपोआपच आरसा बारीक झाल्याचे वाटू लागले की मग आता वजन कमी झालेच पाहिजे या निष्कर्षवर येऊन पोहोचतो. एकीकडे खाण्यावर नियंत्रण ठेवणे काही होत नाही आणि त्यामुळे वजन ही लवकर कमी होत नाही. जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा तर फारच कंटाळा असतो. मग एके दिवशी मरायचेच आहे तर उपाशी राहून मरण्यापेक्षा थोडे जाडजूड होऊन मेले तर काय वाईट असा साक्षात्कार ही काही जणांना होतो.यावर अजुन 'अगदीच काही जाड नाही रे मी' हे चारचौघात बोलणारे मनात मात्र 'वजन कमी करणे काही आपल्या हाती नाही' हे ठरवून मोकळे झालेले असतात. अर्थात 'वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो' असे कुणीतरी म्हटलेले आहेच. इथेही माझ्या बाबतीत असा प्रश्न येत नाही कारण मला वजन कमी करण्यापेक्षा वजन वाढवण्याची जास्त इच्छा आहे. निदान समाजातील वजन वाढले तरी मूठभर मांस अंगी चढून वजन वाढेल अशा भ्रामक समजुती करून देखील वजन आहे तसेच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवीन वर्षानंतर परीक्षा फारच जवळ असल्याने कॉलेज मधले कट्टेबाज आता अभ्यासाकडे लक्ष देण्याचे संकल्प करतात. दिवाळी, कॉलेज फेस्टिवल, पिकनिक, थर्टी फर्स्टची पार्टी...बास्स झाले. आता मोर्चा लायब्ररीकडे!लेक्चर्स अटेंड केले पाहिजेत, आपल्या नोट्स आपणच काढल्या पाहिजेत असले संकल्प नाही केले तर निदान स्कॉलर मित्रांकडून चार महत्वाचे टॉपिक्स तरी जाणून घ्यावेत इ.इ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या ब्लॉगर मंडळींनी मात्र नियमीत ब्लॉग लिहीण्याचा संकल्प केला आहे आणि त्यात काही एक विशेष नाही. त्यातील काहींनी या वर्षी ट्रेकिंग करायचेही ठरवले आहे. काहींनी खादाडी वर नियंत्रण ठेवायचे पण तीच खादाडी न चुकता ब्लॉगवर पोस्ट करायची असे इतर खादाड ब्लॉगर्सना पाहून ठरवले आहे.&lt;br /&gt;आपल्या सारखे नेहमी कामात बिझी असणारे लोक वेळात वेळ काढून आपल्या छंदांना जोपासण्याचा संकल्प करतात. आपले कितीतरी छंद आपल्या नकळत आपण विसरून जातो किंवा लक्षात राहीले तरी ते पूर्ण करण्यासाठी वेळ काढण्यापेक्षा ते या ना त्या कारणाने टाळत राहतो. म्हणून आता आपल्यातील कलाकारास पुन्हा एक संधी देण्यासाठी थोडा प्रयत्न करू. नुसतेच करियर आणि पैशामागे धावायाचे का? स्वत:साठी ही वेळ द्यायला हवा ना!&lt;br /&gt;&lt;br /&gt;माणूस आपल्या चुकांमधून बरेच काही शिकतो. कोणत्या चुका केल्या पाहिजेत, कोणत्या चुका महागात पडतील याचा विचार करून चुका टाळण्याचा संकल्पही आपण करतो. आपल्या आयुष्यातील आधी झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत.(नवीन चुका कराव्यात) वाईट धंदे सोडून चांगल्या मार्गाला लागण्याचे जसे संकल्प होतात तसे पुन्हा प्रेमात न पडण्याचेही संकल्प होतात. कॉलेजलाइफ मध्ये रोमीयोगिरी करणारे कॉलेजच्या शेवटच्या वर्षी( शेवटच्या तीन महिन्यात)- आता सगळी लफडी सोडून अभ्यास करायचा बाबा!  तर एखादा स्कॉलर 'यावर्षी वॅलेन्टाईन डेला तरी तिला प्रपोज़ करायचेच!' असे ही संकल्प करतात. कुणाचे काय तर कुणाचे काय ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळ्यात गंभीर पण तितकाच गमतीशीर संकल्प म्हणजे दारू सोडणे. हा बहुतेकदा थर्टी फर्स्टच्या नाईटला टाइट होण्यापूर्वी केला जातो. या वर्षीची ही शेवटची, उद्यापासून बंद म्हणजे बंद! जसे काही आता डायरेक्ट पुढच्या थर्टी फर्स्टच्या पार्टीलाच प्यायची आहे.  दारू सोडण्याचा संकल्प हा महाकठिण! ( हे अनुभवाचे बोल नाही बरे!!) पण माणूस दारूच काय कुठल्याही गोष्टीच्या आहारी गेला की त्याला व्यसन जडते आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.( अरे देवा!!)&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळयात शेवटी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कोणताही संकल्प केलेला नाही. माझे संकल्प कधीही, केव्हाही सुरू होतात आणि केव्हाही बंद होतात. सगळा मनमौजी कारभार. खास ठरवून करण्यात काही करण्यात गंमत नाही. &lt;b&gt;'जे कराल ते मनापासून करा'&lt;/b&gt; असे (हल्लीच) कोण्या थोरपुरुषाने म्हटलेले आहेच.म्हणून आतापुरते एवढेच. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-7583307862856490893?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/7583307862856490893/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/01/blog-post.html#comment-form' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7583307862856490893'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7583307862856490893'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='संकल्पाची ऐशीतैशी'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TSR-9cvwEzI/AAAAAAAAAX4/tPUaOznh2jA/s72-c/new%2Byears%2Bresolutions-saidaonline.jpg' height='72' width='72'/><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-904927425358234061</id><published>2010-11-22T20:21:00.001+05:30</published><updated>2011-02-10T14:39:36.177+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सहज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आनंदी-आनंद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ब्लॉग'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वाढदिवस'/><title type='text'>पहिला वाढदिवस</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TN-IMXiBSuI/AAAAAAAAAXw/N4afUGiL7_Y/s1600/1stimages.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TN-IMXiBSuI/AAAAAAAAAXw/N4afUGiL7_Y/s1600/1stimages.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;मनात येईल ते लिहीत जाणे हा तसा माझ्यासाठी काही नवीन उद्योग नाही. पण आपले लेखन कुठेतरी छापून येईल किंवा ते इतर अनोळखी वाचकांकडून वाचले जाईल आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छाही मिळतील असे काही वाटले नव्हते.पण ते झाले ते या ब्लॉगविश्वामुळे आणि 'माझ्या मनातले काही' लिहिता लिहिता एक वर्ष पूर्ण झाले.&lt;br /&gt;शाळेत असताना निबंध लेखन हा माझा आवडता विषय असायचा. पण शाळा सुटली तसा हा प्रकार दिसेनासा झाला. कॉलेज मध्ये आल्यावरही आता मराठीतून लिहीणे होणार नाही आणि परीक्षाही इंग्रजीतून द्यायची म्हटल्यावर मराठी फारच दुरावली. मला प्रिय असलेले बालभारतीचे पुस्तक आणि त्यातील गद्य-पद्य खंड सारे आठवणी म्हणून उरले. मराठीतून लिहिण्याची आवड असूनही कॉलेजमध्ये ती संधी कधीच मिळाली नाही ती मिळाली पार कॉलेज संपल्यावर आणि मग या ब्लॉगरविश्वात मी चोरपावलांनी हळूच शिरलो.&lt;br /&gt;१८ नोव्हेंबर २००९ रोजी पहिली पोस्ट टाकली तेव्हा पुढे किती लिहिणार, काय लिहिणार याबद्दल काहीच कल्पना नव्हती.&lt;br /&gt;काहीतरी सुचले म्हणून लिहिले आणि ब्लॉग हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठीच पोस्ट केले. सुरुवातीला ब्लॉग हा प्रकार फक्त इंग्रजीत चालतो असे वाटायचे आणि मग अचानक मराठी ब्लॉग विश्व सापडले. तिथे इतके सारे ब्लॉग्स पाहून मला कळेना की कोणते आणि किती ब्लॉग वाचू. पण निदान नियमीत लेखन करणार्‍यांचे ब्लॉग तरी वाचू असे ठरवले.&lt;br /&gt;मग हळूहळू बरेच ब्लॉगर आणि त्यांचे ब्लॉग्स ओळखीचे झाले. ब्लॉग म्हणजे काही तरी अवघड गोष्ट आहे अशी माझी पूर्वी समजूत होती पण इथे खादाडी पासून ते ट्रेकिंग पर्यंत सारे काही खपते हे लवकरच कळून चुकले. आणि या व्यतिरिक्त ही बर्‍याच गोष्टी आपण इथे शेअर करू शकतो- जणू आपली पर्सनल डायरीच.&lt;br /&gt;सुरुवातीच्या काही दिवसात ब्लॉग कसा लिहितात, फोटो किंवा स्लाइडशो कसे टाकतात हे काहीच माहीत नव्हते. हळूहळू हे सारे सोपे वाटू लागले. मग ते जुने टेंप्लेट टाकून माझ्या ब्लॉगने ही कात टाकली अन् नवनव्या रंगात येऊ लागला. बरेच ब्लॉगरमित्र ही येऊ-जाऊ लागले. काहींनी मला फॉलो केले, काहींना मी फॉलो केले. पहिला फॉलोवर, पहिली कमेंट यांचे कौतुकतर वाटलेच पण आज ही नवीन कमेंट आल्या की तितकाच आनंद होतो.&lt;br /&gt;वर्षभरापूर्वी लिहायला घेतले ते काहीतरी वेडेवाकडे सुचले आणि म्हणून लिहून टाकले. त्यानंतर नियमितपणे लिहिणार की नाही याची काही खात्री नव्हती. तसे पहिले तर वर्षभरात फार कमी पोस्ट करू शकलो पण वारंवार लिहिण्यास वेळ मिळत नव्हता आणि उगाच काहीतरी लिहावे त्यापेक्षा न लिहिलेले बरे. जे मनापासून लिहावेसे वाटले तेच लिहीत गेलो. माझ्यामागून आलेले कित्येक ब्लॉगर माझ्या पुढे निघून गेले पण मला काही घाई नाही. इतरांशी स्पर्धा करावी म्हणून लिहिण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे लिहिण्यासाठी मला नवे विषय कधीच शोधावे लागले नाही. उलट अजुन बरेच विषय माझ्या लिखाणवहीत रजिस्टर झाले आहेत.ते लिहीण्याचा योग कधी येईल तेव्हा येवो. पण अजुन बरेच लिहायचे आहे एवढे नक्की. तोपर्यंत तुम्ही या केकचा आनंद घ्या...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-904927425358234061?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/904927425358234061/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/11/blog-post_22.html#comment-form' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/904927425358234061'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/904927425358234061'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/11/blog-post_22.html' title='पहिला वाढदिवस'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TN-IMXiBSuI/AAAAAAAAAXw/N4afUGiL7_Y/s72-c/1stimages.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-7278400097504445716</id><published>2010-11-06T15:06:00.001+05:30</published><updated>2011-10-26T12:21:04.604+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बालपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फटाके'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सुट्टी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिवाळी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रदूषण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आठवणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फराळ'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सण'/><title type='text'>दिवाळी-कालची आणि आजची...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;सर्वप्रथम सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TNUgFcLLQiI/AAAAAAAAAXg/dol5wWL7RY8/s1600/d1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="271" src="http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TNUgFcLLQiI/AAAAAAAAAXg/dol5wWL7RY8/s320/d1.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;दिवाळी दरवर्षीच येते आणि दरवर्षी काही ना काही आठवणी ठेवून जाते. पण तरीही दिवाळी म्हटली की सगळ्यांना लहानपणीच्याच आठवणी फार येतात. जणू काही तरुणपणी दिवाळी साजरी करतच नाहीत आणि लहानपणीची दिवाळी म्हणजे पहिले आठवतात ते खूप सारे फटाके. हल्ली आम्ही मोठे झालो आहोत आणि बरेचसे सुजाण नागरिक झालो आहोत असा आमचा समज झाल्याने आम्ही फटाके फोडत नाही कारण या सार्‍यांमुळे किती ध्वनी-प्रदूषण होते, वायू-प्रदूषण होते हे आम्हाला उशीराने का होईना कळून चुकले आहे. म्हणून मग आम्ही 'दुरून फटाके साजरे' असा संकल्प वगैरे करतो. पण लहान असताना जे फटाके फोडले ते अजुनही आठवतात.&lt;br /&gt;तेव्हा सकाळीच लवकर आंघोळ करून पिशवी भरून फटाके घ्यायचो आणि सर्वत्र हिंडत ते फोडायचो. त्यात भुईचक्र, अनार, फुलबाजे, नाग-गोळ्या,लक्ष्मीबार, रश्शी-बॉम्ब आणि काय काय असायचे. सकाळी भरलेली पिशवी दुपारपर्यंत संपवायचीच असा अलिखित नियम, म्हणून मग सारे फटाके संपवूनच विजयीवीर घरी परतत. मला तरी त्या फटाक्यांच्या माळा लावण्यापेक्षा त्या लवंगीबार तोडून लावण्यातच फार मज्जा वाटायची.त्याला मोडून त्याचे चक्र किंवा पाऊस लावण्याकडे ओढा जास्त. आणि इतके सारे फटाके मिळून ही न फुटलेले फटाके शोधायचे आणि तेही फोडायाचे. त्याची दारू गोळा करून पेटवून देणे हा फटाके संपल्यावर या कार्यक्रमाची सांगता करणारा उपक्रम.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TNUgzdem6cI/AAAAAAAAAXk/Z7y5NNOw6R8/s1600/d3.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="273" src="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TNUgzdem6cI/AAAAAAAAAXk/Z7y5NNOw6R8/s320/d3.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;तसे सकाळी खूप सारे फटाके फोडले तरी रात्री त्याची पुनरावृत्ती व्हायचीच. तेव्हा सर्व घरांना लागलेले दिवे, आकाश-कंदिल, रांगोळ्या आणि आकाशात रॉकेट्सची होणारी रोषणाई हे पाहताना रात्र पुरत नसे. पण जसजसे मोठे झालो तसे फटाक्यांपासून दुरावलोच.हल्ली दिवाळी आली की मित्रांसोबत शॉपिंग करणे आणि पार्ट्या करणे हेच उद्योग उरले आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नटून-थटून बाहेर पडणे होत नाही. हल्ली आम्ही मोबाईल आणि मेलवर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवतो. तसे पारंपरिक वेशभूषा करून बाहेर जाणे झालेच तर ते कॉलेजमध्ये किंवा ऑफीसमध्ये असणार्‍या दिवाळी पार्टीलाच होते. मग खूप सारे फोटो काढून ते ओर्कुट, फेसबुक वर टाकले जातात. पण लहानपनीचे दिवाळीचे फोटो पाहताना आजचे फोटो त्यापुढे फिकेच पडतात.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TNUf3VENxqI/AAAAAAAAAXc/fzZIKyKIlrs/s1600/d2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="221" src="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TNUf3VENxqI/AAAAAAAAAXc/fzZIKyKIlrs/s320/d2.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;दिवाळीबद्दल अजुन एक आवडणारी गोष्ट म्हणजे- दिवाळीचा फराळ. या दिवसात घरोघरी दिवाळीचा फराळ चापण्यात जी मजा आहे ती एरवी कुठे आहे? म्हणून मग आलेला फराळ फस्त करणे हा आवडता उद्योग. हल्ली रेडीमेड फराळ ही मिळतो आहे पण घरी सर्वांनी मिळून केलेल्या गरमागरम फराळाची लज्जत काय सांगावी ? पहिला लाडू देवापुढे ठेवला की पाठोपाठ तीन-चार लाडू पोटात जातातच. लहानपणी घरातले सगळेजण फराळ बनवण्याची मोहिम हाती घ्यायचो तेव्हा शाळेला भरपूर सुट्टी पण असायची, आता दिवाळीला सुट्ट्या मिळतात याचेच फार कौतुक वाटते.&lt;br /&gt;आत्ता ही तीन दिवस सुट्टी मिळाली म्हणून लिहीण्याचा योग आला (आणला). मोठे झाल्यापासून दिवाळीची सुट्टी तर फारच मिस करतोय. दिवाळीचे पाच दिवस संपले तरी काही दिवस फक्त सुट्टी म्हणून अजुन मजा करायला मिळायची ती मिळणे तर दुरापास्तच झाले आहे. दिवाळीच्या सुट्टीत अवांतर वाचन ( जे शाळेत नेहमी करायला सांगितले जायचे) करणे फार आवडायचे. शाळेत असताना किमान दिवाळी अंक तरी वाचले जायचे. आता अभ्यासाची पुस्तकेच धूळ खात आहेत. सध्या झालेच तर वीकेंडला एखादी पिकनिक प्लॅन होते. दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न. पण आयुष्य खूप धकाधकीचे होत चालले आहे तेथे हे असेच चालायचे.&lt;br /&gt;दिवाळी खूप झपाट्याने बदलत चालली आहे असेच वाटू लागले आहे. शाळेत शेवटचा पेपर देण्याची वाट पाहणारे आपण आता सॅलरी आणि बोनसच्या चेकची वाट पाहु लागलोय हे जाणवले तेव्हाच ते लहानपनीचे गाव फार दूर राहिल्याचे लक्षात आले. आता ही जमेल तितकी, जमेल त्या परीने दिवाळी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो आहेच पण राहून राहून वाटते-काहीतरी मिस होतेय यार...&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-7278400097504445716?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/7278400097504445716/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/11/blog-post.html#comment-form' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7278400097504445716'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7278400097504445716'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='दिवाळी-कालची आणि आजची...'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TNUgFcLLQiI/AAAAAAAAAXg/dol5wWL7RY8/s72-c/d1.jpg' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-1325151111107477986</id><published>2010-09-22T19:59:00.002+05:30</published><updated>2011-08-31T20:16:07.972+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गणपती'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रश्न'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सामाजिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सण'/><title type='text'>गणेश विसर्जन सोहळा</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;गणपती बाप्पा आले आले म्हणता म्हणता 'गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला' म्हणायची वेळ ही आली.आज अनंत चतुर्दशीला सार्‍या चौपाट्यांवर प्रचंड जनसमुदाय आपल्या लाडक्या गणेशाचे विसर्जन करणार. मला लहानपणापासूनच गणेश विसर्जन पाहायला फार आवडायचे. प्रत्यक्ष चौपाटीवर नाही गेलो तरी टी. व्ही. वर मात्र आवर्जून पाहायचो. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या मंडळांचे गणपती थाटात चौपाटीवर यायचे आणि शेवटी सागरात विसर्जित केले जायचे. ह्या गणेशोत्सवाचे आपल्यालाच नाही तर परदेशी पर्यटकान्स ही फार कौतुक वाटते. हातात कॅमेरे घेऊन हा अजब सोहळा टिपु पाहतात ते लोक.पण सगळेच फोटो तितके छान नसतात. काही फोटो पाहून त्यांना जसे वाईट वाटले असेल तसे आपल्यालाही वाटेल पण त्याहून जास्त लाजिरवानेही वाटेल.&lt;br /&gt;गेल्या वर्षी मला एक मेल आला होता त्यातील हे फोटो पाहून मला तरी नक्कीच आनंद झाला नाही. लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज मोठ्या प्रमाणावर स्पर्धेच्या विळख्यात अडकला आहे. गल्लोगल्ली, जागोजागी लोकांनी मंडळे, विभाग स्थापन करून आपले गणपती तयार केलेत आणि मोठ्या-मोठ्या मूर्त्या आणि देखावे करून आपल्या मंडळाचे नाव मोठे करू पाहत आहेत. त्याच्या जोडीला चल-चित्रे आणि इतर आकर्षक सजावट करून लोकांचे डोळे दिपवू पाहत आहेत. आजही गणेशोत्सवात लोकांच्या भेटी-गाठी होतात पण प्रचंड आकाराच्या मूर्त्या तयार करून त्यांचे योग्य प्रकारे विसर्जन करण्याची जबाबदारी कोणीही घेत नाहीयेत. ती जबाबदारी सर्वत: समुद्रावर सोपवून सगळे मोकळे झालेत.&lt;br /&gt;या अजस्त्र आकाराच्या मूर्त्या विसर्जन करतेवेळी कित्येकदा बळजबरी ढकलल्या जातात आणि प्रसंगी पायाने ही ढकलण्यात येतात. म्हणजे ज्या देवाची १० दिवस पूजा करायची त्यालाच काही केल्या समुद्रात ढकलून यायचे. त्यातील कित्येक मूर्त्या मग पुढील काही दिवसात किनार्‍यावर परततात त्याही छिन्न-विछिन्न अवस्थेत. मग कशाला करायचे असे विसर्जन? सर्व काही सामावून घेतो म्हणून सागरात आपण हे सारे टाकणार असु तर ते परत आले तर हळहळ का? त्या परतने साहजिकच होते कारण आपण मर्यादा न जाणता सर्व काही करत राहतो. आणि विसर्जन झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली का? त्यानंतर चौपाटीची होणारी अवस्था पाहायला आपण कशाला जायचे? आणि आपण विसर्जित केलेला गणपती लाटाबरोबर परत आला असेल का अशी शंका ही आपल्या मनात येत नाही. म्हणूनच मग असे फोटो पाहून वाईट वाटते.&lt;br /&gt;शक्यतो गणेश मूर्त्या लहान आकाराच्या आणि सहजपणे विसर्जित होतील अशा आणाव्या आणि त्या तलाव किंवा कृत्रिम तळ्यात विसर्जित केल्या जाव्यात. मूर्तीच्या आकारानुसार आपली भक्ती ठरत नसते ही जरूर लक्षात घ्यावे. आपल्या बाप्पाची प्रतिष्ठा आपल्याच हातात आहे. तिची चेष्टा होऊ देऊ नका एवढेच सांगतो.&lt;br /&gt;&lt;embed flashvars="host=picasaweb.google.com&amp;amp;hl=en_US&amp;amp;feat=flashalbum&amp;amp;RGB=0x000000&amp;amp;feed=http%3A%2F%2Fpicasaweb.google.com%2Fdata%2Ffeed%2Fapi%2Fuser%2Fparijatjuvatkar%2Falbumid%2F5518637175930892529%3Falt%3Drss%26kind%3Dphoto%26hl%3Den_US" height="302" pluginspage="http://www.macromedia.com/go/getflashplayer" src="http://picasaweb.google.com/s/c/bin/slideshow.swf" type="application/x-shockwave-flash" width="488"&gt;&lt;/embed&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-1325151111107477986?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/1325151111107477986/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/09/blog-post_22.html#comment-form' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/1325151111107477986'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/1325151111107477986'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/09/blog-post_22.html' title='गणेश विसर्जन सोहळा'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-1030200249303467873</id><published>2010-09-05T15:24:00.001+05:30</published><updated>2011-02-10T14:42:37.963+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गाणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुवाद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>खो-बाई-खो</title><content type='html'>मिळाला एकदाचा खो! गेल्या आठवड्यात &lt;a href="http://suhasonline.wordpress.com/"&gt;सुहास&lt;/a&gt;ने खो दिला आणि मग 'आलिया भोगासी असावे सादर' प्रमाणे ही पोस्ट करायची वेळ आली. सर्वप्रथम ब्लॉग विश्वात हे खो-खो चे प्रकार चालू झाले तेव्हा वाटले की आपण काही या जाळ्यात अडकणार नाही पण खो-खो ची साथ वेगाने पसरत चालली आहे आणि जो तो आपला खोकत बसलाय.&lt;br /&gt;अनुवादासाठी मी कोणते गाणे निवडावे हा एक मोठा प्रश्न पडला होता...बरीच उलथापालथ केल्यानंतर एक गाणे निवडले जे माझे खूप आवडते आहे. 'प्यार का मौसम' या चित्रपटातील 'तुम बिन जाऊ कहाँ'. हे गाणे किशोरदा आणि रफीसाहेब दोघांच्या आवाजात रेकॉर्ड झाले आहे आणि वेगवेगळ्या कडव्यांसह रेकॉर्ड झाले आहे.&lt;br /&gt;अनुवाद करायचा असला तरी अगदी शब्द:शह अनुवाद न करता तो अधिक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तेव्हा या प्रयत्नास नक्की प्रतिसाद द्या.&lt;br /&gt;एक विनंती अशी की कृपया गाण्याच्या मूळ चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करू नका त्यापेक्षा सुचेल त्या चालीवर गा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूळ गीत-&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोहम्मद रफ़ी-&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम बिन जाऊँ कहाँ, के दुनिया में आके&lt;br /&gt;कुछ ना फिर चाहा कभी तुमको चाहके, तुम बिन ..&lt;br /&gt;&lt;br /&gt;देखो मुझे सर से कदम तक, सिर्फ़ प्यार हूँ मैं&lt;br /&gt;गले से लगालो के तुम्हारा बेक़रार हूँ मैं&lt;br /&gt;तुम क्या जानो के भटकता फिरा&lt;br /&gt;मैं किस गली, तुमको चाह के ..&lt;br /&gt;&lt;br /&gt;अब है सनम हर मौसम, प्यार के काबिल&lt;br /&gt;पड़ी जहाँ छाव हमारी, सज गयी महफ़िल&lt;br /&gt;महफ़िल क्या तनहाई में भी&lt;br /&gt;लगता है जी, तुमको चाह के ..&lt;br /&gt;&lt;br /&gt;किशोर कुमार-&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम बिन जाऊँ कहाँ, के दुनिया में आके&lt;br /&gt;कुछ ना फिर चाहा कभी, तुमको चाहके, तुम बिन ..&lt;br /&gt;&lt;br /&gt;रह भी सकोगे तुम कैसे, हो के मुझसे जुदा&lt;br /&gt;ढह जाएँगी दीवारें, सुन के मेरी सदा&lt;br /&gt;आना ही होगा तुम्हें मेरे लिए&lt;br /&gt;साथी मेरे, सुनी राह के ..&lt;br /&gt;&lt;br /&gt;कितनी अकेली सी पहले, थी यही दुनिया&lt;br /&gt;तुमने नज़र जो मिला ली, बस गई दुनिया&lt;br /&gt;दिल को मिली जो तुम्हारी लगन&lt;br /&gt;दिए जल गए, मेरी आह से ..&lt;br /&gt;&lt;br /&gt;देखो मेरे गम की कहानी, किसीसे मत कहना&lt;br /&gt;कहीं मेरी बात चले तो, सुनके चुप रहना&lt;br /&gt;मेरा क्या है कट जाएगी कहीं&lt;br /&gt;ये ज़िंदगी, तुमको चाह के...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;अनुवाद-&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझ्याविना जाऊ कुठे?&lt;br /&gt;की या जगात येऊन प्रेम न केले कुणावरी&lt;br /&gt;तुझ्याविना...&lt;br /&gt;&lt;br /&gt;बघ माझ्याकडे एकदा...फक्त प्रेम आहे मी&lt;br /&gt;मिठीत घे न एकदा...किती अधीर आहे मी&lt;br /&gt;कुठे-कुठे भटकत फिरलो प्रेमात तुझ्या&lt;br /&gt;तुझ्याविना...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता प्रत्येक ऋतू प्रेमाचे रंग भरतील&lt;br /&gt;तुझ्या सावलीत सजली प्रेमाची मैफिल&lt;br /&gt;आठवणी तुझ्या पुरतील मला जरी असलो&lt;br /&gt;तुझ्याविना...&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्याविना तू तरी राहशील कशी?&lt;br /&gt;तोडून सारी बंधने येशील माझ्यापाशी&lt;br /&gt;यावे लागेल तुला माझ्यासाठी &lt;br /&gt;मी ही तडपतो आहेच ना&lt;br /&gt;तुझ्याविना...&lt;br /&gt;&lt;br /&gt;किती एकटा होतो मी तुझ्याविना&lt;br /&gt;तुझ्या येण्याने बघ बहरली दुनिया&lt;br /&gt;आता तुझ्या प्रेमानेच दिशा गवसली&lt;br /&gt;नाहीतर अंधारच होता&lt;br /&gt;तुझ्याविना...&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे दु:ख माझ्याकडेच राहू दे&lt;br /&gt;माझ्या आठवांना अश्रूंतून वाहू दे&lt;br /&gt;माझे आयुष्य जाईल सहज&lt;br /&gt;तुझ्या आठवणीत&lt;br /&gt;तुझ्याविना...&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता खो द्यायची माझी पाळी. खो देण्याआधी काही भन्नाट गाणी अनुवादासाठी सुचवावी असे वाटले म्हणून यातील एखाद्या गाण्याचा अनुवाद वाचायची माझी फार इच्छा आहे.&lt;br /&gt;१. आहून आहून आहून...&lt;br /&gt;२. झूबी डूबी झूबी डूबी&lt;br /&gt;३. तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार...( सगळे आपले इमोसनल अत्याचार लिहित होते मग याच गाण्याचा का नाही करत अनुवाद?)&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर ब्लॉग विश्वात असणार्‍या माझ्या ओळखीच्या मित्रांपैकी बहुतेकांना आधीच खो मिळाला असल्याने माझ्याकडे काही पर्याय नव्हते म्हणून माझा खो जात आहे- दि वन अँड ओन्ली- &lt;a href="http://vikrantdeshmukh.blogspot.com/"&gt;विक्रांत देशमुख&lt;/a&gt; यास. बेस्ट लक विक्रांत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-1030200249303467873?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/1030200249303467873/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/09/blog-post.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/1030200249303467873'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/1030200249303467873'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='खो-बाई-खो'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-4828785015683618524</id><published>2010-08-28T18:59:00.001+05:30</published><updated>2010-08-28T19:16:32.501+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सहज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बालपण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कार्टून्स'/><title type='text'>कार्टून नेटवर्क-रिलोडेड</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkD9S7X-sI/AAAAAAAAATE/gA8YAMlOPyA/s1600/download.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkD9S7X-sI/AAAAAAAAATE/gA8YAMlOPyA/s320/download.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;माणूस किती ही मोठा झाला तरी ही त्याच्या लहानपनीच्या आठवणी निघाल्या की त्यात हमखास रमतोच. लहानपनीचे अल्लड, खेळकर दिवस, गमती-जमती आठवताना सारे काही विसरून जातो. त्याच लहानपणातील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या म्हणजे कार्टून फिल्म्स. आता आपण मोठे झालो, कार्टून बघायला वेळ मिळत नाही हे सगळे खरे असले तरी तेव्हा त्या आपल्या रोजच्या आयुष्यातील अगदी अविभाज्य घटक असायच्या आणि म्हणूनच खूप खर्‍या वाटायच्या. चला तर मग, आपल्या काही आवडत्या कार्टून्सच्या आठवणींना उजाळा देऊया. &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkEIx4gUoI/AAAAAAAAATM/qes4fsokDD8/s1600/Cartoon_Tom-and-Jerry_015.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="150" src="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkEIx4gUoI/AAAAAAAAATM/qes4fsokDD8/s200/Cartoon_Tom-and-Jerry_015.jpg" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;कार्टून्स विश्वाची सफर करायची म्हटले तर सर्वप्रथम आपल्या समोर येते ती म्हणजे मोस्ट फेव्हरेट- &lt;span style="color: blue;"&gt;'टॉम अँड जेरी'&lt;/span&gt;. गेली कित्येक वर्षे ही उंदीर-मांजराची जोडी आपल्याला खळखलून हसवत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच हिचे चाहते आहेत. उंदीर- मांजराच्या करामती आणि खोड्या इतक्या वेळा पाहूनही पुन्हा पाहताना कंटाळा येत नाही. 'टॉम अँड जेरी' या पात्रांना हल्लीच ७० वर्षे पूर्ण झाली तरी ती अजुनही हविहवीशी वाटते. यातील इतर पात्रे जसे किलर डॉग, ब्लॅक कॅट, ट्वीटी बर्ड शिवाय जेरीचा नातलग असलेला छोटु उंदीर सगळेच धमाल आहेत.' टॉम अँड जेरी' हा कार्टून विश्वातील एक स्वतंत्र अध्याय लिहिता येईल इतपत मोठा खंड आहे. लिहु तितके थोडेच. &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkErQOxvcI/AAAAAAAAATU/CITJMhq0Yzs/s1600/images90.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkErQOxvcI/AAAAAAAAATU/CITJMhq0Yzs/s320/images90.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;टॉम अँड जेरी नंतर आपली आवडती कार्टून कॅरेक्टर्स म्हणजे डिस्ने वर्ल्डची कार्टून्स. डिस्ने वर्ल्डने &lt;span style="color: blue;"&gt;मिकी-मिनी. डोनाल्ड, प्लूटो, गूफी&lt;/span&gt; ही सारी पात्रे आणली आणि धमाल उडवून दिली. मिकी-मिनीची रोमॅंटिक जोडी जशी छान होती तशाच बाकीच्या जोड्या ही छान होत्या. मिकी-डोनाल्ड, डोनाल्ड-प्लूटो, गूफी-प्लूटो सगळ्या एकाहून -एक. प्रत्येकाची स्टाइल,बोलण्याची लकब वेगवेगळी. डोनाल्डच्या चिप अँड डेल सोबत किंवा त्याच्या ३ भाच्यांसोबत असलेल्या कार्टून्स तसेच गूफीच्या नवीन गोष्टी शिकतानाच्या कार्टून्स मस्त होत्या. तो कधी ड्रायव्हिंग शिकायचा, कधी डान्स, कधी स्केटिंग तर कधी काय? आणि त्यामागे असणारे निवेदन अजुनच मजा वाढवायचे.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkE8QyuINI/AAAAAAAAATc/4q58RWk-yk0/s1600/images52.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkE8QyuINI/AAAAAAAAATc/4q58RWk-yk0/s320/images52.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;डिस्नेची अजुन एक सुंदर कार्टून म्हणजे &lt;span style="color: blue;"&gt;अल्लादीन&lt;/span&gt;. अल्लादीन-जस्मिनची जोडी, अल्लादीनचा जादुई दिवा, त्याचा जिनी, त्याचा महाल,उडणारी चटई-सगळेच सुंदर वाटायचे. &lt;span style="color: blue;"&gt;जिनी&lt;/span&gt; मला फार आवडायचा. माझ्या चित्रकलेच्या वहीत त्याची बरीच चित्रे काढली होती तेव्हा.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkFFskfkjI/AAAAAAAAATk/1oQmTGXEqlg/s1600/images+%2813%29.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkFFskfkjI/AAAAAAAAATk/1oQmTGXEqlg/s320/images+%2813%29.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: blue;"&gt;'डकटेल्स'&lt;/span&gt; ही माझी फार आवडते कार्टून फिल्म( लहानपणी कार्टून फ्लिम म्हणायचो) त्याचे शीर्षक गीत (दोन्ही-हिंदी व इंग्रजी) पण मस्त होते. त्यातला खडूस आणि कंजूस&lt;span style="color: blue;"&gt;' स्क्रूज मॅकडक'&lt;/span&gt;- त्याचा निळा कोट, जांभळी टोपी, त्याचा बंगला, त्याचा लकी कॉइन,डॉलर मार्कचा त्याचा तैखाना. ते सगळेच सही होते. आणि त्यात तो पोहायचा सुद्धा. स्क्रूजचे तीन भाचे सॉलिड उद्योगी-&lt;span style="color: blue;"&gt;ह्युई,ड्युई अँड ल्युई&lt;/span&gt;. डकवर्थ मधील बदमाश गुंड-&lt;span style="color: blue;"&gt;बीगल बॉयस&lt;/span&gt; त्याच्या ममा बीगल आणि जादुगार &lt;span style="color: blue;"&gt;मेजिका&lt;/span&gt; बरोबर कारस्थाने रचायचे. इतर कॅरेक्टर्स जसे &lt;span style="color: blue;"&gt;'लॉंचपॅड मॅकवॅक'&lt;/span&gt; जो नेहमी प्लेन क्रश करायचा, सायण्टिस्ट &lt;span style="color: blue;"&gt;जाएरो&lt;/span&gt;, &lt;span style="color: blue;"&gt;गिज्मो डक&lt;/span&gt;, स्क्रूजचा दुश्मन &lt;span style="color: blue;"&gt;फ्लिंटहार्ट ग्लॉमगोल्ड&lt;/span&gt; सगळेच रियल वाटावे असे.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkFPceYI3I/AAAAAAAAATs/kim5HmH-DaE/s1600/images36.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkFPceYI3I/AAAAAAAAATs/kim5HmH-DaE/s320/images36.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;त्यातल्या त्यात भारतीय वाटावी अशी गाजलेली कार्टून- म्हणजे जंगल बुक. &lt;span style="color: blue;"&gt;मोगली&lt;/span&gt; आणि त्यातील कॅरेक्टर्स &lt;span style="color: blue;"&gt;बगीरा,शेरखान, भालू,आकडू-पकडू, सरपंच&lt;/span&gt; सगळे हिंदीमध्ये बोलताना सहिच वाटायचे.( बगीरा की शेरखानसाठी नाना पाटेकरचा आवाज ही वापरला होता बहुतेक) इतर कार्टून्स सारखी ही विनोदी नसली तरी रंजक नक्कीच होती. ती बघता-बघता हरवून जायचो त्यात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkFZxatOOI/AAAAAAAAAT0/lbhAtQb6TWM/s1600/images+%2875%29.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkFZxatOOI/AAAAAAAAAT0/lbhAtQb6TWM/s320/images+%2875%29.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;पुन्हा कार्टून नेटवर्ककडे वळलो तर टॉम अँड जेरी शिवाय ही काही कार्टून्स तेव्हा फार आवडायच्या. सकाळी-सकाळी ७ वाजता मी बरोबर उठायचो-&lt;span style="color: blue;"&gt;' पोपाय द सेलर मॅन'&lt;/span&gt; पाहायला. त्याची शरीरयष्टी एवढी विचित्र असूनही 'स्पिनिच' खाल्ल्यावर तो पैलवान &lt;span style="color: blue;"&gt;ब्लूटो&lt;/span&gt;ची सॉलिड धुलाई करायचा.( ते स्पिनिच ही कसेही करून मिळायचेच त्याला शेवटी ).त्याची प्रेयसी '&lt;span style="color: blue;"&gt;ऑलिव ओईल'&lt;/span&gt; तर त्याहून कडकी, त्याचा मित्र नेहमी बर्गर खात राहायचा. पोपायचे भाचेही सगळे दंगेखोर. ते मात्र त्याचे खूप हाल करायचे.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkFtP5gFnI/AAAAAAAAAT8/lnc5qUIYn9o/s1600/download+%2810%29.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkFtP5gFnI/AAAAAAAAAT8/lnc5qUIYn9o/s320/download+%2810%29.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;पोपायनंतर लगेचच &lt;span style="color: blue;"&gt;'स्कूबी अँड स्क्रॅपी डू शो&lt;/span&gt;' असायचा. &lt;span style="color: blue;"&gt;स्कूबी&lt;/span&gt; आणि त्याचा मित्र &lt;span style="color: blue;"&gt;शॅगी &lt;/span&gt;घाबरत असूनही त्यांच्या &lt;span style="color: blue;"&gt;फ्रेड,वेल्मा आणि डॅफ्नी&lt;/span&gt; या मित्रांसोबत 'द मिस्ट्री मशीन' मधून रहस्य शोधत फिरायचे. स्कूबी बरोबरचा छोटा डॉगी &lt;span style="color: blue;"&gt;स्क्रॅपी&lt;/span&gt; डेरिंग करत पुढे जायचा आणि हे दोघे नेहमी खाण्याच्या मागे लागलेले.&lt;br /&gt;'&lt;span style="color: blue;"&gt;स्कूबीस ऑल स्टार'&lt;/span&gt; ही कार्टून ही काही वेळा असायची. त्यातील स्कूबी-डूबिस, योगी-याहूईस आणि रिली रोटेर्स हे टीन ग्रूप एकमेकांशी शर्यती करत आणि रिली ग्रूपचे नेहमी चीटिंग करत आणि हरत. त्यांच्या शर्यती पण गमतीशीर असत.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkGKP_jMXI/AAAAAAAAAUE/a5JYIOBe2cM/s1600/images44.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkGKP_jMXI/AAAAAAAAAUE/a5JYIOBe2cM/s320/images44.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;लूनी टून्स ने ही काही छान-छान कॅरेक्टर्स कार्टूनविश्वात आणली. &lt;span style="color: blue;"&gt;बग्स बनी,डॅफी डक, ट्वीटी बर्ड, पुसी कॅट,पोर्की पिग&lt;/span&gt; हे सगळे कसे विसरणार? बग्स बनी तर झकासच होता. जितका नाटक्या तितकाच खट्याळ. सगळ्यांना शेंड्या लावून पसार व्हायचा. शेवटी पोर्की पिग ड्रम फोडून बाहेर यायचा आणि म्हणायचा- द द डॅट्स ऑल फोक्स!' त्याहस्या बरोबर डॅफी डकच्या खोड्या, निरागस ट्वीटीचे ' आय थॉट आय सॉ अ पुसी कॅट' वेरी क्यूट! &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkGqJFIGJI/AAAAAAAAAUU/K_f25uI9ZIU/s1600/images82.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkGqJFIGJI/AAAAAAAAAUU/K_f25uI9ZIU/s320/images82.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;सुपरहिरोस हे तर कार्टूनविश्वानेच बच्चेकंपनीत हीट केले. यात &lt;span style="color: blue;"&gt;सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन&lt;/span&gt; सगळेच होते. मला त्यांच्या कार्टून्सपेक्षा चित्रपट जास्त आवडले. &lt;span style="color: blue;"&gt;'द मास्क'&lt;/span&gt; हा विचित्र असूनसुद्धा मस्त वाटायचा. त्याचा अवतार आणि करामती इतरांपेक्षा खूप वेगळ्या. इतरही काही हीरो जसे &lt;span style="color: blue;"&gt;बर्डमॅन, कॅप्टन प्लॅनेट&lt;/span&gt; हे त्यावेळेस फार आवडीने पाहायचो. &lt;span style="color: blue;"&gt;'फॅंटॅस्टिक फोर' &lt;/span&gt;ही एक खूप मस्त होती. तसेच '&lt;span style="color: blue;"&gt;टर्टल्स'&lt;/span&gt; ही चार बेडकांची एक्शनपट कार्टून. &lt;span style="color: blue;"&gt;स्वेट-कॅट&lt;/span&gt; मधील बडे मियां आणि छोटे मियां आणि त्यांची फायटर विमाने. भारीच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अजूनही बर्‍याच कार्टून्सची नावे आठवतात जसे- &lt;span style="color: blue;"&gt;फ्लिन्स्टन्स, जेटसन्स, योगी बेअर, टेलस्पिन,डार्कविंग डक,पिक्सिस अँड डिक्सिस&lt;/span&gt; आणि आजकाल पाहायला न मिळणार्‍या बर्‍याच काही.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkGUxNHHhI/AAAAAAAAAUM/Sr9nfB9JZiM/s1600/images9.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkGUxNHHhI/AAAAAAAAAUM/Sr9nfB9JZiM/s320/images9.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;या विषयी लेख लिहायचे ठरवले तेव्हा प्रथम गूगलवर इमेजस शोधू लागलो आणि मोठा खजानाच सापडला. एकाहून एक सरस चित्रे सापडली. फक्त नाव टाकायची खोटी. मग मी ही हावरटा सारखा कॉपी करत सुटलो. ह्या भरात काही विस्मरणात गेलेल्या कार्टून्सही सापडल्या. उदा. टिनटिन. अजुन एक सापडली ती म्हणजे- '&lt;span style="color: blue;"&gt;हेकले अँड जेकले&lt;/span&gt;'. ही कार्टून मी १ली-२री त असताना लागायची ते ही सकाळी ६ वाजता आणि मी किलकिल्या डोळ्यांनी उठून पाहायचो. त्याच्या पाठोपाठ '&lt;span style="color: blue;"&gt;माइटी माउस'&lt;/span&gt; ही असायची. या कार्टून्स नंतर कित्येक वर्षे कुठेच पहिल्या नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या काही वर्षात आलेल्या नव्या कार्टून्स मात्र मला आवडल्याच नाहीत. आपल्या लहानपणी पाहिलेल्या कार्टून्स किती सुरेख आणि जिवंत वाटायच्या. आताच्या सर्व कंप्यूटराइस्ड आणि अॅनिमेटेड वाटतात. बेनटेन, पोकिमोन, शिनचान सगळया नकली वाटतात. ज्या चांगल्या होत्या त्या आज ही चांगल्याच वाटतात, किती ही वेळा पहिल्या तरी!बाकी या सगळ्यांच्याच किड्स सीरीस आल्या त्या कोणत्याच चांगल्या नव्हत्या. जे ओरिजिनल तेच बेस्ट!&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहानपणी एक कार्टून नेटवर्क सोडून इतर कुठलाच चॅनेल मी पाहत नसे. मोठ्या भावंडांनी चॅनेल बदलून गाणी लावली तर वाटायचे काय हे सारखे गाणी लावून ठेवतात. मला नाही आवडत. मला फक्त कार्टून नेटवर्क पाहिजे!&lt;br /&gt;त्या वेळेस शाळेचे दप्तर, वॉटरबॅग, कम्पास, वह्यांचे स्टिकर्स सगळ्यांवर कार्टून्स! काय क्रेज होती त्यांची! जिथे-तिथे कार्टून्स! अर्थात आपले बालमित्र होते ना ते ! पण मोठे होत गेलो तसे दुरावतच गेलो. आता आपल्यालाच वेळ नाही त्यांच्यासाठी. कधी मिळालाच तर बघा एखादी कार्टून थोडा वेळ. लहान झाल्यासारखे वाटेल नक्कीच. जास्त लांब कशाला यूट्यूब वर एखादा सर्च द्या. मिळतील तुमचे बालमित्र तिथे. पण त्यापूर्वी हा स्लाइड-शो मात्र नक्कीच बघा. तुमच्या आवडत्या कार्टून्स इथेच सापडतील कदाचित.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;embed flashvars="host=picasaweb.google.com&amp;amp;hl=en_US&amp;amp;feat=flashalbum&amp;amp;RGB=0x000000&amp;amp;feed=http%3A%2F%2Fpicasaweb.google.com%2Fdata%2Ffeed%2Fapi%2Fuser%2Fparijatjuvatkar%2Falbumid%2F5509706724317620465%3Falt%3Drss%26kind%3Dphoto%26authkey%3DGv1sRgCL3Khbey8-HoiQE%26hl%3Den_US" height="192" pluginspage="http://www.macromedia.com/go/getflashplayer" src="http://picasaweb.google.com/s/c/bin/slideshow.swf" type="application/x-shockwave-flash" width="288"&gt;&lt;/embed&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-4828785015683618524?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/4828785015683618524/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_28.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/4828785015683618524'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/4828785015683618524'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_28.html' title='कार्टून नेटवर्क-रिलोडेड'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/THkD9S7X-sI/AAAAAAAAATE/gA8YAMlOPyA/s72-c/download.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-4839133906637582722</id><published>2010-08-22T20:20:00.002+05:30</published><updated>2011-08-31T20:04:30.230+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निरर्थक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ब्लॉग'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निषेध'/><title type='text'>निषेध!निषेध!!</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;निषेध करायचा म्हटला तर कशाचाही करता येतो. निषेध करायला असंख्य विषय आहेत. त्यातील गंभीर विषयांचा सगळेच निषेध करतात म्हणून ते सोडून इतर विषयांचा मी निषेध करायचे ठरवले आहे. वास्तविक निषेध करणे हा माझा स्वभाव नाही पण ब्लॉगरविश्वात आल्यावर आपण नकळत इथली भाषा बोलू लागतो त्याचा हा परिणाम! आणि म्हणूनच ब्लॉगरविश्वात चालणार्‍या घडामोडी, इथले विषय, ब्लॉगर मित्र, त्यांचे ब्लॉग्स आणि त्यातील पोस्ट्स या सगळ्यांतील चांगल्या गोष्टी सोडल्या तर इतर माझ्या अल्पमतीस न पटणार्‍या, न रुचणार्‍या गोष्टींचा मी जाहीरपणे निषेध करायचे ठरवले आहे आणि निषेध झालेल्या गोष्टींचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा ही नम्र विनंती ;) -&lt;br /&gt;&lt;br /&gt;१.सगळ्यात महत्त्वाचा आणि मला लिहायला सतत प्रवृत्त करणारा निषेध म्हणजे त्या ब्लॉगर मंडळींचा जे सतत, नियमितपणे ब्लॉग पोस्ट करत राहतात, दर आठवड्याला २-३ या हिशोबने महिन्याला भाराभर आणि भराभर १२-१५ पोस्ट्स हमखास ओकणार्‍या ब्लॉगर मंडळींचा जाहीर निषेध असो. बाकीच्या मंडळींना लिहायला सवड मिळूच नये व त्यांनी आपलाच ब्लॉग वाचावा असा हेतूही या मागे असावा.ब्लॉगिंगशिवाय ही जगात करण्यासारखे बरेच काही आहे. पण इतर सारी कामे सोडून सतत ब्लॉगिंग करत राहणे हे डोळ्यांच्या दृष्टीने (!) हानिकारक आहे हे त्यांना कुणीतरी समजवावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२. दुसरा निषेध हा त्याचाच दुसरा भाग आहे. याला पोटनिषेध म्हणू हवे तर. म्हणजे स्वत: भरमसाठ पोस्ट टाकाव्यात आणि शिवाय इतरांच्या पोस्टही आवर्जून वाचाव्यात, शिवाय इथे-तिथे कमेंटतही जावे हे अतिशय वाईट. ब्लॉगिंग हे एक व्यसन बनत चाललेय हल्ली. आपल्या ब्लॉग-रोल मध्ये भयंकर मोठी 'आय फॉलोव देम' ची लिस्ट असूनही अजुन नव-नवे ब्लॉगर शोधून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तिथेही पिंका टाकाव्यात हे म्हणजे अतिच झाले. मग बायको त्या लॅपटॉप आणि ब्लॉगरवर जळणार नाही तर काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. माणसाने जगण्यासाठी खावे की खाण्यासाठी जगावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण म्हणून आपली खवय्येगिरी आणि खादाडीपणा असा चव्हाट्यावर मांडावा का? त्या समस्त खादाडीच्या ब्लॉगवर आणि त्यांना फॉलो करत माझीही खादाडी म्हणत खा-खा खाणार्‍या ब्लॉगर मंडळींना इतरांना जळवण्यासाठी याहून चांगले 'खाद्य' सापडले नसेल आणि शिवाय खाण्याचे पदार्थ ही कसे सगळे चमचमीत, चटपटीत आणि त्यांच्या जोडीला वाचकांची लाळ गळावी अशा दृष्टीने केलेले खमंग, रसरशीत वर्णन.&lt;br /&gt;छे! छे! खादाडीचा निषेध असो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;४. भटकंती करायला तशी सगळ्यांनाच आवडते पण काही भटके लोक चुकुन या ब्लॉगर विश्वात आले आणि ब्लॉगसकट भलतेच भरकटले. मग लिहिता येवो न येवो, आपली भटकंती आणि आपली फोटोग्राफी सगळ्यांना दिसली पाहिजे या हेतूने जिथे-तिथे गड-किल्ले, ट्रेकिंग, बीचवरचे, गावाकडले सगळे फोटो ब्लॉगवर पडू लागले. मग कुठे-कुठे काय केले, ह्या गडावर कसे चढलो, त्या ठिकाणी काय गंमत झाली, सगळी रोमहर्षक वर्णने. मग बाईकवर किंवा गाडीसमोर काढलेले फोटोही असतात.&amp;nbsp; त्यात भर म्हणून त्या ठिकाणाची जाहिरातबाजी करण्याचे कांट्रॅक्ट मिळाल्यासारखे वर्णन. निषेध! निषेध! ( हल्ली तो मिलिंद गुणाजी ही सारखा त्याच्या बजाज डिस्कव्हर ची जाहिरातबाजी करत असतो. त्याचा ही निषेध असो!) एकंदर ब्लॉग हे पर्यटनस्थळांच्या जाहिरातीचे ठिकाण नव्हे. ह्या भटक्यांना कुणीतरी आवरा रे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;५. काही ब्लॉगर मात्र फक्त ब्लॉग बनवतात आणि पोस्टच करत नाहीत. इतर सर्वांच्या ब्लॉगवर मोठ्या-मोठ्या कमेन्ट्स द्यायच्या आणि स्वत: मात्र नामानिराळे राहायचे हे म्हणजे ' आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' यातली गत झाली. आम्ही सगळे एवढ्या कष्टाने (: P)मागचा पुढचा विचार न करता वेड्या-वाकड्या पोस्ट टाकत असता त्यांनी असे पोस्ट टाकण्याचे धाडस न करावे हे कदापी मान्य नाही. दातओठ खाऊन निषेध!&lt;br /&gt;&lt;br /&gt;६. आपले मत आणि विचार व्यक्त करण्याकरिता ब्लॉगिंग करत असाल तर ठीक. पण आर्कीटेक्ट असल्याप्रमाणे आपल्या ब्लॉगला रंगीबेरंगी टेंप्लेट, विड्जेट्स लावून ब्लॉगची शोभा वाढवणार्‍या ( करणार्‍या) ब्लॉगर मंडळींचाही निषेध असो. वेगवेगळे गॅजेट्स जोडल्याने वाचकांचे लक्ष विचलित होते हे लक्षात घ्यावे. उगाच स्लाईड शो काय विडीयो काय ? पुन्हा एकदा जोरदार निषेध!&lt;br /&gt;&lt;br /&gt;७. मोठमोठ्या पोस्ट लिहायचा कंटाळा येतो, वेळ मिळत नाही, सुचत नाही असली क्षुल्लक करणे देऊन ब्लॉग-पोस्ट ऐवजी कवितांवर आटपनारे किंवा फक्त कविताच पोस्ट करून भराभर पोस्ट संख्या वाढवून भाव खाणार्‍या कवि ब्लॉगरांचा आम्हा पोस्ट-ब्लॉगरांकडून निषेध असो! आणि माझ्या स्वत:चा कवितांचा एक ब्लॉग असल्याने माझा मीच आरशासमोरून निषेध करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;८. सगळ्यात गंभीर निषेध मात्र अजुन बाकी आहे आणि तो म्हणजे ब्लॉग चोरी करणार्‍यांचा. इतरांच्या ब्लॉग वरुन काहीतरी गोळा करून आपल्या ब्लॉगवर टाकावे हा निर्लज्जपणा करणार्‍यांचा कडकडून निषेध! चोरणार्‍यांनी लक्षात घ्यावे की ते फक्त एखाद्याची कलाकृती चोरू शकतात त्याचे विचार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;९.एवढे सगळे निषेध करूनही जो माझ्या फायद्याचा निषेध आहे तो शिल्लकच आहे. ब्लॉगवरुन येऊनही, पोस्ट वाचूनही कमेंट न देणार्‍या आळशी अन् फुकटवाचू वाचकांचा टाळ्यांच्या कडकडाटासह (?) निषेध! त्रिवार णि षे ढ !!!&lt;br /&gt;इतकी घोषणाबाजी करूनही जर तुम्ही कमेंटणार नसाल तर तुमचा तुम्हीच निषेध करा आणि तुमचा निषेध क्लास खाली नमूद करा.&lt;br /&gt;हुश्श! दमलो बुवा!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-SUN13t8Wmlw/Tl5GbqHuKUI/AAAAAAAAA6g/fiYtATSrrk4/s1600/277508_1859932866967_1500295757_1559029_3638049_o.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="94" src="http://3.bp.blogspot.com/-SUN13t8Wmlw/Tl5GbqHuKUI/AAAAAAAAA6g/fiYtATSrrk4/s320/277508_1859932866967_1500295757_1559029_3638049_o.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-4839133906637582722?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/4839133906637582722/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_22.html#comment-form' title='32 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/4839133906637582722'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/4839133906637582722'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_22.html' title='निषेध!निषेध!!'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-SUN13t8Wmlw/Tl5GbqHuKUI/AAAAAAAAA6g/fiYtATSrrk4/s72-c/277508_1859932866967_1500295757_1559029_3638049_o.jpg' height='72' width='72'/><thr:total>32</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-7961747330775871879</id><published>2010-08-15T15:51:00.001+05:30</published><updated>2011-02-10T14:43:43.401+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्वातंत्र्य दिन'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='भारत'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राष्ट्रप्रेम'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सामाजिक'/><title type='text'>सैनिकहो तुमच्यासाठी...</title><content type='html'>&lt;div style="color: blue;"&gt;भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी&lt;/div&gt;&lt;div style="color: blue;"&gt;सैनिकहो तुमच्यासाठी...सैनिकहो तुमच्यासाठी...&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TGe--RO6apI/AAAAAAAAAGA/IJ4fPEmUPpc/s1600/The+Proud+Indian+Flag.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="260" src="http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TGe--RO6apI/AAAAAAAAAGA/IJ4fPEmUPpc/s320/The+Proud+Indian+Flag.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;गाणे तर ऐकले असेलच ना तुम्ही? गदिमांनी लिहिलेल्या या गाण्यात त्यांच्या मनातील देशाविषयी, सैनिकांविषयीची कृतज्ञता सहजपणे उतरली आहे. आज इतकी वर्षे होऊनही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी न चुकता कुठे न कुठे गाणे ऐकू येते आणि या दोन दिवशीच ऐकू येते. एरवी आपण ऐकतो का हे गाणे? ह्याच गाण्यातील काही ओळी अशा...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="color: blue;"&gt;परि आठव येता तुमचा...&lt;/div&gt;&lt;div style="color: blue;"&gt;आतडे तुटतसे पोटी...&lt;/div&gt;खरंच तुटते का?&lt;br /&gt;आशा भोसले यांनी हे गाणे स्वरबद्ध करताना हे शब्द इतक्या भावपूर्ण रीतीने गायले आहेत पण आपली हृदये इतकी कठोर झाली आहेत की हे शब्द खोटेच वाटतात काही वेळा.कारण सामान्य नागरिकांना काहीच वाटत नसते. अनोळखी माणसांना श्रद्धांजली वाहून पुन्हा कामाला लागावे तसे आपली विचारसरणी झाली आहे. केवळ २ मिनिटे मौन पळावे तेवढीच आपली त्यांच्याप्रतीची निष्ठा. आपल्याला त्यांची आठवण ही होत नाही आणि आपण त्यांचा विचारही करत नाही. ते लढत राहतात, असीम पराक्रम गाजवून शौर्य पदके मिळवतात, प्रसंगी अमर ही होतात, आपल्याला काही फरक पडत नाही.&lt;br /&gt;माफ करा आम्हाला,&lt;br /&gt;कारण स्वातंत्र्यदिन साजरा करावा असे काहीच कृत्य आमच्या हातून घडले नाही. त्याचे श्रेय देशासाठी लढलेल्या असंख्य देशभक्तांचे आहे, त्याचा हक्क आजही सीमेवर लढणार्‍या सैनिकांचा आहे. आपण कोण? केवळ एक दिवस झेंडावंदन करणार ( कित्येकजण तेही करत नाहीत), देशभक्तिपर गीते गाणार आणि नंतर विसरून जाणार. फारफार तर सकाळी एखादी रॅली काढणार, भाषणे देणार, ते ही नाहीच तर मित्रांना 'स्वातंत्र्य दिनाचे' एसएमएस पाठवणार, बास!&amp;nbsp; नंतर सुट्टीच आहे तर संध्याकाळी पार्टीही करणार. म्हणूनच माफ करा. आमची लायकी नाही देशप्रेम व्यक्त करण्याची.&lt;br /&gt;स्वातंत्र्य मिळवणे इतके सोपे होते का? या अग्निकुंडात कित्येकांनी उड्या घेतल्या, कैक पिढ्या खर्ची पडल्या तो हा सोनियचा स्वतंत्र भारत जन्मास आला. हसतमुखाने 'देशासाठी' प्राण अर्पण केलेल्यांनी स्वत:च्या घरादाराचा कधी विचार केला? त्यांनी विचार केला फक्त देशाचा, या भारतभूमीचा, या मातीचा, तिच्या रक्षणाचा आणि त्याप्रमाणे सर्वस्व वाहिलेदेखील. आपल्याला तर विचारही करवत नाही. आणि हेच तर दुर्दैव आहे. सगळेजण स्वत:चा विचार करत आहेत फक्त. मी, माझे घर, माझे करियर, माझा पैसा, माझे आयुष्य इ...-देशासाठी काही विचार केला का?&lt;br /&gt;'स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !'&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-7961747330775871879?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/7961747330775871879/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_15.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7961747330775871879'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/7961747330775871879'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_15.html' title='सैनिकहो तुमच्यासाठी...'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TGe--RO6apI/AAAAAAAAAGA/IJ4fPEmUPpc/s72-c/The+Proud+Indian+Flag.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-2396371328592750244</id><published>2010-08-07T11:15:00.000+05:30</published><updated>2010-08-25T15:13:36.563+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सचिन'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फाल्तूगिरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='जाहिरातबाजी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निषेध'/><title type='text'>रक्तरंजीत पुस्तक</title><content type='html'>नुकतेच टी.व्ही.वर बातम्यामध्ये पाहिले - सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र 'ओपस' पुस्तक लवकरच बाजारात येणार...किंमत फक्त ३२ लाख रुपये.&lt;br /&gt;सचिनच्या बाबत तशी प्रत्येक गोष्ट स्पेशल आहे. त्याची क्रिकेट कारकीर्द सोडून ही त्याच्या विषयीच्या अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. तो किती टॅक्स भरतो, किती जाहिराती करतो यापासून ते त्याचे ट्विटर वरील आगमन सगळ्याच गोष्टी खास. सचिन विषयी या आधीही अनेक पुस्तके लिहिली गेली. त्याचे बालपण, त्याचे करियर, त्याचे विक्रम आणि त्याचे सर्व आयुष्य अथ पासून इतिपर्यंत छापणारे लेखक काही कमी नाहीत. त्यात अजुन एक भर म्हणून नवीन पुस्तक- ओपस !&lt;br /&gt;एरवी सचिन विषयी काहीही वाचायला मिळता त्याच्या चाहत्यांना आनंदच होत असतो, मात्र सचिन वर प्रेम करणार्‍यांना हे नवे पुस्तक येणार याचा आनंद होण्यापेक्षा दुसरीच गोष्ट सलत आहे ती म्हणजे या पुस्तकाच्या निर्मितीत वापरण्यात आलेले सचिनचे रक्त.(सध्या जरी ही बातमी खोटी असल्याचे कळले असले तरी दोन दिवसांपूर्वी याचा निषेध सर्वत्र झाला होता) पुस्तकाच्या पानामध्ये कुणाचे तरी रक्त मिसळले आहे ही कल्पनाच किती विचित्र आहे आणि यातून त्या व्यक्तीचे चाहत्यांप्रती प्रेम नक्कीच व्यक्त होत नाही आणि शिवाय त्याची अवाजवी किंमत हे तर अजुनच सलनारी गोष्ट आहे. म्हणजे सचिन वर प्रेम करण्याचा हक्क हा श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, जात-पातीची सर्व बंधने मोडणारा असता असे एखादे पुस्तक फक्त श्रीमंतांना खरेदी करता येईल अशा किमतीला मिळावे हे तमाम भारतीयांना न आवडण्यासारखे आहे. (तरी बरे सचिनने ही जाहीर केले की त्या पुस्तकासाठी त्याचे रक्त वापरण्यात आले नाही आणि ते त्याचे आत्मचरित्र नसून केवळ छायाचित्रांचे पुस्तक आहे.) मुळात सचिन सारख्या व्यक्तीला प्रसिद्धीसाठी असल्या कुबड्यांची कधीच गरज भासत नाही. त्याचे कर्तृत्वच त्याची थोरता सांगते.&lt;br /&gt;पण सचिनच्या रक्ताचे काही थेंब वापरले हे कारण पुस्तकास प्रसिद्धी मिळवून देण्यास पुरेसे आहे हे पुस्तक छापणार्‍यांस ठाऊक आहे आणि हे सारे न करता ही सचिनचे पुस्तक त्याच्या चाहत्यांनी मिळेल त्या किमतीला घेतले असते. पण नको त्या गोष्टींना प्राधान्य देऊन हे लोकच चुकीचे 'ट्रेण्ड' रुजू घालत आहेत. सचिनवर त्याच्या चाहत्यांचे असणारे प्रेम आणि चाहत्यांप्रती सचिनची असणारी बांधीलकी सिद्ध करण्यासाठी असले अमानवी प्रकार करायची बिलकुलही आवश्यकता नाही.पण हे सगळे त्या प्रकाशकांना कोण समजावणार ?याहून खटकणारी गोष्ट म्हणजे आपण सगळेच या विषयाला सचिनची महानता आणि त्याच्या सोनेरी आयुष्याचे क्षण टिपणारे पुस्तक म्हणून ते इतके महाग असे समजत आहोत पण सचिन सारख्या हिर्‍याची कशाशी ही तुलना होऊ शकत नाही मग ते ३२ लाखाचे पुस्तक का असो? &lt;br /&gt;सहज मनात आले म्हणून सांगावेसे वाटते की २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कित्येक जवाणांनी प्राण गमावले, रक्त सांडले. त्यांच्या रक्ताची किंमत काय? देशासाठी रक्त सांडणारे तसेच गेले. कुणाला त्यांची पर्वा नाही, त्याच्या रक्ताचे मोल नाही.काही दिवस आपण श्रद्धांजली वाहिली, आसवे गाळली आणि पुन्हा आहे तसेच सुरू. त्यांचेच का ? सीमेवर आजपर्यंत कित्येक सैनिकांनी देशासाठी रक्त वाहीले पण त्यांच्या रक्ताची किंमत कोणी केली ? आपल्याला फक्त सचिनच्या रक्ताचीच किंमत का? त्याने रक्त दिले या बातमीवर लगेच सर्वत्र निषेध जाहीर झाला, टीका झाली आणि त्याची ब्रेकिंग न्युज ही झाली.पण नक्षलवाद्यान्शी लढणार्‍या सैनिकांच्या बलदानाची कुणाला पर्वा? आपल्याला कुणा शहीद अधिकार्‍याचे जॅकेट सांभाळता येत नाही मग आपल्याला त्याच्या पराक्रमाचे गोडवे गाण्याचा तरी काय अधिकार? मग सचिनने एक थेंब रक्त सांडो वा बाटलीभर रक्त सांडो काय फरक पडतो? &lt;br /&gt;पण हे सारे असेच चालू राहते. ज्या बातम्या खळबळ माजवतात त्यांना महत्त्व द्यायचे मग त्या तितक्या महत्त्वाच्या असो वा नसोत आणि त्यासाठी कुठल्याही ठरला जायची तयारी असते लोकांची. एक गोष्ट मात्र नक्की आहे प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही ठरला जातात आणि काहीही अफवा पसरवतात.सचिन बाबत अशा अनेक अफवा पसरवण्याचा या आधीही प्रयत्न झाला आहे पण त्याच्या चाहत्यांचा त्याच्या वरील विश्वास नेहमीच अढळ आहे आणि या वेळीही तो सार्थ ठरवत सचिनने सर्वांना दिलासा देत या बातमीस पूर्णविराम दिला.&lt;br /&gt;&lt;i&gt;&lt;br /&gt;प्रतिक्रिया-&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;Sharayu Said-&lt;br /&gt;रक्तासारखा अनमोल पदार्थ अशाप्रकारे वाया घालविला जाऊ नये. &lt;br /&gt;&lt;br /&gt;Sagar Said-&lt;br /&gt;रक्त खवळले म्हणूनच लिहिले...रक्त ही काय पुस्तकाची शोभा वाढवण्याची गोष्ट आहे?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-2396371328592750244?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/2396371328592750244/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_5097.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/2396371328592750244'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/2396371328592750244'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_5097.html' title='रक्तरंजीत पुस्तक'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-6360877066663050978</id><published>2010-07-11T11:12:00.000+05:30</published><updated>2010-08-25T15:10:14.444+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निरर्थक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='काल्पनिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><title type='text'>वटपौर्णिमेचे आधुनिकीकरण (सीरियलीकरण)</title><content type='html'>फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट तशी जुनीच पण थोड्या नव्या रंगात, नव्या ढंगात सादर करत आहे. म्हणूनच आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने काही जुन्या घटनांची उजळणी करूया. इतिहासाची पुनरावृत्ती होते तशी त्या इतिहासातल्या घटनांची नवी आवृत्ती ही येऊ शकते. त्याच संदर्भातली एक गोष्ट इथे सांगत आहे. विषय आहे- वटपौर्णिमा आणि कथेची नायिका आहे महाभारतातील द्रौपदी.(पोस्ट लिहून दोन आठवडे झाले पण छापायला फारच वेळ लागला. असो आमचे घोडे नेहमीच वरातीमागून असते)&lt;br /&gt;आधुनिकीकरण करायचे तर मूळ पात्र तशीच ठेवून कथानकात थोडे फार फेरफार करण्यात आले आहेत. जसे कौरव-पांडव हस्तिनापूर सोडून मुंबईत आले आहेत आणि वाडवडिलांचा बिझनेस सांभाळत आहेत. बिझनेस आयकॉन पंडूच्या मृत्यूनंतर बिझनेसचा वारस कोण ? या प्रश्नावर कौरव-पांडवामध्ये वाद चालू राहतात आणि कोर्टात केस दाखल होते. आता ते पूर्वीसारखे राजवाड्यात न राहता कुठल्याश्या मोठ्या कॉंप्लेक्समध्ये राहताहेत. जिथे सारे हस्तिनपूरचे रहिवासी अर्थात कंपनीचे कर्मचारीही राहत आहेत. पण कौरव-पांडव वादामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.&lt;br /&gt;अशातच मग वटपौर्णिमेचा दिवस उजाडतो.( द्रौपदीचा रोल एकता कपूरच्या कोणत्याही सीरीयलमधल्या एखाद्या सुनेला देऊन टाकू.) द्रौपदी नेहमीप्रमाणे लवकर उठून स्नान वगैरे आटपून राजमाता कुंतीच्या बेडरूममध्ये जाते.(कुंतीच्या रोलसाठी निरूपा रॉय टाईप कोणतीही जुनी अभिनेत्री घेता येईल.) राजमाता आज थोड्या अस्वस्थ वाटतात.&lt;br /&gt;'' शुभ प्रभात, राजमाता'' द्रौपदी प्रवेश करते.&lt;br /&gt;( मुंबईत येऊनही 'गुड मॉर्निंग' म्हणण्याइतकी द्रौपदी पुढारलेली नाही.)&lt;br /&gt;कुंती उसने हसू आणत तिला बसायला सांगते.&lt;br /&gt;'' काय झाले, राजमाता? आज तुमच्या चेहर्‍याचा रंग का उडाला आहे?&lt;br /&gt;यावर इथे माझ्या आयुष्याचा रंग उडाला आहे म्हणून हे पांढरे वस्त्र नशिबी आले असे काहीतरी कुंती मनातल्या मनात पुटपुटते आणि मग द्रौपदीकडे पाहून उद्गारते,&lt;br /&gt;'' आज यांची फार आठवण येते आहे ग!'' कुंतीचा स्वर हळवा होतो व पापण्याच्या कडा ओलावतात.&lt;br /&gt;जुन्या घटनांच्या आठवणीने कुंती 'फ्लॅशबॅक' मध्ये जाते. तेवढ्या वेळात द्रौपदीची दोन-चार वाक्ये तिला ऐकू येत नाहीत. मग ती भानावर येते तेव्हा द्रौपदी बोलत असते,&lt;br /&gt;'' मी ही माझ्या पतींना(आदरार्थी आणि अनेकवचनी दोन्ही) फार मिस करतेय!(थोडे फार इंग्रजी येत असते म्हणा तिला)कंपनीच्या कामानिमित्त परदेश दौर्‍यावर गेल्याला कित्ती दिवस झालेत. पण आज सकाळीच यांचा फोन आला होता तिकडची खुषाली कळवायला. म्हणाले लवकरच परततील भारतात'' पांडवांच्या परतण्याच्या वार्तेने कुंतीला दिलासा मिळतो.&lt;br /&gt;'' राजमाता, आता मी निघते. वटपूजेला जायला हवे. नाहीतर गर्दी वाढली तर वेळ लागेल फार'' असे म्हणत द्रौपदी कुंतीचा निरोप घेते.&lt;br /&gt;पाच पांडवांना सांभाळून घेणारी द्रौपदीसारखी सून लाभली म्हणून कुंतीचे डोळे भरून येतात. पण त्याच वेळी तिला ज्येष्ठ पांडवाची आठवण होते. आज तो पांडवांसह असता तर द्रौपदीला सहा पतींचे भाग्य लाभले असते. अन् साती जन्मी हाच पती लाभू दे असा वर जिथे सर्व स्त्रिया मागतात तिथे द्रौपदीला या जन्मी सहा पती लाभता पुढील सहा जन्मी सहा पती कसे'डिस्ट्रीब्यूट' झाले असते हे चित्र दिसू लागले किंवा मग वडाच्या झाडास ३५ फेर्‍या मारण्यापेक्षा ४२ मारल्या तर कुठे फारसे बिघडणार होते. पण नियतीपुढे कोणाचे काय चालणार? या विचाराने कुंती पुन्हा खिन्न होते.( इथे मग हळवे सूर ऐकू येतात- बॅकग्राउंड म्युझिक)&lt;br /&gt;द्रौपदी मात्र तिच्या पतींची खुषाली कळल्यामुळे आनंदात असते. पूजेची तयारी करत असतानाही' मेरे पिया गये रंगून' असे काहीसे गुणगुणत असते. आरशात पाहून कुंकू लावतानाही माझ्या कुंकवांच रक्षण कर असे देवापुढे सांगायला ती विसरत नाही. अर्थात कुंकवाचा एकच ठिपका लावते ती) पण एवढ्यातच लाईट जाते. अन् ''अरे देवा, हे काय झाले?''( ढॅन..ढॅन..ढॅन -बॅकग्राउंड म्युझिक )असे म्हणताना द्रौपदीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते.' हा काही अपशकुन तर नाही ना!' द्रौपदी चिंतातूर. पुन्हा देवाकडे धावा.लाईट गेल्यामुळे लिफ्ट बंद होते व त्यामुळे जिण्याच्या पायर्‍या उतरत तिला खाली यावे लागते. पण द्रौपदी असतेच मुळी सोशिक तेव्हा ते सारे भाव तिच्या चेहर्‍यावर सहजपणे येतात.&lt;br /&gt;बिल्डींगमधून खाली उतरल्यावरही द्रौपदीच्या मनाची चलबिचल सुरुच असते. त्याच वेळेस कौरवांच्या इमारतीतून कौरवांच्या बायका येताना दिसतात. त्यांना पाहून पुन्हा द्रौपदी अस्वस्थ होते तरीही वटपूजा करायलाच हवी या निर्धाराने द्रौपदी चालू लागते. द्रौपदीकडे पाहून कौरवांच्या बायका आपसांत कुजबुजू लागतात. त्यांकडे दुर्लक्ष करत द्रौपदी वडाच्या दिशेने चालू लागताच'थांब द्रौपदी' असे तिखटपणे उद्गारत त्यातील एक तिला आडवी येते.(इथे पुन्हा -ढॅन..ढॅन..ढॅन..म्युझिक)&lt;br /&gt;'' तुझी हिंमतच कशी झाली इथे येण्याची? ही कौरवांची प्रॉपर्टी आहे. ही कंपनी, ह्या इमारती, ही झाडे सारे सारे काही कौरवांचे आहे. तुझा यावर काडीचाही हक्क नाही. दुर्योधनाने काय सांगितले ते विसरलीस का? ह्या वडाच्या झाडाच्या एकाही पारंबी अन् एकाही पानावर तुझा अधिकार नाही'' डोळ्यांतून आग ओकत दुर्योधन पत्नी उद्गारते.(इथे मग भर उन्हात ढग गडगडू लागतात, वीजा कडाडू लागतात अन् इकडून तिकडून कॅमेरे द्रौपदीच्या हतबल चेहर्‍यावर.)अन् मग गंगा- यमुना वाहू लागतात.झाल्या अपमानाने द्रौपदी पेटून उठते,&lt;br /&gt;'' चांडाळीनो, मी तुमचे काय वाईट केले आहे ज्याबद्दल मला ही शिक्षा देत आहात. लक्षात ठेवा, माझे पती जेव्हा कोर्टातील केस जिंकतील तेव्हा कौरवांस भीक मागण्याची पाळी येईल.( नव्या महाभारतात कौरवांस ठार मारणे उचित ठरत नाही म्हणून त्यांना कारावासात धाडूया.)तुमच्या या दुष्टपणाची फळे तुम्हाला नक्कीच भोगावी लागतील.( बॅकग्राउंडमध्ये देवीचे मंत्र, घंटानाद, ढोलताशे सारेच काही वाजू लागतात.)डोळ्यांतील आसवे पुसत द्रौपदी तशीच माघारी फिरते अन् झरझर चालत बिल्डींगची वाट धरते. कौरव-बायका मात्र नाक मुरडत माघारी वळतात आणि एका-मागोमाग शंभर जणी वडापुढे रांग लावून उभ्या राहतात.&lt;br /&gt;तिकडे द्रौपदी अपमानाने संतप्त होऊन बिल्डींग मध्ये शिरते. एव्हाना पर्यंत लाईट आलेली असते पण तिच्या ते लक्षात येत नाही.ती तशीच जिन्यावरून धावत सुटते. शेवटच्या मजल्यावर पोहोचेपर्यंत तिची लंकेची पार्वती होते. धावत धावत ती घरातील देव्हार्‍यापुढे जाते आणि देवाशी भांडू लागते, '' देवा का छळत आहेस मला असा? कुठल्या पापाचे फळ भोगावे लागत आहे मला? वगैरे वगैरे...''&lt;br /&gt;तिचा आर्त स्वर ऐकून कुंती बाहेर येते.&lt;br /&gt;'' द्रौपदी, काय झाले एवढे? तुझ्या डोळ्यांत अश्रू का?'' मग द्रौपदी सारी हकिकत सांगते.&lt;br /&gt;'' देवा कुठे आहेस तू? एका पतिव्रतेची अशी विटंबना होत असताना इतक्या निष्ठुरपणे तू पाहत आहेस? ''&lt;br /&gt;तिच्या या डायलॉगवर लगेच दारावरची बेल वाजते. द्रौपदी जाऊन दार उघडते तर 'साक्षात श्रीकृष्ण समोर' ( श्रीकृष्णाच्या रोलसाठी मात्र छोट्या-मोठ्या कलाकारास न घेता डायरेक्ट एका सुपरस्टारला घेण्यात आले आहे तो म्हणजे-रजनीकांत !एक तर श्रीकृष्ण काळा आणि रजनीकांतही काळा, शिवाय कृष्ण आणि रजनीकांत दोघांनाही अशक्य असे काहीच नाही, म्हणून मग कृष्णाच्या रोलसाठी याहून चांगला पर्याय नव्हताच.) आपला रक्षणकर्ता, संकटहर्ता श्रीकृष्ण दारात आल्याचे पाहून द्रौपदीस फार आनंद होतो. नवा कृष्ण मात्र थोडा मॉडर्न आहे, अर्थात रजनीकांत असल्यामुळे तो त्याची स्टाईल मारत काळा गॉगल हवेत उडवतो व कमरेला अडकवतो(!)' तुमने पुकारा और हम चले आये' असे गाणे म्हणत हसत-हसत घरात प्रवेश करतो.&lt;br /&gt;'' काय प्रॉब्लेम आहे, द्रौपदी? कशासाठी बोलावून घेतलेस मला?''&lt;br /&gt;मग द्रौपदी रडगाणं गात सारी हकिकत कृष्णास सांगते.( इथे फक्त लिप मूव्हमेण्ट्स होतात अन् मागे बॅकग्राउंड म्युझिक )&lt;br /&gt;''हात्तीच्या, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मला बोलावलंस? आता तुझा प्रॉब्लेम सॉल्व करतो बघ. बस हा एका मिनिटात आलो मी! आणि तिथून गायब होतो तो ( बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे) एका मिनिटाच्या आत छोटे वडाचे झाड घेऊन हजार होतो. ते पाहून द्रौपदीच्या आनंदास पारावार उरत नाही.&lt;br /&gt;'' कृष्णा, धन्य आहेस तू! धन्य तुझ्या लीला! माझ्या आग्रहाखातर तू वडाचे झाड घेऊन आलास. रामायणात हनुमानाने पर्वत उचलून आणला होता आणि तू इथे वडाचे झाड घेऊन आलास''&lt;br /&gt;'' द्रौपदी, तू कधी घराबाहेर पडत नाहीस याचा हा परिणाम. अग, हल्ली बाजारात मिळतात अशी लहानशी वडाची झाड. तिथुनच घेऊन येतोय आणि पर्वत तसा मीही उचलला होता तो ही एका करंगळीवर, विसरलीस की काय?''&lt;br /&gt;'' होय कृष्णा, तुझी लीला खरंच अगाध आहे'' कुंती आणि द्रौपदी दोघींच्या चेहर्‍यावर आनंदी-आनंद.&lt;br /&gt;त्याच वेळेस द्रौपदीची सून उत्तरा ही येते.(उत्तराच्या रोलसाठी नव्या होतकरू नायिकांना संधी मिळावी.)&lt;br /&gt;'' अरे क्रिश, तू केव्हा आलास ?'' (उत्तरा नव्या पिढीची असल्याने कृष्णाशी एकदम फ्रँकली वागते)&lt;br /&gt;'' हा काय आत्ताच आलो!''&lt;br /&gt;पण कुंती मात्र उत्तरावर भडकते,'' उत्तरा, ही काय वेळ झाली यायची? आज वटपौर्णिमा आहे. माहीत नाही का तुला? आणि सकाळ पासून होतीस कुठे तू? वटपूजा करायची नाही का तुला?''&lt;br /&gt;यावर उत्तरा हसून उद्गारते,'' राजमाता, अहो मी माझ्या बेडरूममध्येच होते आणि वटपूजा तर झाली सुद्धा. अहो इंटरनेटचा जमाना आहे. मी ऑनलाइनच वटपूजा केली''&lt;br /&gt;यावर कुंती आणि द्रौपदी आश्चर्यचकित होतात 'ऑनलाइन वटपूजा?'&lt;br /&gt;''हो, अभिमन्यूलाही आधीच सांगितले होते मी. एव्हानापर्यंत डिलीवरी रिपोर्टही मिळाला असेल त्याला''&lt;br /&gt;''डिलीवरी रिपोर्ट! म्हणजे सूनबाई काही गोड बातमी की काय? '' द्रौपदीचे डोळे चमकतात.&lt;br /&gt;'' नाही हो सासूबाई, वटपूजा सक्सेसफूल झाल्याचा रिपोर्ट त्याच्या मोबाईलवर पोहोचला असेल, त्याबद्दल बोलते आहे मी!''&lt;br /&gt;उत्तरेच्या या नव्या कल्पना ऐकून दोघी अवाक् होऊन पाहू लागतात.&lt;br /&gt;'' आणि काय रे क्रिश, तू तर सर्वज्ञानी आहेस मग तुला ऑनलाइन पूजेविषयी माहीत नाही काय?&lt;br /&gt;''उत्तरे ठाऊक आहे मला सारे, पण म्हटले तुझ्या सासूला हे सारे पटायचे नाही. म्हणून तिच्यासाठी हे वडाचे झाडच बरे! आणि माझ्या १६००० बायकांना ऑनलाइन वटपूजाच शिकवली आहे मी. एवढ्या जणी जर वडापुढे उभ्या राहिल्या तर किती वेळ लागेल पूजेला, नाही का? जमाना बदललाय, आपणही बदलायला हवे. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस आलेत.''&lt;br /&gt;यावर कुंती आणि द्रौपदीने कसनुसं हसत माना डोलावल्या.&lt;br /&gt;''उत्तरा, तुझ्या सासूलाही हे सारे शिकव म्हणजे मला वारंवार येण्याची गरज लागणार नाही''&lt;br /&gt;उत्तरेने होकारार्थी मान हलवली.&lt;br /&gt;'' तर मग निघतो मी, घाईघाईत मोबाईल घरीच विसरलो. आत्तापर्यंत वटपूजेचे बरेचसे डिलीवरी रिपोर्ट आलेही असतील. अच्छा फिर मिलेंगे'' गॉगल चढवत कृष्ण म्हणाला अन् क्षणात अंतार्धान पावला.&lt;br /&gt;उत्तरेनेही मग द्रौपदीचे वटपूजेचे फोटो वगैरे काढून ट्विटर आणि फेसबूकवर शेअर केले.&lt;br /&gt;अशा तऱ्हेने वटपौर्णिमा अध्याय संपला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-6360877066663050978?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/6360877066663050978/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_5886.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/6360877066663050978'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/6360877066663050978'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_5886.html' title='वटपौर्णिमेचे आधुनिकीकरण (सीरियलीकरण)'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-1227048555266790029</id><published>2010-07-07T10:53:00.000+05:30</published><updated>2010-08-25T15:01:13.693+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सामाजिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निषेध'/><title type='text'>समानतेचा निकष</title><content type='html'>आपल्या देशात नको त्या गोष्टींना प्राधान्य देण्याची सवयच लागली आहे. एस.एस.सी.बोर्डाचे निकाल लागले आणि यंदा अपेक्षेहून अधिक मार्कांची उधळपट्टी झाली. मुले टेन्शन घेतात, आत्महत्या करतात म्हणून सढळ हाताने गुणवाटप करण्यात आले. सर्वत्र आनंदी-आनंद झाला.&lt;br /&gt;आता महत्वाचे काम- मिशन अड्मिशन. आणि अकरावी प्रवेशासाठी एस.एस.सी. बोर्डाप्रमाणे, सी.बी.एस.ई. आणि आय.सी.एस.ई. बोर्ड ही रांगेत उभे राहीले. दरवर्षी प्रमाणे इतर बोर्डाचे विद्यार्थी रांगेत पुढे आणि आपले मराठमोळे विद्यार्थी मागे!. मग त्यांना भरघोस मार्क आणि आम्हाला कमी का? या एस.एस.सी. बोर्डाच्या प्रश्नावर शिक्षणखात्यास आणि हायकोर्टास अजूनही उत्तर सापडले नाही. या पूर्वी ही पर्सेन्टाईल आणि ९०:१० हे फॉर्म्युले वापरण्यात आले पण कोडे अजुन सुटले नाहीए. हायकोर्टाने मात्र हॅटट्रिक साधत या वर्षीही नापास होण्याचे सत्र चालू ठेवले.&lt;br /&gt;एस.एस.सी. आणि इतर बोर्डांची गुणांच्या बाबतीत अशी तुलना करणे योग्य नाहीच आहे. दोन्हींचे अभ्यासक्रम व शिक्षणपद्धती वेगवेगळी आहे. त्यामुळे याबाबत वेगवेगळी अड्मिशन प्रक्रिया अवलंबण्याची गरज आहे. त्यावर कधी न कधी योग्य उपाय सापडेल अशी आशा आहे पण समानतेची गोष्ट करणार्‍यांनी एका महत्वाच्या मुद्द्याला पूर्णत: दुर्लक्षित केले आहे ते म्हणजे शिक्षण प्रक्रियेतील जातीयवादाचा प्रभाव.&lt;br /&gt;माझा काही जाती आणि धर्मावरून वाद निर्माण करण्याचा हेतू नाही पण ज्या पद्धतीने OPEN वर्गातील विद्यार्थ्यांस व SC, OBC, ST तत्सम 'कास्ट' वर्गातील विद्यार्थ्यांत भेदभाव केला जातो तो आहे. समानतेचा दृष्टिकोन असल्याने मी जात-धर्म मानत नाही पण आपले शिक्षण मंडळ सर्वत्र अड्मिशन प्रक्रियेत खालच्या जातीच्या लोकांस प्राधान्य देते आणि ते निश्चितच खटकण्यासारखे आहे. 'कास्ट' मध्ये असणार्‍यांना सहज अड्मिशन मिळून जाते व इतर उच्च वर्गीय लोकांस फीसाठी पावत्या फाडाव्या लागतात. 'कास्ट' मधील विद्यार्थी त्यांना अड्मिशन  मिळणार या खात्रीवर निश्चिंत असतात तर इतर मात्र त्यासाठी पैसे मोजत बसतात.&lt;br /&gt;पूर्वी खालच्या जातीच्या लोकांवर अन्याय झाला म्हणून सरकार आता त्यांना सुविधा व सवलती पुरवत आहेत पण अन्याय करणारे गेले आणि सहन करणारे ही गेले. कॉलेजमध्ये जिथे गुणवत्तेच्या निकषानुसार अड्मिशन मिळायला हवे तिथे जातीच्या दाखल्यावर कामे होताहेत. श्रीमंतांचे मुले बापाच्या पैशावर मजा करतात, त्यांना याची कसली चिंता नसते कारण पैसे भरले की सारे काही होते हे त्यांना ठाऊक असते. तसेच चित्र हल्ली 'कास्ट' मधील विद्यार्थ्यांत दिसत आहे. त्यांना जास्त अभ्यास करायची गरज वाटत नाही, मेहनत करून यशस्वी होण्याची महत्वाकांक्षा ते बाळगत नाहीत. याला काही अपवाद असतील ही पण बहुतांश जणांची ही प्रवृत्ती बनत चालली आहे. म्हणूनच हे सारे थांबावेसे वाटते.&lt;br /&gt;आमच्या एका ओळखीच्या गृहस्थांनी तर खोटा जातीचा दाखला बनवून घेतला. कारण त्याबळावरच डोनेशनचे पैसे वाचणार होते. आता हे असेच चालू राहीले तर कदाचित काही वर्षानी उच्च जातीच्या लोकांनाच त्यांच्या जातीची लाज वाटू लागेल. सर्वधर्मसमभाव म्हणत असताना आपण जातीयवादाचे झेंडे रोवत राहिलो तर जी सक्षम पिढी आपल्याला हवी आहे ती या 'अड्मिशन लिस्ट' प्रमाणेच कायम उपेक्षित&amp;nbsp;राहील आणि जागोजागी 'कास्ट हेच क्वालिफिकेशन' ठरेल !&lt;br /&gt;&lt;i&gt;&lt;br /&gt;प्रतिक्रिया-&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;kayvatelte.com says:&lt;br /&gt;परखड लिहिलंय एकदम. आवडलं&lt;br /&gt;&lt;br /&gt;Sagar says:&lt;br /&gt;धन्यवाद...मी स्वत: हे सारे पहिले आहे आणि ही परिस्थिती पाहून फार वाईट वाटते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-1227048555266790029?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/1227048555266790029/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_14.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/1227048555266790029'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/1227048555266790029'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_14.html' title='समानतेचा निकष'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-6921968829311565172</id><published>2010-07-01T10:48:00.000+05:30</published><updated>2010-08-25T14:52:02.424+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सहज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निरर्थक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='काल्पनिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><title type='text'>परीक्षा संपली !!!</title><content type='html'>हुश्श ! संपली एकदाची. कधीपासून वाट पाहत होतो परीक्षा संपण्याची आणि आज 'सोनियाचा दिन उजाडला ( परीक्षा संपून तसे दहा दिवस झालेत पण वेळ नाहीए ना ! ) या आधीही परीक्षा देण्याचे प्रसंग आले आहेत पण दरवेळीस हा दिवस नवीन वाटतो. काहीतरी अदाभुत पराक्रम केल्याचा आनंद माझ्या चेहर्‍यावर दिसू लागतो आणि मग विजयीवीराच्या थाटात घरी आल्यावर सरळ आडवा पसरतो.&lt;br /&gt;मला आजही ते परीक्षा संपण्याचे दिवस आठवतात...खास करून दहावी-बारावीचे. दरवर्षी परीक्षा देऊनही बोर्डाच्या परीक्षा देणे हे दिव्य पार पाडण्याचा आनंद तो काय ! म्हणजे अगदी पंख लाभल्यासारखे भासु लागते, भर उन्हाळ्यात पावसात भिजल्या सारखे वाटू लागते, निदान दुसर्‍यादिवशी शौवर खाली आंघोळ करताना तरी नक्कीच ! कित्येक दिवस रात्रंदिवस अभ्यासाचा प्रसंग असताना  कधी तो पाऊस बरसायचा या आशेने कधी तो दिवस उजाडायचा अशी वाट पाहत बसतो. परीक्षा सुरू होण्यापूर्वी नेहमी चालते ते 'काऊंटडाऊन' तेव्हा तर हमखास सुरू होते. म्हणजे शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशीच 'अजुन काही तास फक्त'चे पालुपद सुरू होते. सकाळी उठल्यावर ही अजुन ८ तास, ६ तास हीच गणिते डोळ्यांपुढे. मग कधी एकदा परीक्षेला जातो आणि पेपरला फाडून खातो असे काहीतरी वाटते. मग शेवटी तो पेपर शिक्षकांच्या हाती दिला की बस्स ! आता काहीही होवो !!&lt;br /&gt;कॉलेजच्या परीक्षा तर बर्‍याच गमतीमध्ये दिल्यासारख्या वाटतात. म्हणजे देऊन टाकू चल- अशा काहीतरी उद्देशाने दिलेल्या. त्यात अभ्यासाची, टेन्शनची काही मजा नव्हती. बाकी फायनल ईयर ला मात्र मी परीक्षेचा पाहिला नाही इतका माझा परीक्षेने अंत पाहिला. कोणताच पेपर मनासारखा जाऊ नये म्हणजे काय ? एक तर उन्हाळ्याने घर्मबांबाळ होत होतो आणि कुठलेच उत्तर आठवत नसल्याने डोळ्यांपुढे अंधारीच. पण शेवटचा पेपर दिला आणि हाय खाल्ली ! घरी येऊन बेडवर कोसळलोच होतो.&lt;br /&gt;पण सुखाचे दिवस क्षणिक असतात आणि अभ्यासाचे व्यसन इतक्या सहजी कसले सुटायचे म्हणून सी.ए. च्या परीक्षेसाठी अभ्यासाचा नारळ फोडला. मला आजतागायत परीक्षेचे कधीच टेन्शन आले नाही पण हल्ली मात्र येऊ लागले आहे, सी.ए. च्या परीक्षेचा लोकांनी आणि खुद्द विद्यार्थ्यांनीच एवढा बागुलबुवा करून ठेवला आहे की नुसत्या विचारानेच घाम फुटावा आणि ती अभ्यासाची पुस्तके घरी आणातना जो घाम फुटतो तो अजुन वेगळाच. त्या मानाने सध्या जी परीक्षा देऊन आलो ती फारच चिरीमिरी होती त्यात फक्त एकच दिवस पेपर ! सकाळी दोन तासाचा एक आणि दुपारी दोन तासाचा दुसरा. म्हणजे परीक्षा सुरू झाली पण आणि संपली पण ! एकाच दिवशी पहिल्या पेपरची धाकधुक आणि शेवटच्या पेपरची उत्सुकता. नाहीतर एरवी परीक्षा सुरू झाली की दिवस सरवा मंद गतीने असला प्रकार चालतो पण तीच खरी अभ्यासाची वेळ असते कारण परीक्षा संपल्यावर वेळ निघून गेलेली असते.&lt;br /&gt;परीक्षेचा पेपर लिहिताना तर अजुनच चल-बिचल असते. बहुतेक वेळा मी गाणी गुणगुणत पेपर लिहील्याचे मला आठवते. काही वेळेस स्वखुषीने तर काही वेळेस 'क्रॉस कनेक्शन' झाल्याप्रमाणे गाणी वाजतच राहतात. ती थांबवणे फार मुश्कील होऊन जाते. जसजसा मोठा होत गेलो तशी गाण्यांबरोबर कविताही सुचू लागल्या. मग ती उत्तरपत्रिकेवर लिहिले तर उगाच काहीतरी संकेत वाअतू नयेत म्हणून मनातच ठेवावी लागते आणि एखादी पुरवणी घेऊन त्यावर लिहावी अन् परत न करावी तर ती कॉपी वाटेल अर्थात गणिताच्या पेपरला कवितेचा काय संबंध ? पण रिस्क कशाला ?&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TGd0CgWwF7I/AAAAAAAAAFw/JpMnYb6_w8M/s1600/I_Hate_Exams.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TGd0CgWwF7I/AAAAAAAAAFw/JpMnYb6_w8M/s320/I_Hate_Exams.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;शाळेत असताना किंवा अगदी कॉलेजमध्ये असतानाही परीक्षा संपल्यावर एक काम मी न चुकता करी ते म्हणजे घरी आल्यावर सर्व वाहया पुस्तकांची रद्दी बांधून ठेवणे. पास होण्याची खात्री असल्याने आता ह्या वह्या- पुस्तकांना 'अलविदा' म्हणावे लागणार आणि संध्याकाळी वह्यांचा खान साफसफाई करून रिकामा केला की मग परीक्षा अन् अभ्यासाची पुस्तके दोन्हींतून सुटका झाल्याचे मनोमन पटते.&lt;br /&gt;परीक्षेच्या दिवसात एक नेहमी घडते ते म्हणजे अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टी सुचू लागतात. कविता सुचतात, लिखानाचे नवे विषय सुचतात, नवे उपक्रम, नवे छंद सुचतात. पण अभ्यासाच्या हुकुमशाहीपुढे त्यांना नमते घ्यावे लागते आणि परीक्षा संपल्यावर मात्र विसरत गेलेल्या स्वप्नाप्रमाणे ते धूसर होत जातात.&lt;br /&gt;सध्या बरीच शांतता आहे. उन्हाळा सारून पाऊस मुक्त कंठाने बरसतो आहे. अजुन काही महिने तरी निवांत जातील मग दिवाळीचा अभ्यास आणि उन्हाळ्याची परीक्षा यायची आहेच. तोपर्यंत हवे तेवढे ब्लोगिन्ग करू. अर्थात निकाल चांगला लागला तरच !&lt;br /&gt;&lt;i&gt;&lt;br /&gt;प्रतिक्रिया-&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;rahul nagmal said-&lt;br /&gt;Nemaka lihahle ahes parikshevishayi.&lt;br /&gt;&lt;br /&gt;Sagar Said-&lt;br /&gt;Dhanyawaad Rahul...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मीनल said-&lt;br /&gt;परीक्षेच्या दिवसात एक नेहमी घडते ते म्हणजे अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टी सुचू लागतात.&lt;br /&gt;Exactly..&lt;br /&gt;नविन एखाद्या छंदाची याचवेळी नेमकी कशी आठवण होते हे मलाही न सुटलेले कोडे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;Sagar Said-&lt;br /&gt;आपण जितकी बंधने मनावर घालू पाहतो तितके ते त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावे म्हणून असेल कदाचित..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-6921968829311565172?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/6921968829311565172/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/6921968829311565172'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/6921968829311565172'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post.html' title='परीक्षा संपली !!!'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/__eb9ICpI62U/TGd0CgWwF7I/AAAAAAAAAFw/JpMnYb6_w8M/s72-c/I_Hate_Exams.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-2595243993004663546</id><published>2010-06-02T11:09:00.000+05:30</published><updated>2010-08-25T14:55:10.954+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सानिया'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='जाहिरातबाजी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निषेध'/><title type='text'>सानियाच्या लग्नाला</title><content type='html'>हो-नाही म्हणता म्हणता अखेर सानियाचे लग्न झाले आणि ते ही शोएबशीच झाले. बाकी सर्व न्युज चॅनेल्सनी, वर्तमानपत्रांनी आणि तिच्या पूर्वीच्या चाहत्यांनीही तिने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाह करण्याचा शक्यतोवर, शक्यतोपरी निषेध केला पण अखेर नदी सागरास मिळाली. ती भारतीय सागरास न मिळता पाकिस्तानाकडे वळली याचेच तमाम भारतीयांना दु:ख. तर तिकडे पत्रकार आणि बातमीदारानी या एका बातमीचा उदो-उदो करीत टीआरपी खायला सुरूवात केली.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_IMtgeOxO9Dk/TDV3is75o0I/AAAAAAAAAXE/RUKAYzH47Iw/s1600/Sania+Mirza+Wedding+Engagement_42946.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" rw="true" src="http://3.bp.blogspot.com/_IMtgeOxO9Dk/TDV3is75o0I/AAAAAAAAAXE/RUKAYzH47Iw/s320/Sania+Mirza+Wedding+Engagement_42946.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;एकीकडे आपण व्यक्ती स्वातंत्र्याचे उपदेश पाजतो आणि तेच अगदी सहजपणे विसरूनही जातो. सानिया मिर्जा मोठी टेनिसपटू म्हणून तिच्या लग्नाचा एवढा गाजावाजा. तिने कुणाशी लग्न करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपण सारे तिच्यावर हक्क गाजवल्याप्रमाणे तिच्या लग्नाच्या विरोधात उभे. आपल्याला कुणी हक्क दिला ? ती भारतासाठी खेळते, टेनिसमध्ये भारताला नावलौकिक मिळवून देते म्हणून का? आणि मुळात एवढी प्रसिद्धी मिळवण्यापूर्वीच जर तिचे लग्न शोएबशी झाले असते तर कुणाला थांगपत्ताही लागला नसता. तिने शोएबशी लग्न करो वा शाहीदशी करो पण न्युजवाल्यांना निमित्तच हवे असते- ब्रेकिंग न्युज!' मग तिच्या घरातले आई-वडील असो वा पाकिस्तानची आयेशा असो सगळेच 'लाइम-लाईट मध्ये'आणि ' नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' आणून काय मिळवले न्युजवाल्यांनी तर टीआरपी ! या फुटेजचा काही अवॉर्ड मिळाला का त्यांना ? पण सेलीब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याला चव्हाट्यावर आणायचे काम यांना बरोबर जमते ( त्यांचे स्व:तचे आयुष्य आणि भानगडी असे चॅनेलवर दाखवले तर चालेल का? पण यालाही तयार होणारे सापडतील. कारण प्रसिद्धी मिळते तर सगळे चालेल.) आणि लोक पाहणार हे त्यांना ठाऊक असते म्हणून ' जे विकते तेच पिकवतात' आणि पक-पक-पकवतात.&amp;nbsp; टी.व्ही. सीरीयल आणि न्युज चॅनेल्स दोन्हीमध्ये टीआरपी वाढवण्याची शर्यत सुरू आहे आणि प्रेक्षक वर्ग मात्र भरडला जातोय. &lt;br /&gt;मी या सर्व गोष्टींकडे त्रयस्थपणे पाहतो. सानिया एक चांगली खेळाडू आहे आणि शोएबशी लग्नानंतर ती पाकिस्तानात जाणार असली तरी तिने भारतातर्फे खेळणे सोडू नये एवढीच इच्छा आहे.&lt;br /&gt;(पोस्ट थोडी शिळी झालीय खरी पण फोडणी दिलेल्या बातम्या चालतात मग पोस्ट का चालू नये ?)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i&gt; प्रतिक्रिया-&lt;/i&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;Samir Said-&lt;br /&gt;Sania may marry anyone... and may go anywhere. It hardly matters if she is playing for India or not. India has capacity to produce 100s such Sania. Its Sania Because of India and not vice a versa. &lt;br /&gt;&lt;br /&gt;Sagar Said-&lt;br /&gt;Ya That's true also...&lt;br /&gt;But media really makes these thigs a big issue that's not at all necessary.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/8962897017169990383-2595243993004663546?l=majhyamanatalekaahee.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/feeds/2595243993004663546/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_8172.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/2595243993004663546'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/8962897017169990383/posts/default/2595243993004663546'/><link rel='alternate' type='text/html' href='http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_8172.html' title='सानियाच्या लग्नाला'/><author><name>Sagar Kokne</name><uri>http://www.blogger.com/profile/00533927844447382497</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://2.bp.blogspot.com/-tGOSK7xTNZ8/TddTYuqSkXI/AAAAAAAAAss/t41U0V9iam8/s220/DSC01046.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_IMtgeOxO9Dk/TDV3is75o0I/AAAAAAAAAXE/RUKAYzH47Iw/s72-c/Sania+Mirza+Wedding+Engagement_42946.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-8962897017169990383.post-5546551257455669830</id><published>2010-05-08T12:03:00.000+05:30</published><updated>2010-08-25T14:47:31.845+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निरर्थक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विनोदी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनातले'/><title type='text'>वेळ न उरला हाती...</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_IMtgeOxO9Dk/S7xyaC9jVtI/AAAAAAAAAWE/-UlZ3Pf_Vo0/s1600/Time.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;वेळ काही कुणासाठी थांबत नाही. ती वेळेवर येते आणि वेळेवर जाते. आपणच मग वेळेच्या मागेपुढे धावत राहतो. वेळेचे महत्व वेळोवेळी सांगितले जाते तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करून वेळेचा अपव्यय करत राहतो आणि मग जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा बोलतो.''अरे वेळच नाहीए रे...!'' &lt;br /&gt;खरं तर एवढ्या दिवसांनी ही पोस्ट आली यावरून तुम्ही ओळखले असेलच की माझ्याकडे वेळ किती कमी आहे ( म्हणजे फिल्मी स्टाइलने म्हणत नाहीए...पण माझ्या विचारांच्या मौलिक संशोधनातून( किंवा मौलिक विचारांच्या संशोधनातून) मला कळून चुकले आहे की मी किती ही वर्षे जगलो तरी मला वेळ कधी पुरणार नाही) आणि त्याची कारणे किंवा सबबी देऊन मी लिहिण्याची टाळाटाळ करतोय असे समजू नये. लिहिणे हे माझ्या ( रिकाम्या वेळेतील) आवडत्या छंदांपैकी एक. पण या ना त्या कारणाने ते जमत नाही अन् मी वेळेला मारण्याऐवजी वेळच मला मारुन नेते. माझे इतर ब्लॉगर मित्र दिवसा-दिवसाला धडधड पोस्ट टाकत असताना मला त्या वाचायला ही वेळ मिळत नाही हे पाहून माझा जीव कासावीस होतो(!) आणि मनाची कुचंबणा वगैरे होते तसे ही काही होते(!!) मग मी मोठ्या निर्धाराने ठरवतो की उद्याच नवी पोस्ट टाकुया पण माझ्या दिनचर्येचे वेळापत्रक तपासले की आधीच अनेक कामे उधार असल्याचे दिसून येते पण कधीतरी ही वेळेची देणी फिटतील आणि एक तरी शहाणी ओळ लिहीन या आशेवर मी लेख लिहीण्याऐवजी मी कवितेवर आटपतो.&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_IMtgeOxO9Dk/S7xyaC9jVtI/AAAAAAAAAWE/-UlZ3Pf_Vo0/s1600/Time.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/_IMtgeOxO9Dk/S7xyaC9jVtI/AAAAAAAAAWE/-UlZ3Pf_Vo0/s320/Time.jpg" width="240" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;कॉलेजमध्ये होतो तोपर्यंत सारे ठीक होते. तेव्हा वेळच वेळ होता पण ऑफीस सुरू झाले आणि सारे विस्कटले. रोज आपल धावत-धावत घराबाहेर पडा, बस किंवा रिक्षा पकडा आणि कसे-बसे ऑफीस गाठा. ऑफीस पोहोचेपर्यंत वेळ फास्ट लोकल प्रमाणे भरभर निघून जाते. ऑफीसमध्ये मात्र वेळ धीम्या लोकल प्रमाणे जाता जात नाही. बॉस काही ऑफीस बाहेर जात नाही आणि नसलेले काम असल्याचे दाखवण्यात तरी किती वेळ घालवायचा ? किंवा अगदीच कामे भरपूर असली तरी ती करायचे इच्छा नसल्याने घड्याळाकडे लक्ष लावून बसल्यावर घड्याळ मंदपणे चालत राहते. बारा वाजले की लंच ब्रेकची वाट पाहावी नंतर मग टी-टाइम ची अन् नंतर ऑफीस सुटण्याची. जिथे तिथे वेळेची सारवा-सारव.&lt;br /&gt;शाळेत असताना कधीतरी परीक्षेत 'घड्याळ बंद पडले तर?' असा निबंध आला होता. पेपर संपायला पाचच मिनिटे उरली असता घड्याळ बंद पडले तर ही कल्पनाच भारी आहे.पण असे काही होत नाही कारण ऐनवेळी माझे घड्याळ बंद पडून परीक्षकांची घड्याळे चालू राहतात अन् वेळ घात करते.&lt;br /&gt;ऑफीसला जाण्या-येण्यात होणारा प्रवास हा मला नेहमीच वेळेची बरबादी वाटते. माझे ऑफीस मित्र खरं तर रोज तास-दीड तास प्रवास करून ये-जा करतात पण मी मात्र जवळ राहत असूनही ( असल्यानेच) फार आळशीपणा करतो. पण हे सारे मित्र काम-एके-काम करणारे. दिलेले काम वेळेत पूर्ण करणारे. घरी जाऊन काय करणार म्हणून ओवर टाइम करणारे. हे सारेच जन लघु-उद्योगी म्हणून हे चालायचे. आम्ही बहू-उद्योगी(!) त्यामुळे मला खरं तर वेळेच्या देवतेकडून कर्जच काढायला हवे. पण देवाकडून कसलेही कर्ज घेऊ नये असे मी कुठेतरी वाचले होते म्हणून राहीले.&lt;br /&gt;ऑफीसची कामे सोडली तरी मला इतर अनेक कामांत रस असल्याने माझ्याकडे वेळेची नेहमीच कमतरता असते. पण माझ्या मित्र वर्गात, नातेवाईकांत अन् ऑफीसमध्येही मी काहीतरी ग्रेट माणूस असल्याचा समज आहे. त्यामुळे 'कसं जमतं रे तुला?','वेळ कसा मिळतो तुला?', किंवा 'कधी करतोस हे सार
