Posts

Showing posts from 2012

कृष्णधवल पाने

Image
निमित्त झाले ते रणबीर कपूरच्या एका जाहिरातीचे. जुन्या काळातल्या रहदारीविरहित मुंबईतून गाडी चालवत गाणे गुणगुणत जाणारा नायक आणि तोही कृष्णधवल रंगांत. भूतकाळात डोकावणे हा तसाही माझा आणि माझ्यासारख्या इतर अनेक स्वप्नाळू माणसांचा आवडता छंद आणि त्यात आपण न पाहिलेल्या काळात डोकावणे म्हणजे कायमच कुतूहल वाढवणारे... माझ्याबाबतीत असे आहे की मला कायमच इतिहासाचे किंवा आपण न पाहिलेल्या काळाचे आकर्षण आहे. विज्ञानाने माणसाला भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी दिली तरी इतिहासाने त्याला अनुभवाने आलेले शहाणपण दिले. वर्तमान हातात आहे, भविष्य तर काय येणारच आहे. पण भूतकाळ मात्र येणार नाही. भूतकाळात किंवा स्वप्नरंजनात फार काळ रमणे ठीक नसले तरी भूत आणि भविष्य या दोघांपैकी काही निवडायची वेळ आली तर मी भूतकाळात डोकावणे पसंत करेन. गतकाळाकडे प्रामुख्याने आकर्षित करणारी माध्यमे म्हणजे सिनेमे आणि छायाचित्रे. पुस्तके किंवा छापील साहित्य आपल्याला बरीच माहिती देते पण कल्पनेच्या माध्यमातून ते डोळ्यांपुढे येण्यासाठी आपण पाहिलेल्या घटनांचेच संदर्भ जुळतात. या भूतकाळाबाबत नेहमी असे वाटते की तो मुळातच अशा कृष्णधवल रंगात अस

तिसरा वाढदिवस

Image
ब्लॉगच्या ठळक बातम्या- १. आज ब्लॉगला तीन वर्षे पूर्ण झाली. २. नेहमीप्रमाणे यंदाही विशेष काही लेखन झाले नाही. ३. वाढत्या महागाईचा (मूक) निषेध म्हणून गेले २ महिने ब्लॉगला टाळा लावण्यात आला होता. ४. काही दिवसांपूर्वीच २०,००० वाचकांचा टप्पा ओलांडला. ५. पाठीराख्यांची संख्या वाढल्याचे लक्षात आले आहे. येत्या काळात ब्लॉग लेखन पूर्ववत सुरु राहील असे आश्वासन देण्यात येत आहे. हुकुमावरून.

मोहीम: कोथळीगड-पेठ

Image
कुठल्याही शुभ कार्यासाठी सकाळी उठायचे ठरले की लेखक महाशयांना रात्री झोप येत नाही. कोथळी गड -पेठ येथे जायचे ठरले तसे सर्व सामानासकट रात्रीच मित्राचे घर गाठले पण सर्व झोपले तरी निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न होईना. चार वाजता कुठेशी थोडी झोप लागल्यासारखे वाटले तोच सहा वाजले आणि मोहीम सुरु झाली. सगळ्यांची जमवाजमव आणि ट्रेकच्या सूचनांचे कार्यक्रम झाल्यावर सात वाजता गाडी हलली. प्रवासामध्ये उत्साही मावळ्यांनी लोकगीते,पोवाडे,भजन म्हणत प्रवास सुखकर केला. आंबिवली गावाच्या पायथ्याशी १० वाजता नाश्त्यासाठी उतरलो. पोहे आणि चहा पोटात उतरवून गडाच्या दिशेने चालू लागलो. बऱ्याच दिवसांनी लेखक महाशयांनी कॅमेरा बाहेर काढल्याने फोटो सेशन जोरदार सुरु झाले. कॅमेऱ्याच्या जीवात जीव असेपर्यंत फोटो काढायचे असे ठरवून मिळेल ते क्लिकत चाललो होतो. सोबतीला नावापुरतेही उन्ह म्हणून नव्हते त्यामुळे ट्रेकसाठी वातावरण प्रसन्न होते. शिवाय इतर ट्रेकर्सप्रमाणे पाठीवर बॅग न घेता चालल्याने आम्ही बरेच बागडत होतो.   पेठ गावाचा परिसर येईपर्यंत प्रशस्त पायवाट आहे आणि त्यानंतर त्याहून प्रशस्त मैदानी प्रदेश. इथे आम्हाला फोटोग्

आमचे क्लासेस जॉइन करा

शाळा सुरु होऊन दोन दिवस झाले होते. राणेसर त्यांच्या गणिताच्या तासासाठी 'दहावी अ'च्या वर्गात आले. इतर शिक्षकांप्रमाणे त्यांनीही सर्वांना यंदा दहावीचे वर्ष आहे आणि त्यांनी भरपूर अभ्यास करायला हवा याबद्दल सूचना दिल्या. त्याच वर्गात सोहम नावाचा विद्यार्थी होता जो गेल्या वर्षी परीक्षेत पहिला आला होता आणि गणितात तो विशेष हुशार असल्याने सरांचाही लाडका होता. आपला तास संपल्यावर राणेसरांनी त्याला शाळा सुटल्यावर भेटायला सांगितले त्याप्रमाणे तोही सर्व विद्यार्थी गेल्यावर स्टाफरूमकडे निघाला. सर त्याची वाट बघत स्टाफ रूमच्याबाहेरच उभे होते. ''काय सर, तुम्ही बोलावलं होतं मला ?'' ''हो, अरे यंदा दहावी, अभ्यास जोरदार असायला हवा या वर्षी !" "ठाउक आहे सर, सुट्टीत सुरुवात केलीये थोडी" "ते अपेक्षित होतंच मला, अभ्यास कसा चाललाय मग? " "चालू आहे...नेहमीप्रमाणे " "तू या वर्षीही क्लास लावला नाहीयेस म्हणे. गेल्या वर्षीपर्यंत ठीक होते पण आता दहावीला एक-एक मार्क किती महत्त्वाचा ठरतो माहिती आहे ना" "माहिती आहे सर...पण मला...ना

आयपीएलचा बाजार

नाही म्हणता म्हणता आयपीएलचे पाचवे पर्वही संपले. आयपीएल सुरु झाले तेव्हा कुमार वयात असणारे आम्ही आता तारुण्यात आलो असे हल्लीच माझ्या लक्षात आले. सुरुवातीला आयपीएलच्या बाबतीत आम्ही फार काही खुश नव्हतो. पहिलेच वर्ष असल्याने फारच गोंधळ दिसत होता. एरवी भारत-पाकिस्तान, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया या व्यतिरिक्त काही रंजक सामने होऊ शकतात अशी कल्पना नव्हती. आता आयपीएलचा कारभार, आयपीएल टीम्स सगळ्या अंगवळणी पडल्याने मुंबई-चेन्नई, दिल्ली-कोलकाता अशा मॅचेससुद्धा आवडीने पहिल्या जाऊ शकतात हे कळले आणि आयपीएलच्या बाबतीत कुठलीही मॅच रंगतदार होऊ शकते त्यामुळे वेडा क्रिकेटप्रेमी हौशीने सगळ्या मॅचेस पाहत बसतो. एखादे नव्या पद्धतीचे गाणे पहिल्यांदा ऐकले की कळत नाही आणि आवडतही नाही पण वारंवार ऐकून आणि बाकीच्यांना कळते आणि आवडते तर मला का नाही म्हणून आपल्याला ही आवडायला लागते तसे आयपीएलचे झाले आहे. पहिल्या वर्षी हा प्रकार काय आहे, तो राहणार की जाणार हे कळेपर्यंत स्पर्धा संपलीदेखील. आता आयपीएलला नावे ठेवणार्यांनीही हे स्वीकारले आहे आणि एन्जॉय करायला सुरुवात केली आहे. काहींनी त्याकडे पाठह

पायरसीची शाळा

साधारण महिन्याभरापूर्वी ही बातमी वर्तमानपत्रात झळकली होती. सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा' या मराठी चित्रपटाची पायरेटेड कॉपी युट्युबवर उपलब्ध झाल्याची आणि लगोलग ती कॉपी लिक करणाऱ्या इसमावर कारवाई केल्याचीही. मराठी चित्रपटाचे रूप पालटत आहे. नवे विषय आणि नवे तंत्र यांच्या सहाय्याने त्याने कात टाकली आहे. 'शाळा' चित्रपट हा त्या मराठी चित्रपट सृष्टीतील बदल घडवणाऱ्या चित्रपटांपैकी एक. प्रदर्शनापासून आणि खरेतर त्या पूर्वीपासूनच तो प्रेक्षकांना आकर्षित होता. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की पायरसीची बातमी कळताच दिग्दर्शक सुजय डहाके यांनी पुणे सायबर कॅफेकडे तक्रार नोंदवली. कारवाई नक्की काय केली हे कळले नसले तरी पायरसी रोखण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे हे महत्त्वाचे. पायरसी ही केवळ चित्रपट आणि गाण्यांचीच होते असे नाही. पुस्तकांची, माहितीची, तंत्रज्ञानाची आणि आम्ही ब्लॉगर जे काही लिहितो त्याचीही होते. कुठल्याही प्रकारची चोरी ही वाईटच. त्याचे समर्थन होऊ शकत नाही पण त्यामागे काय कारण आहे ते देखील पाहायला हवे. विशेष म्हणजे चित्रपटांच्या बाबत पायरसीला जितका विरोध आहे तितका गाण्यांच्य

महाशतकवीर

Image
'वाट पाहुनी जीव शिणला' होता सगळा चाहत्यांचा पण तो सोनियाचा दिवस काही येतच नव्हता. गेल्या वर्षी आफ्रिकेविरुद्ध ९९चा आकडा गाठला आणि तेव्हापासून त्या १०० व्या महाशतकाची महाप्रतीक्षा सुरु झाली. मग सेमी फायनलला पाकविरुद्ध करणार, फायनलला वानखेडेवरच करणार, इंग्लंडला क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डसवर नक्कीच, त्याच्या आवडत्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध १०० टक्के असे करता करता १६ मार्च उजाडला आणि एकदिवसीय सामन्यात ज्याची पाटी कोरी होती त्या बांग्लादेश विरुद्ध 'महाशतक' लागले आणि तमाम क्रिकेटप्रेमींचे वर्षभराचे टेन्शन संपले. सचिनबद्दल काही बोलायचे म्हणजे आपल्या क्षेत्रात कितीही ग्रेट असलो तरी आपण ह्या सागरातील एक थेंबही नाही असे वाटत राहावे असा त्याचा पराक्रम. तसे मी १ वर्षाचा होतो तेव्हापासून तो खेळतो आहे. २२ १/२ वर्षांची त्याची कारकीर्द, त्याचे वय, त्याचे कर्तृत्व पाहता मी त्याला सचिनजी किंवा सचिनसरच म्हणायला हवे पण इतका आदर असूनही त्याला हे असे संबोधणे माझ्या आणि माझ्यानंतरच्या पिढीलाही जमले नाही. आम्ही कायम त्याला सचिन, सच्चू आणि कधीकधी तेंडल्याही म्हटल्याचे आठवते पण त्यात अनादर करण्य

शाळा- पुस्तक, चित्रपट आणि बरेच काही

Image
शाळेत गेलेल्या सर्वांसाठी...असे वाचूनच पुस्तकाची सुरूवात होते. डोंबिवलीच्या सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल या छोट्याश्या मराठमोळ्या शाळेत शिकणारा मुकुंद जोशी आणि त्याचे मित्र चित्रे, सुऱ्या आणि फावड्या ही कथानकातील प्रमुख पात्रे. आजची डोंबिवली ही शहर म्हणून विकसित झाली असली तरी ७०च्या दशकात तिचे स्वरूप खेडे म्हणूनच होते. शेतजमीन, डोंगर आणि बराचसा ग्रामीण मातीचा गंध सांगणारे वर्णन यात आपण सहज मागे खेचले जातो. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण ठिकाणी शिक्षण झालेल्यांनाच नव्हे तर शहरी भागात ही पूर्वीच्या मराठमोळ्या शाळांमधून शिकलेले विद्यार्थ्यांना देखील ती आपलीच शाळा वाटते. शाळा ही म्हटली तर एक प्रेमकथा आहे म्हटली तर नाहीही. मुकुंदा जोशी हा या कथेचा नायक आहे आणि संपूर्ण पुस्तकात तो आपल्या अवतीभवतीचे शाळेचे व शाळेबाहेरचे विश्व आपल्यासमोर मांडतो. शिरोडकर ही या कथेची नायिका आहे पण ती ही केवळ मुकुंदाला आवडत असते म्हणून. प्रेमकथा यासाठी कारण मुकुंदा सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठेही, कधीही शिरोडकरच्याच विचारात बुडालेला. आपले प्रेम तिच्यापर्यंत कसे पोचवणार या चिंतेने कायम त्याच्या पोटात खड्डा पडल

अस्वच्छ भारत

समस्या तर तशा खूप आहेत जगात. सगळ्याच काही माणसाला वैयक्तिक पातळीवर सोडवता येणे शक्य नसते. पण माणूस प्रयत्न करू शकतो आणि खासकरून तेव्हा, जेव्हा या समस्या त्याच्याच चुकांमुळे उद्भवल्या असतील. मुंबईसारख्या शहरात कधी घराबाहेर पडलो आणि डोक्यातील इतर सर्व विचारचक्रे थांबवून कधी आपल्या शहराचे निरीक्षण केले तर लक्षात येईल कि जिथे-तिथे कचराच कचरा आहे. कचरा जो लक्ष नसेल तर दिसत नाही पण पाहिले तर सगळीकडेच आहे. वैचारिक कचऱ्याच्या गोष्टी नाही करत मी, भौतिक कचराच आहे आणि तो टाकणारेही आपणच. रस्ते पहा, इमारती पहा, भिंती पहा आणि जिथे कचरा टाकू नये असे लिहिले आहे तिथेही माणूस जिवंत असल्याच्या खुणा तो उमटवत जातोच आहे. पान थुंकू नये लिहिले असेल तर तिथेच पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगकाम आढळते. पोस्टर लावू नये लिहिले तर ते जुने पोस्टर काढले तर त्याखाली लिहिलेले सापडते. तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही निर्लज्ज आहोत! बसचे वा ट्रेनचे तिकीट, चॉक्लेटचे कागद, सिगारेटचे पाकीट, वेफर्सचे रॅपर्स, रिकाम्या बाटल्या ( दारुच्याही), प्लास्टिक पिशव्या....सगळ्या चीजवस्तू काम झाले की निसर्ग नावाच्या कचरापेटीत ! इतका बेजबाबद