Posts

सैराट झालं जी...

Image
फॅंड्रीनंतर नागराज मंजुळे 'सैराट' घेऊन येत आहेत हे जाहीर झाले तेव्हापासूनच चित्रपटाविषयी उत्सुकता वाढलेली होती. त्यात अजय-अतुल यांचे संगीत सैराटच्या निमित्ताने पुन्हा ऐकायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात 'सैराट' ची हवा आहे आणि ती उगीच नाही हे चित्रपट पाहून झाल्यावर खात्री पटते. सोलापूरच्या कॉलेजला शिकणारे परश्या आणि आर्ची हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात पण आर्ची ही गावच्या पाटलाची मुलगी आणि परश्या कोळी समाजातील मुलगा. आंतरजातीय प्रेमामुळे त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते पण तरीही ते निडरपणे त्यांचा सामना करतात. घर सोडून नव्या शहरात जाऊन संसार मांडतात पण त्यांचे प्रेम यशस्वी होते का ? प्रेम करणे जितके सोपे आहे तितके ते निभावणे नाही. या सैराट प्रेमकथेचा शेवट काय होतो हे पाहायला चित्रपटगृहात जायला हवे . 'सैराट' साठी नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे दोन नवोदित कलाकार घेतले पण त्यांच्याकडून पहिल्याच चित्रपटात उत्तम दर्जाचे काम करवून घेतले. राष्ट्रीय पुरस्काराने नायिकेचा सन्मान झाल्याने अपेक्षा आधीच उंचावल्या होत्य

मनातला किल्ला

Image
काही चित्रपट करमणूक करतात, काही चित्रपट सामाजिक असतात. किल्ला सारखे काही चित्रपट भावनिक असतात. अशा चित्रपटात पटकथेत अनेक अदृश्य संवाद लिहिलेले असतात. ते सांगत राहतात मुक्याने जे सांगायचे ते. ती भाषा ज्यांना कळते त्यांना चित्रपट कळतो आणि भावतो. पुण्यात वाढलेला चिन्मय काळे आणि त्याची आई अरुणा यांच्या भोवती मुख्य कथानक लिहिले आहे. पतीच्या निधनानंतर सरकारी नोकरीच्या बदलीमुळे हे दोघे गुहागर येथे स्थायिक होतात. शहरातून गावाकडे स्थलांतरित होणे जिथे अनेक सुविधांचा अभाव आहे चिन्मयला सोपे जात नाही. त्याची आई जी परिस्थितीला सामोरी जात स्वत:ला व मुलाला सावरू पाहते आहे तिलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सगळ्यात या दोघांचे नाते कधी कोमेजते तर कधी बहरते पण तरीही घडत जाते. पुण्यासारख्या शहरी वातावरणातून गुहागर येथील ग्रामीण ठिकाणी नवी शाळा, नवे मित्र, नवा परिसर यांच्याशी जुळवून घेणे हे चिन्मयसाठी अवघड होऊन जाते. बालवयात अनपेक्षितपणे अशा बदलांना सामोरे जाताना चिन्मयचे जगही बदलत जाते. सुरुवातीला मनाविरुद्ध या गावी आलेला, वेळोवेळी परत पुण्याला जाण्याचा हट्ट धरणारा चिन्मय आणि शेवटी स

'टाईमपास'वाला लव

Image
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ज्या चित्रपटाची भरपूर हवा झाली आहे तो म्हणजे 'टाईमपास'. रवि जाधव यांचा हा चौथा चित्रपट. नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक सारखे उत्तम चित्रपट देणाऱ्या रवि जाधव यांनी त्याचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केलाय आणि त्याला उत्तमरित्या प्रसिद्धी मिळवून दिल्याने जिकडे तिकडे 'टाईमपास'ची चर्चा आहे. ही आहे दगडू आणि प्राजक्ताची लवस्टोरी. दगडू जो एका गरीब घरातील वाया गेलेला मुलगा आहे आणि प्राजक्ता जी एका संस्कारी घरातील गुणी मुलगी आहे. पण प्रेमाला वय, जात-पात, गरीब-श्रीमंत कसल्याच मर्यादा नसतात त्यामुळे प्राजक्तासारखी सुंदर मुलगी देखील दगडू सारख्या मवाली पोराच्या प्रेमात पडू शकते हे चित्रपट पाहताना आपल्याला मुळीच खटकत नाही. मित्रांच्या सांगण्यावरून दगडू प्रेमात पडायचे ठरवतो आणि प्राजक्ताला पटवण्याची शपथ घेतो. मग मुलीला पटवण्यासाठी जे काय करावे लागते ते अनेक उद्योग करतो आणि प्राजक्ताला पटवतो. पण दोघे मनापासून प्रेम करत असले तरी या वयातील प्रेमाला लफडी म्हणून जे सर्वसामान्य पालक करतात तेच त्यांचे पालक करतात आणि शेवटी प्रेमाची गोष्ट केवळ 'टाईमपास' ह

इस्टमन कलर दुनियादारी

Image
बहुचर्चित दुनियादारी एकदाचा प्रदर्शित झाला. दुनियादारी ही सुहास शिरवळकर याची एक अजरामर कादंबरी आहे याची प्रथमत: सर्वांनी नोंद घ्यावी. दुनियादारी पाहून आलेल्या अनेकांना हे माहीतच नाहीये त्यामुळे दर्जा काय असतो हे त्यांना चित्रपट पाहून कळणार नाही. या चित्रपटाचे परीक्षण करायचे म्हटले तर दोन प्रकारे करता येईल- एक म्हणजे केवळ चित्रपट म्हणून व दुसरे म्हणजे कादंबरीवर आधारित चित्रपट म्हणून. पण इथे लेखकाने (म्हणजे मी) पुस्तक आधीच वाचले असल्याने चित्रपट पुस्तकावर आधारित आहे हे सत्य त्याला नाकारता येत नाही. त्यामुळे या लेखात वारंवार चित्रपटाची पुस्तकाशी तुलना केली जाईल पण काही उपाय नाही. दुनियादारी ही कथा आहे श्रेयस, मिनू, शिरीन, दिग्या, रानी माँ, एम के आणि कट्टा गँगची. कॉलेज, मैत्री, प्रेम, विरह, संघर्ष असे नाट्यमय कथानक असल्याने साहजिकच संजय जाधव यांना दुनियादारी पडद्यावर आणावीशी वाटली त्यात काही आश्चर्य नाही पण ते तसे करताना मूळ कथानकात हवे तसे बदल करत ती सादर केली आहे. (ज्याला माध्यम बदलाची गरज असे म्हणता येईल). आणि सामान्य प्रेक्षकाने पुस्तक वाचले नसल्याने तो मूर्ख ठरतो कारण जे दाखवले

बीईंग स्कॉलर

Image
आयुष्यात कधी आत्मचरित्र लिहिले तर त्यातील शैक्षणिक कारकीर्दीत लिहिण्यासारखे बरेच काही आहे. पुढील लेख हा त्यातीलच एक उतारा म्हणता येईल. लेखात मांडलेले सर्व विचार स्वानुभवावरून लिहिले असून ते काल्पनिक मुळीच नाहीयेत. 'स्कॉलर' ही काही पदवी किंवा गौरव नाहीये. तो एक शिक्का आहे जो स्वकर्तृत्वाच्या पूर्वपुण्याईने मिळत असतो. जेव्हापासून मला आठवते तेव्हापासून मला कायम 'स्कॉलर' 'गुणी मुलगा' 'अभ्यासू मुलगा' अशा अगदी 'टाइड' ने धुतलेल्या पांढर्या कपड्याइतकी स्वच्छ प्रतिमा लाभली आहे. मी काही वाईट बोललो किंवा वागलो की मला असे वागणे शोभत नाही, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे बरेच काही ऐकून घ्यावे लागते. थोडक्यात स्कॉलर असणाऱ्या मुलांना सगळ्यांनी 'गुड बॉय'चा शिक्का मारून ठेवलेला असतो आणि त्याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. स्कॉलर इमेज टाळण्याचा प्रयत्न करणे फार कठीण काम आहे. म्हणजे स्कॉलर लोकांच्या चेहऱ्यावरच ते तेज किंवा तो दोष असतो. शाळेत तर सगळे शिक्षक मुलांना व्यवस्थित ओळखून असतातच. अमुक एक मुलगा हुशार आहे कळल्यावर त्या मुलाला अभ्यास न करण्याचा पर्या

ब्रेक के बाद

Image
गेले कित्येक दिवस ब्लॉगवर काहीच खरडले नसल्याने फारच अस्वस्थ वाटत होते. ब्लॉग लेखनाचा छंद असा आहे की बराच काळ लिहिले नाही म्हणजे अपराध केल्यासारखे वाटू लागते. त्यात इतर ब्लॉगर मित्रही झोपी गेल्याने अधिकच कंटाळा आला होता. पण शेवटी मौन सोडायचे ठरवले आणि ब्रेक नंतर परत यायचे ठरवले. गेली दोन्ही वर्षे परीक्षेमुळे गावी जाण्याचा योग आला नव्हता आणि यंदा अस्मादिकांच्या कुठल्याच परीक्षा नसल्याने ही संधी साधत खुशाल दहा दिवस सुट्टी टाकली आणि गावाकडे निघालो. गावी गेलो की हमखास पत्त्यांचे डाव रंगणारच. गावचे घर आणि पत्ते यांचा वर्षानुवर्षांचा संबंध आहे. आम्ही सगळी भावंडे वर्षभर पत्त्यांकडे ढुंकूनही पाहत नाही आणि गावी आल्यावर मात्र पत्ते एके पत्ते. हल्ली पूर्वीची चिल्लर गँग मोठी झाल्याने 'तुला काही येत नाही' असं सांगून कटवताही येत नाही. प्रत्येकाने एक-दोन सेट आणल्याने गावी दहा-बारा कॅट जमले होते यंदा. सगळ्यात आवडते म्हणजे रमी आणि मेंढीकोट. बरेच कॅट असल्याने चॅलेंज सुद्धा रंगायचे. शिवाय गावी काही गोट्यांच्या बरण्या सापडल्या तेव्हा मग तीन-पानी सुद्धा सुरु झाले. गोट्या सापडल्या त्यामुळे परत एकद

बीपी पाहावा !

Image
काही चित्रपट पाहायचे तर त्याआधी विचार करावा लागतो की तो घरच्यांसोबत पाहता येईल की नाही. ते सिनेमागृहात मित्रांसोबत जाऊन तसे पाहता येतात हे खरे पण तोच सिनेमा घरी टी.व्ही.वर पाहताना अजूनही अवघडल्यासारखे वाटते. बीपी अर्थात बालक-पालक या सिनेमाच्या बाबत हीच परिस्थिती असली तरी त्याचे कारण वेगळे आहे. बोल्ड समजले जाणारे, पुरेपूर अंगप्रदर्शन असणारे सिनेमे पाहताना अमुक एका दृश्याला अवघडलेपणा येत असेलही, पण बीपी सिनेमाचा विषयच ह्या अवघडलेपणावर भाष्य करतो आणि चांगला, सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आवश्यक अशी विचारसरणी मांडतो. त्यामुळे बालकांनी अगदीच पालकांसोबत चित्रपट नाही पाहिला तरी ठीक पण स्वतंत्रपणे मात्र दोघांनीही आवर्जून पाहायला हवा. अव्या, भाग्या, चिऊ आणि डॉली ही चौकट चित्रपटातील प्रमुख पात्रे आहेत. एकाच शाळेतले आणि एकाच चाळीतले सवंगडी. चाळीतली कोणी ज्योतीताई 'शेण खाते' म्हणून ती चाळ सोडून निघून जाते आणि 'शेण खाणे' म्हणजे नक्की काय हे कोणीच त्यांना समजावून न सांगितल्याने त्यांची उत्सुकता अजूनच वाढत जाते. त्यातच त्यांना भेटतो 'विशू' जो इतरांच्या नजरेत वाया गेलेला टवा